शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

सीमेंट बंधाऱ्याचे काम निकृष्ट

By admin | Updated: July 28, 2016 00:41 IST

ग्रामस्थ आक्रमक : अधिकारी, ठेकेदाराविरु द्ध कारवाईची मागणी

 पिळकोस : कळवण तालुक्यातील रवळजी येथे तीन महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेल्या सीमेंट प्लग बंधाऱ्यातून नुकत्याच झालेल्या पावसानंतर मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाल्याने या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी, संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी व बंधाऱ्याची दुरुस्ती होऊन गळती त्वरित थांबवावी, अशी मागणी रवळजीचे ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य भास्कर भालेराव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.या निकृष्ट बांधकामासंदर्भात शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भास्कर भालेराव यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी व तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना दहा दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते. संबंधितांकडून याची कुठलीच दखल घेतली न गेल्यामुळे आता गावातील शिष्टमंडळ घेऊन जलसंधारणमंत्र्यांकडे दाद मागण्यास जाणार असल्याचे व त्यानंतर ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्यावर कडक कारवाईसाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात येत्या दोन-तीन दिवसांत ग्रामस्थांसह आमरण उपोषणास बसणार असल्याचे ग्रामस्थ आणि भालेराव यांच्याकडून सांगण्यात आले.कळवण तालुक्यात जलसंधारणाची जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागामार्फत मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत; मात्र या कामांच्या दर्जाबाबत शंका निर्माण होईल अशा पद्धतीने तालुक्यात कामे केली गेली आहेत, असे आरोपही सर्वत्र होत आहेत. लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी व एजन्सी यांचे एकमेकात हितसंबंध जुळल्याने निकृष्ट कामाची मालिका सुरू आहे. तालुक्यातील रवळजी येथे मोठ्या नाल्यावर लक्षावधी रु पये खर्च करून सीमेंट प्लग बंधारा बांधण्यात आला. नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे बंधारा पूर्णपणे भरला. परंतु निकृष्ट कामाचा नमुना असलेल्या या बंधाऱ्यात पावसाचे पाणी साचले खरे; पण या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने बंधारा रिकामा होऊ लागला आहे. यामुळे जलसंधारण करण्याच्या मूळ उद्देशाला कळवण तालुक्यात हरताळ फासला गेला आहे.रवळजी येथे बांधण्यात आलेला सीमेंट प्लग बंधारा एप्रिल महिन्यात बांधून पूर्ण करण्यात आला. बंधारा तयार करतेवेळी यात मोठ्या प्रमाणात दगड टाकण्यात आले. याबद्दल भास्कर भालेराव यांनी स्वत: संबंधित विभागाकडे तोंडी तक्रार केली; मात्र याकडे दुर्लक्ष करत कुठलाही संबंधित विभागाचा अधिकारी कामाच्या ठिकाणी पाहणीसाठी आला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या तक्रारीला न जुमानता, ठेकेदाराला पाठीशी घालून बंधारा कामात दगड वापरणाऱ्या ठेकेदाराला अभय दिले, असा आरोपही ग्रामस्थांकडून होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी व्हावी व ठेकेदारावर कारवाई व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी असून, येत्या दोन-तीन दिवसांत याची चौकशी सुरू न झाल्यास आमरण उपोषणास बसणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.दहा दिवसांपूर्वी तालुक्यातील तहसीलदार, प्रांत अधिकारी, गटविकास अधिकारी, शाखा अभियंता लघु पाटबंधारे विभाग यांना बंधारा गळतीबाबत निवेदन देऊनही त्यांनी ग्रामस्थांच्या निवेदनाला कुठलीच दाद दिली नसून त्यांच्याकडून ठोस कारवाई होत नसल्यामुळे रवळजी गावाचे शिष्टमंडळ घेऊन जलसंधारणमंत्र्यांकडे अधिकारी व ठेकेदार यांच्याविरु द्ध दाद मागणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)