शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
4
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
5
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
6
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
7
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
8
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
9
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
10
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
11
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
12
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
13
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
15
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
16
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
17
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
18
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
19
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
20
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ

समाजविकासासाठी व्हावे जातिनिर्मूलन

By admin | Updated: October 17, 2016 00:30 IST

हरी नरके : धम्मचक्र प्रवर्तन हीरकमहोत्सवात प्रतिपादन

 नाशिक : महाराष्ट्र सध्या ज्वलंत वातावरणातून जात असताना जातीय व्यवस्थेविषयी जागृती होणे अपेक्षित असून, समाजविकासासाठी जातिनिर्मूलन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. हरी नरके यांनी के ले.बौद्ध साहित्य मंडळातर्फे कालिदास कलामंदिर येथे धम्मचक्र प्रवर्तन हीरकमहोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘जातिनिर्मूलन आजच्या काळाची गरज’ विषयावर डॉ. हरी नरके बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बौैद्ध साहित्य मंडळाचे अध्यक्ष अतुल भोसेकर, भारत तेजाळे, रवि पगारे, पद्माकर भालेराव उपस्थित होते. नरके म्हणाले, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या जाती निर्मूलनविषयक विचारांचे अनुकरण करणाऱ्यांची संख्या अल्प प्रमाणात आहे. सध्या समाजातील दोन नेते एकत्र आले तर तीन पक्ष तयार होतात. ही स्थिती जातीय व्यवस्थेमुळेच असल्याचे सांगताना त्यांनी आजच्या स्थितीत जातिनिर्मूलनासाठी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या शिक्षण, ज्ञाननिर्मिती, स्त्रियांना समान अधिकार, संपत्तीच्या स्रोतांचे पुनर्वाटप, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आंतरजातीय विवाह व चिकित्सात्मक दृष्टिकोन मार्गावर पुढे जाण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. भारतीय समाज व्यवस्थेत उत्पन्नाच्या स्रोतांचे जातीनिहाय वाटप झाले असल्याने ज्यांचे उत्पन्न घटले त्यांना ही वस्तुस्थिती निदर्शनास आणून देणे आवश्यक असून, त्यांना जातीनिर्मूलनाच्या प्रवाहात सामील करून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, पुणे येथील काही विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘अनहिलेशन आॅफ कास्ट’ भाषणाचे नाट्य अभिवाचन केले. (प्रतिनिधी)