शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

नाश्त्याला काजू-बदाम आणि बाटलीबंद पाणी!

By admin | Updated: November 18, 2016 07:37 IST

हा अनुभव पाहता, संस्थाचालकांचे आदिवासी विकास विभागाशी कसे साटेलोटे आहे, याचेच प्रदर्शन घडले.

नाशिक : स्वागताला फुलांचा पुष्पगुच्छ, पिण्यासाठी बाटलीबंद पाणी, नाश्त्याला काजू, बदाम पाहून आश्चर्यचकित झालेल्या महिलांच्या पथकाला आश्रमशाळांच्या संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी आणखी एक धक्का दिला तो म्हणजे पथकाकडे असलेल्या प्रश्नावलीची नक्कल प्रत दाखवून! कळवण तालुक्यातील आश्रमशाळेत तपासणीसाठी गेलेल्या पथकाला बुधवारी आलेला हा अनुभव पाहता, संस्थाचालकांचे आदिवासी विकास विभागाशी कसे साटेलोटे आहे, याचेच प्रदर्शन घडले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळांची तपासणी केली जात आहे. त्यासाठी तपास पथके नेमण्यात आली आहेत. हे पथक आले की, आश्रमशाळांमध्ये त्यांच्यासाठी फक्त पायघड्याच घालायच्या बाकी असतात. या आदरातिथ्यामुळे पथकातील काही जणांना मेल्याहून मेल्यासारखे होत आहे... पण ते तरी काय बिचारे, असेच चित्र पांहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील शासकीय व खासगी अनुदानित अशा सुमारे १८० आश्रमशाळांच्या तपासणीसाठी ३० पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. बुधवारपासून त्यांनी तपासणी मोहीम सुरू केली. पथकांनी अचानक आश्रमशाळांना भेटी देऊन तेथील वास्तव जाणून घेत, मुलींशी संवाद साधावा व वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे शासनाला अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र आश्रमशाळा संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी या तपासणीपूर्वीच तयारी करून ठेवल्याचे अनुभव आता पथकांना येत आहेत. कळवण तालुक्यातील एका आश्रमशाळेवर पथक धडकताच, तेथील मुख्याध्यापक व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन पथकप्रमुख व सदस्यांचे स्वागत केले. त्यानंतर पिण्यासाठी बिसलरीच्या बाटल्याही आणून ठेवल्या होत्या. आश्रमशाळेतील जेवणाचा दर्जा पथकाने तपासू नये, म्हणून पाच वाजता म्हणजे शाळेच्या वेळेतच विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले होते. पथकाने ज्या प्रश्नावलीच्या आधारे आश्रमशाळांची तपासणी व माहिती संकलित करावयाची होती, त्याची नक्कल प्रत आश्रमशाळा व्यवस्थापनाकडे अगोेदरच उपलब्ध असल्याचा अनुभवही पथकाला आला, त्यामुळे त्यांनी प्रश्नावलीनुसार प्रश्न विचारण्यास सुरुवात करताच, त्यांना आगाऊच सर्व प्रश्नांची उत्तरे पाठ केल्यागत पटापट देण्यात आली. एवढेच नव्हे तर पथकासमोर विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेचे वास्तव मांडू नये म्हणूनही काळजी घेण्यात आली होती, त्यामुळे विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे पाठ करूनच देत असल्याचे उघड झाले. (प्रतिनिधी)