शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

वरुणराजाच्या साक्षीने मांजरपाड्याचे जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:47 IST

दिंडोरी/येवला : घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा राज्यातील पहिला देवसाने (मांजरपाडा) प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पाचे जलपूजन वरुणराजाच्या साक्षीने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते श्रीफळ वाहून व फलक अनावरणाने करण्यात आले. यावेळी दिंडोरी, चांदवड, निफाड व येवल्यातील शेतकरी उपस्थित होते.

ठळक मुद्देपाणी वळविल्यास राज्य दुष्काळमुक्त : भुजबळ

दिंडोरी/येवला : घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा राज्यातील पहिला देवसाने (मांजरपाडा) प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पाचे जलपूजन वरुणराजाच्या साक्षीने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते श्रीफळ वाहून व फलक अनावरणाने करण्यात आले. यावेळी दिंडोरी, चांदवड, निफाड व येवल्यातील शेतकरी उपस्थित होते.महाराष्ट्राच्या धरतीवर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब अडवून वळविला तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. पाणी वळविल्यामुळे गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी महाराष्ट्राला मिळू शकले. आता नार-पारचे पाणी शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री, आमदार छगन भुजबळ यांनी केले. वाहून जाणारे पावसाचे पाणी देवसाने प्रकल्पाद्वारे पुणेगाव धरणात येऊ लागले आहे. धरणातून शेतकºयांना नवसंजीवनी मिळाली असल्याच्या प्रतिक्रि या यावेळी उमटत होत्या. (पान ५ वर)आमदार भुजबळ यांनी यावेळी सदर प्रकल्पाचा प्रवास विशद केला. शासनाने पाच वळणयोजना रद्द केल्या, त्या पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नार-पार प्रकल्पाचे पाणी स्थानिक शेतकरी व महाराष्ट्रातील शेतकºयांना मिळावे, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पासाठी जमीन देणारे सर्व शेतकरी व प्रकल्पास सहकार्य करणाºया सर्वांचे आभार मानले.यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार धनराज महाले, दिलीप बनकर, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, जयवंतराव जाधव, रंजन ठाकरे, कोंडाजी आव्हाड, गजानन शेलार, दिलीप खैरे, अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगळे, राधाकिसन सोनवणे, संजय बनकर, महेंद्र काले, साहेबराव मढवई, अरु ण थोरात, भास्करराव भगरे, विजय पाटील, डॉ. योगेश गोसावी आदींसह येवला, चांदवड, नांदगाव, दिंडोरी, निफाड तालुक्यातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.घाटमाथ्यावरून गुजरातसह समुद्राकडे वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोºयात वळविण्यासाठी बारा वळणयोजना व मांजरपाडा प्रकल्पांतर्गत ३४५० मीटर लांबीचे धरण व १०.१६ कि.मी. लांबीच्या बोगद्याद्वारे पाणी पुणेगाव धरणात वळविण्यात आले आहे.झिरवाळ यांनी वेधून घेतले लक्षआमदार नरहरी झिरवाळ यांचे साधे राहणीमान सर्वांना परिचित आहे. जलपूजन सोहळ्याच्यावेळी जोरदार पाऊस पडत होता. त्यावेळी झिरवाळ हे पावसापासून बचाव करण्यासाठी पारंपरिक घोंगडी पांघरून कार्यक्र मास उपस्थित होते. त्यांचे घोंगडी पांघरणे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.