शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

वरुणराजाच्या साक्षीने मांजरपाड्याचे जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:47 IST

दिंडोरी/येवला : घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा राज्यातील पहिला देवसाने (मांजरपाडा) प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पाचे जलपूजन वरुणराजाच्या साक्षीने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते श्रीफळ वाहून व फलक अनावरणाने करण्यात आले. यावेळी दिंडोरी, चांदवड, निफाड व येवल्यातील शेतकरी उपस्थित होते.

ठळक मुद्देपाणी वळविल्यास राज्य दुष्काळमुक्त : भुजबळ

दिंडोरी/येवला : घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा राज्यातील पहिला देवसाने (मांजरपाडा) प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पाचे जलपूजन वरुणराजाच्या साक्षीने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते श्रीफळ वाहून व फलक अनावरणाने करण्यात आले. यावेळी दिंडोरी, चांदवड, निफाड व येवल्यातील शेतकरी उपस्थित होते.महाराष्ट्राच्या धरतीवर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब अडवून वळविला तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. पाणी वळविल्यामुळे गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी महाराष्ट्राला मिळू शकले. आता नार-पारचे पाणी शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री, आमदार छगन भुजबळ यांनी केले. वाहून जाणारे पावसाचे पाणी देवसाने प्रकल्पाद्वारे पुणेगाव धरणात येऊ लागले आहे. धरणातून शेतकºयांना नवसंजीवनी मिळाली असल्याच्या प्रतिक्रि या यावेळी उमटत होत्या. (पान ५ वर)आमदार भुजबळ यांनी यावेळी सदर प्रकल्पाचा प्रवास विशद केला. शासनाने पाच वळणयोजना रद्द केल्या, त्या पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नार-पार प्रकल्पाचे पाणी स्थानिक शेतकरी व महाराष्ट्रातील शेतकºयांना मिळावे, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पासाठी जमीन देणारे सर्व शेतकरी व प्रकल्पास सहकार्य करणाºया सर्वांचे आभार मानले.यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार धनराज महाले, दिलीप बनकर, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, जयवंतराव जाधव, रंजन ठाकरे, कोंडाजी आव्हाड, गजानन शेलार, दिलीप खैरे, अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगळे, राधाकिसन सोनवणे, संजय बनकर, महेंद्र काले, साहेबराव मढवई, अरु ण थोरात, भास्करराव भगरे, विजय पाटील, डॉ. योगेश गोसावी आदींसह येवला, चांदवड, नांदगाव, दिंडोरी, निफाड तालुक्यातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.घाटमाथ्यावरून गुजरातसह समुद्राकडे वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोºयात वळविण्यासाठी बारा वळणयोजना व मांजरपाडा प्रकल्पांतर्गत ३४५० मीटर लांबीचे धरण व १०.१६ कि.मी. लांबीच्या बोगद्याद्वारे पाणी पुणेगाव धरणात वळविण्यात आले आहे.झिरवाळ यांनी वेधून घेतले लक्षआमदार नरहरी झिरवाळ यांचे साधे राहणीमान सर्वांना परिचित आहे. जलपूजन सोहळ्याच्यावेळी जोरदार पाऊस पडत होता. त्यावेळी झिरवाळ हे पावसापासून बचाव करण्यासाठी पारंपरिक घोंगडी पांघरून कार्यक्र मास उपस्थित होते. त्यांचे घोंगडी पांघरणे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.