शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

वरुणराजाच्या साक्षीने मांजरपाड्याचे जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:47 IST

दिंडोरी/येवला : घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा राज्यातील पहिला देवसाने (मांजरपाडा) प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पाचे जलपूजन वरुणराजाच्या साक्षीने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते श्रीफळ वाहून व फलक अनावरणाने करण्यात आले. यावेळी दिंडोरी, चांदवड, निफाड व येवल्यातील शेतकरी उपस्थित होते.

ठळक मुद्देपाणी वळविल्यास राज्य दुष्काळमुक्त : भुजबळ

दिंडोरी/येवला : घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा राज्यातील पहिला देवसाने (मांजरपाडा) प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पाचे जलपूजन वरुणराजाच्या साक्षीने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते श्रीफळ वाहून व फलक अनावरणाने करण्यात आले. यावेळी दिंडोरी, चांदवड, निफाड व येवल्यातील शेतकरी उपस्थित होते.महाराष्ट्राच्या धरतीवर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब अडवून वळविला तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. पाणी वळविल्यामुळे गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी महाराष्ट्राला मिळू शकले. आता नार-पारचे पाणी शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री, आमदार छगन भुजबळ यांनी केले. वाहून जाणारे पावसाचे पाणी देवसाने प्रकल्पाद्वारे पुणेगाव धरणात येऊ लागले आहे. धरणातून शेतकºयांना नवसंजीवनी मिळाली असल्याच्या प्रतिक्रि या यावेळी उमटत होत्या. (पान ५ वर)आमदार भुजबळ यांनी यावेळी सदर प्रकल्पाचा प्रवास विशद केला. शासनाने पाच वळणयोजना रद्द केल्या, त्या पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नार-पार प्रकल्पाचे पाणी स्थानिक शेतकरी व महाराष्ट्रातील शेतकºयांना मिळावे, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पासाठी जमीन देणारे सर्व शेतकरी व प्रकल्पास सहकार्य करणाºया सर्वांचे आभार मानले.यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार धनराज महाले, दिलीप बनकर, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, जयवंतराव जाधव, रंजन ठाकरे, कोंडाजी आव्हाड, गजानन शेलार, दिलीप खैरे, अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगळे, राधाकिसन सोनवणे, संजय बनकर, महेंद्र काले, साहेबराव मढवई, अरु ण थोरात, भास्करराव भगरे, विजय पाटील, डॉ. योगेश गोसावी आदींसह येवला, चांदवड, नांदगाव, दिंडोरी, निफाड तालुक्यातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.घाटमाथ्यावरून गुजरातसह समुद्राकडे वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोºयात वळविण्यासाठी बारा वळणयोजना व मांजरपाडा प्रकल्पांतर्गत ३४५० मीटर लांबीचे धरण व १०.१६ कि.मी. लांबीच्या बोगद्याद्वारे पाणी पुणेगाव धरणात वळविण्यात आले आहे.झिरवाळ यांनी वेधून घेतले लक्षआमदार नरहरी झिरवाळ यांचे साधे राहणीमान सर्वांना परिचित आहे. जलपूजन सोहळ्याच्यावेळी जोरदार पाऊस पडत होता. त्यावेळी झिरवाळ हे पावसापासून बचाव करण्यासाठी पारंपरिक घोंगडी पांघरून कार्यक्र मास उपस्थित होते. त्यांचे घोंगडी पांघरणे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.