शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

ग्रामपंचायतीच्या आवारात दफनविधीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:28 IST

गेल्या अनेक वर्षांपासून दफनभूमीसाठी हक्काची जागा असताना ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तिचा ताबा मिळत नसल्याने संतप्त तीनशे ते चारशे आदिवासी महिला व पुरुषांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल करून आवारातच एका वृद्धाचा दफनविधी करण्याचा प्रयत्न केला.

सटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून दफनभूमीसाठी हक्काची जागा असताना ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तिचा ताबा मिळत नसल्याने संतप्त तीनशे ते चारशे आदिवासी महिला व पुरुषांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल करून आवारातच एका वृद्धाचा दफनविधी करण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना बागलाण तालुक्यातील देवळाणे येथे शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.दरम्यान, प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे, जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी वेळीच दफनविधीसाठी अन्य ठिकाणी तात्पुरती जागा उपलब्ध करून दिल्याने आदिवासी बांधवांनी सामंजस्याची भूमिका घेत वृद्धावर शांततेत अंत्यसंस्कार केले.बागलाण तालुक्यातील देवळाणे येथील भिल्ल आदिवासी समाजासाठी दफनभूमीची मोठी समस्या आहे. अनेकवेळा ग्रामसभेत आदिवासींसाठी गावठाणमधून जागा काढून देण्याचा ठराव पारित करण्यात आला. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या ठरावालाच केराची टोपली दाखवल्याचा प्रकार समोर आला आहे. शुक्र वारी रात्री देवळाणे येथील आदिवासी वस्तीत राहणारे रु ंझा पंजा सोनवणे (६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना मुलगा नसल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी संपूर्ण समाज एकवटला होता. शनिवारी सकाळी १० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते .त्यासाठी बाहेरगावातील नातेवाईक ,समाजातील बांधवांनी गर्दी केली होती. अंत्यविधीसाठी युवराज वाघ यांच्या शेतालगत नदीपात्रात तयारी सुरु असतांना त्याला गावातील काही लोकांनी मज्जाव केल्याने उपस्थित समाजबांधव आणि महिलांच्या भावना भडकल्या . संतप्त झालेल्या तीनशे ते चारशे महिला व पुरु षांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयावरच हल्लाबोल केला. आणि कार्यालयाला घेराव घालून आम्हाला दफनभूमीची जागा द्या अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर मृतदेह दफन करू . काही तरु णांनी टिकाव ,फावडे घेऊन खड्डा खोदण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपसरपंच हरी रामदास देवरे ,भाऊसाहेब शिरसाठ आदींनी आदिवासींना बांधवाना शांततेचे आवाहन करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र संतप्त महिला व पुरु ष आपल्या भूमिकेवर ठाम होते. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस पाटलांनी पोलिसांना पाचारण केले. जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आदिवासी बांधवांच्या भावना लक्षात घेऊन जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र चार तास उलटूनही तोडगा निघत नव्हता. दुसरीकडे मृतदेहाची हेळसांड होत असल्यामुळे आदिवासींच्या भावना अधिकच भडकल्या संतप्त जमाव पोलिसांवर चालून आला. हा प्रकार पाहून पोलीस निरीक्षक ठाकूरवाड यांनी तत्काळ प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे यांना पाचारण केले. धिवरे यांनी उपसरपंच देवरे ,ग्रामसेवक हिरे आणि आदिवासी बांधवांची बैठक घेतली. यावेळी शेतकरी युवराज वाघ यांनी मृतदेहाची हेळसांड होऊ नये म्हणून आपल्या शेतालगत पूर्वीच्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचे आवाहन करून विधी आटोपून जागेबाबत तोडगा काढू अशी सामंजस्याची भूमिका घेतल्याने अंत्यविधीचा मार्ग मोकळा करण्यात आला.