शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

गिरणा धरण जलवाहिनीच्या पाणी गळतीकडे काणाडोळा

By admin | Updated: September 8, 2015 22:48 IST

अपव्यय : मालेगावी दुष्काळात तेरावा महिना

मालेगाव : येथील महानगरपालिकेने पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हद्दीत दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दुसरीकडे येथील गिरणा पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पाणी गळतीकडे काणाडोळा केला आहे. ही गळती थांबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यात धरणात पाणी साठा नसल्याने पाणी जपून वापरण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर चणकापूर व गिरणा धरणातील पाणी साठ्याचा अंदाज घेऊन मनपाने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. असे असताना येथील गिरणा धरण पाणीपुरवठ्याची योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यापूर्वीच जलवाहिनी सडली आहे. त्यामुळे पाण्याची गळती होत आहे. ही गळती दिवसेंदिवस वाढत असून, सध्या सुमारे दोन ते तीन इंच पाणी बाहेर फेकले जात आहे. याविषयी अनेकांना तक्रारी केल्या नंतरही मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने या दुरुस्तीकडे काणाडोळा केला असल्याचे वाया जाणाऱ्या पाण्यावरून दिसून येते. या भागात अहोरात्र सुरू असलेल्या पाणी गळतीने रोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असून, ते परिसरात साचत आहे. त्यामुळे तेथे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ही पाणी गळती थांबविण्याऐवजी मनपाने सरळ दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. या पाणी गळतीला दीड ते दोन वर्ष झाले आहेत. या काळात किती पाणी वाया गेले? हा संशोधनाचा विषय आहे. (प्रतिनिधी)