शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजाच्या साक्षीने मांजरपाड्याचे जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:47 IST

दिंडोरी/येवला : घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा राज्यातील पहिला देवसाने (मांजरपाडा) प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पाचे जलपूजन वरुणराजाच्या साक्षीने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते श्रीफळ वाहून व फलक अनावरणाने करण्यात आले. यावेळी दिंडोरी, चांदवड, निफाड व येवल्यातील शेतकरी उपस्थित होते.

ठळक मुद्देपाणी वळविल्यास राज्य दुष्काळमुक्त : भुजबळ

दिंडोरी/येवला : घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा राज्यातील पहिला देवसाने (मांजरपाडा) प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पाचे जलपूजन वरुणराजाच्या साक्षीने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते श्रीफळ वाहून व फलक अनावरणाने करण्यात आले. यावेळी दिंडोरी, चांदवड, निफाड व येवल्यातील शेतकरी उपस्थित होते.महाराष्ट्राच्या धरतीवर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब अडवून वळविला तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. पाणी वळविल्यामुळे गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी महाराष्ट्राला मिळू शकले. आता नार-पारचे पाणी शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री, आमदार छगन भुजबळ यांनी केले. वाहून जाणारे पावसाचे पाणी देवसाने प्रकल्पाद्वारे पुणेगाव धरणात येऊ लागले आहे. धरणातून शेतकºयांना नवसंजीवनी मिळाली असल्याच्या प्रतिक्रि या यावेळी उमटत होत्या. (पान ५ वर)आमदार भुजबळ यांनी यावेळी सदर प्रकल्पाचा प्रवास विशद केला. शासनाने पाच वळणयोजना रद्द केल्या, त्या पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नार-पार प्रकल्पाचे पाणी स्थानिक शेतकरी व महाराष्ट्रातील शेतकºयांना मिळावे, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पासाठी जमीन देणारे सर्व शेतकरी व प्रकल्पास सहकार्य करणाºया सर्वांचे आभार मानले.यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार धनराज महाले, दिलीप बनकर, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, जयवंतराव जाधव, रंजन ठाकरे, कोंडाजी आव्हाड, गजानन शेलार, दिलीप खैरे, अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगळे, राधाकिसन सोनवणे, संजय बनकर, महेंद्र काले, साहेबराव मढवई, अरु ण थोरात, भास्करराव भगरे, विजय पाटील, डॉ. योगेश गोसावी आदींसह येवला, चांदवड, नांदगाव, दिंडोरी, निफाड तालुक्यातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.घाटमाथ्यावरून गुजरातसह समुद्राकडे वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोºयात वळविण्यासाठी बारा वळणयोजना व मांजरपाडा प्रकल्पांतर्गत ३४५० मीटर लांबीचे धरण व १०.१६ कि.मी. लांबीच्या बोगद्याद्वारे पाणी पुणेगाव धरणात वळविण्यात आले आहे.झिरवाळ यांनी वेधून घेतले लक्षआमदार नरहरी झिरवाळ यांचे साधे राहणीमान सर्वांना परिचित आहे. जलपूजन सोहळ्याच्यावेळी जोरदार पाऊस पडत होता. त्यावेळी झिरवाळ हे पावसापासून बचाव करण्यासाठी पारंपरिक घोंगडी पांघरून कार्यक्र मास उपस्थित होते. त्यांचे घोंगडी पांघरणे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.