शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
3
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
5
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
6
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
7
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
8
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
9
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
10
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
11
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
12
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
13
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
15
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
16
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
17
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
18
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
19
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
20
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?

आघाडीतील रुसवे-फुगवे पराभवाला कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 01:10 IST

नरेंद्र मोदींची लाट सर्वत्र मोठ्या प्रमाणावर असली तरी, उमेदवार बदलाचा म्हणा किंवा ऐनवेळी पक्षप्रवेश करणाऱ्यांचा फटका भाजप उमेदवाराला बसल्याचे चित्र नांदगाव विधानसभा मतदारसंघात दिसत आहे.

नरेंद्र मोदींची लाट सर्वत्र मोठ्या प्रमाणावर असली तरी, उमेदवार बदलाचा म्हणा किंवा ऐनवेळी पक्षप्रवेश करणाऱ्यांचा फटका भाजप उमेदवाराला बसल्याचे चित्र नांदगाव विधानसभा मतदारसंघात दिसत आहे. यापूर्वी भाजपला २००९ व २०१४ मध्ये नांदगाव विधासभा मतदारसंघातून लाखाच्या आसपास मतांची आघाडी मिळाली होती. या पार्श्वभूमीवर यंदा डॉ. भारती पवार यांना मिळालेली मतांची आघाडी भाजपच्या प्रतिष्ठेला शोभणारी नक्कीच नाही. याचवेळी विरोधी मतांची झालेली विभागणी सर्वच विरोधी पक्षांना अंतर्मुख करणारी आहे. प्रचारादरम्यान राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी झालेल्या शरद पवार यांच्या सभेचा अपवाद वगळता इतर कोणत्याही पक्षाच्या उमेवारासाठी नांदगावी मोठ्या नेत्याची सभा झालेली नाही. राजकीय पटलावर नव्याने उदयास आलेल्या बहुजन वंचित आघाडीचा फॅक्टर तालुक्यात आगामी राजकारणासाठी दिशादर्शक ठरणारा आहे. तालुक्यात माकपाच्या मतदारांची संख्या निश्चित आहे. त्यामुळे माकपाच्या उमेदवारीचा फारसा प्रभाव जाणवला नाही. मनसेचा प्रभाव अगदी किरकोळ असून, बसपाने दिलेली उमेदवारी केवळ मतांची राष्ट्रीय टक्केवारी वाढावी या उद्देशाने दिसते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर राष्टÑवादीने प्रचारास सुरुवात केली तरी कॉँग्रेस कार्यकर्ते आणि नेते प्रचारात सक्रिय झाले नव्हते. त्यांचा रुसवा-फुगवा घालविण्यातच आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांचा वेळ गेला. कॉँग्रेस कार्यकर्ते नंतर सक्रिय झालेही मात्र त्याचा परिणाम दिसून आला नाही. याउलट साडेचार वर्षं राज्यात भाजप-शिवसेना आमने-सामने असल्यामुळे निवडणुकीत युती होते की नाही अशी स्थिती होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर वरिष्ठ पातळीवर युतीची घोषणा होऊन दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवर मनोमीलन मेळावे घेतल्याने भाजपबरोबरच शिवसेनेचे कार्यकर्तेही कंबर कसून कामाला लागल्याने त्याचा फायदा झाला.या निकालाचा पुढील विधानसभेवर काय परिणामलोकसभेच्या महाद्वारातून विधानसभेचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी झपाटलेल्या भाजप व शिवसेनेमधील इच्छुकांच्या अस्तित्वाचा घटक म्हणजे ही लढाई होती. लोकसभेत भाजप उमेदवाराचा विजय ही शिवसेनेची अडचण मानली जात आहे. यापूर्वी सेनेचे दोन आमदार झाले असले तरी, मोदींच्या नेतृत्वाखाली असलेला भाजप तिकिटात बाजी मारेल आणि जागावाटपात सेनेचा हक्क डावलला जाईल अशी भीती त्यांना वाटते. परंपरेने ही जागा कॉँग्रेसची आहे. राष्ट्रवादीने ती हिसकावून घेतली याचे शल्य काँगे्रसच्या मनात आहे. जी भीती शिवसेना-भाजप युतीमध्ये आहे तीच भीती कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीतही आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालdindori-pcदिंडोरी