शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट, स्टील महागल्याने बांधकाम व्यवसाय अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:16 IST

नाशिक : स्टील व सिमेंटच्या किमती वाढल्याने बांधकाम व्यवसाय अडचणीत आला असून इमारत बांधकाम खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ ...

नाशिक : स्टील व सिमेंटच्या किमती वाढल्याने बांधकाम व्यवसाय अडचणीत आला असून इमारत बांधकाम खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचा थेट परिमाम घरांच्या किमतीवर होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्नही महाग होत असून विविध विकासकामांच्या खर्चातही वाढ होत असल्याने दरवाढीचा विकासावरही विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायातील सिमेंट व स्टीलसारख्या महत्त्वाच्या साहित्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने नियंत्रक प्राधिकरण नेमण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांकडून होत आहे. सिमेंट व स्टील कंपनीच्या नफेखोरीच्या विरोधात राज्यसभा व लोकसभा यामध्ये देखील चर्चा होऊन सिमेंटच्या कृत्रिम दरवाढीचा सामान्य माणसांवर बोजा पडू नये. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी व दरवाढीच्या निषेधासाठी देशभरासह पूर्ण नाशिक जिल्ह्यातील बांधकामे शुक्रवारी बंद ठेवण्यात आली होती. ‘बीआयए’तर्फे पुकारलेल्या या संपात अन्य बांधकाम संघटनाही सहभागी झाल्यामुळे शुक्रवारी शहर व जिल्ह्यातील सर्व नवीन बांधकामे तसेच सरकारी कामेही बंद ठेवण्यात आल्याची माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष राहुल सूर्यवंशी यांनी दिली. दरम्यान, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे व मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक यांना देण्यात यासंदर्भात निवेदन देण्यात आलेे. यावेळी बीएआयच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, माजी अध्यक्ष अविनाश पाटील, मोहन कटारिया, रामेश्वर मालानी, मदन जगोटा, राजेंद्र मुथा आदी उपस्थित होते.

कोट-

देशातील गृहनिर्माणसाठी सर्वाधिक म्हणजे सुमारे ५५ ते ६५ टक्के सिमेंट व स्टीलचा वापर करण्यात येतो. हेच प्रमाण वाणिज्य व औद्योगिक बांधकामासाठी १० ते १५ टक्के, मूलभूत सुविधांसाठी १५ ते २५ टक्के व औद्योगिक निर्माणासाठी ५ ते १५ टक्के आहे. यामुळे वाढलेल्या दरांचा सर्वाधिक फटका हा गृहनिर्माण क्षेत्राला बसणार आहे.

- राहुल सूर्यवंशी, अध्यक्ष, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया

===Photopath===

120221\12nsk_48_12022021_13.jpg

===Caption===

पालकमंत्री छगन भूजबळ यांना निवेदन देतांना बीएआय नाशिक शाखेचे अध्यक्ष राहुल सूर्यवंश. समवेत माजी अध्यक्ष अविनाश पाटील, मोहन कटारिया,रामेश्वर मालानी, मदन जगोटा, राजेंद्र मुथा, भाऊसाहेब सांगळे , मनोज खांडेकर,  विलास निफाडे , सुरेश पवार , शिवाजी घुले , प्रवीण जाधव ,अमित अटल , गोरख काटकर , जोशी जोसेफ , प्रशांत सोनजे , महेश भामरे , रमेश शिरसाट व महेंद्र पाटील आदी