शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
2
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
3
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
4
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
5
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
6
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
7
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
8
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
9
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
10
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
11
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
12
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
13
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
14
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
15
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
16
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
17
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
18
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
19
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
20
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!

ग्रामस्थांना दिले जातात कॅशलेस व्यवहाराचे धडे

By admin | Updated: January 9, 2017 01:01 IST

येवला : तालुक्यात जिल्हा बँकेच्या पुढाकारातून जनजागृती

येवला : आर्थिक व्यवहारांची पद्धत बदलली असली तरी आजही नागरिकांमध्ये नव्या पद्धतीविषयी अज्ञान आहे. भविष्यात अनेक व्यवहार आॅनलाइन होणार असल्याने याची माहिती ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांना व्हावी या हेतूने जिल्हा बँकेने कॅशलेस व्यवहार कशा पद्धतीने पार पाडले जातात याची सविस्तर माहिती देण्यासाठी तालुक्यात कॅशलेस व्यवहार साक्षरता मार्गदर्शन सुरू केले आहे. या अंतर्गत मातोश्री तंत्रनिकेतनचे प्राचार्य गीतेश गुजराथी गावोगावी प्रात्यक्षिके दाखवत नागरिकांना माहिती करून देत आहेत.जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे व संचालक किशोर दराडे यांच्या पुढाकारातून येथील विभागीय कार्यालयाने मोठ्या लोकसंख्या असलेल्या १९ गावांमध्ये या डिजिटल साक्षरता शिबिराचे आयोजन केले आहे.आत्तापर्यंत अनकाई, सावरगाव, रहाडी, गवंडगाव, अंदरसूल, मुखेड, जळगाव नेऊर व देशमाने या गावांमध्ये कॅशलेस साक्षरता कार्यशाळा झाली आहे. शेतकरी व व्यावसायिकांनीही या उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रा. गुजराथी विविध चित्रफितींच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत आहेत. आगामी काळात कॅशलेस व्यवहार शिकणे हे प्रत्येकासाठी गरजेचे आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा मोबदलासुद्धा आता धनादेशाच्या रूपातच मिळणार आहे, तर बी-बियाणे आणि खते आदिंची खरेदीसुद्धा पीओएसच्या माध्यमातून करावी लागणार आहे. त्यामुळे कॅशलेस व्यवहार प्रत्येकाने शिकणे ही काळाची गरज असल्याचे प्रा. गुजराथी शेतकऱ्यांना पटवून देत आहेत. या शिबिरात कॅशलेस व्यवहाराकरिता शासनाने उपलब्ध करून दिलेल्या चित्रफीत तसेच सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कॅशलेस व्यवहाराचे महत्त्व पटवून दिले. प्रा. गुजराथी यांनी आपल्या खात्यातून आॅनलाइन पैसे दुसऱ्याला पाठवणे, केलेल्या व्यवहारांची माहिती घेणे, बॅँक स्टेटमेंट काढणे, मोबाइल बिल, लाइट बिल, इन्शुरन्स प्रीमियम, सुटीच्या दिवशी किंवा बँक बंद असताना व्यवहार कसे करायचे, त्याचे फायदे कोणते, अडचणीच्या काळात मोबाइल बँकिंग कशी महत्त्वाची ठरते, या माध्यमातून साध्या मोबाइलवरून व्यवहार कसे करावे, रोखीच्या व्यवहाराचे तोटे व त्यावर कॅशलेस व्यवहाराचे फायदे, एटीएमद्वारे पैसे काढणे, स्वाइप व पीओएस मशीनचा वापर करणे, विविध मोबाइल अ‍ॅपचा उपयोग करणे याची प्रात्यक्षिके दाखवत सविस्तर माहिती दिली. आॅनलाइन तसेच मोबाइल बॅँकिंग व्यवहार करताना सुरक्षेच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी याविषयीसुद्धा ते मार्गदर्शन करत आहेत. बँकेचे विभागीय अधिकारी एस. एस. पैठणकर, जिल्हा बँकेचे अधिकारी प्रवीण तनपुरे, बी. के. कदम, मातोश्री पॉलिटेक्निकचे प्रा. वैभव धांडे, ज्ञानेश्वर वाघ व वैभव कानडे संयोजन करत आहेत. दरम्यान, मंगळवारी धूळगाव, पाटोदा, आडगाव रेपाळ येथे, तर बुधवारी कुसमाडी, नगरसूल, राजापूर येथे, निमगाव मढ, महालखेडा व येवला येथे साक्षरता शिबिर घेण्याचे नियोजन आहे. (वार्ताहर)