शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

गिरणा धरण जलवाहिनीच्या पाणी गळतीकडे काणाडोळा

By admin | Updated: September 8, 2015 22:48 IST

अपव्यय : मालेगावी दुष्काळात तेरावा महिना

मालेगाव : येथील महानगरपालिकेने पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हद्दीत दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दुसरीकडे येथील गिरणा पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पाणी गळतीकडे काणाडोळा केला आहे. ही गळती थांबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यात धरणात पाणी साठा नसल्याने पाणी जपून वापरण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर चणकापूर व गिरणा धरणातील पाणी साठ्याचा अंदाज घेऊन मनपाने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. असे असताना येथील गिरणा धरण पाणीपुरवठ्याची योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यापूर्वीच जलवाहिनी सडली आहे. त्यामुळे पाण्याची गळती होत आहे. ही गळती दिवसेंदिवस वाढत असून, सध्या सुमारे दोन ते तीन इंच पाणी बाहेर फेकले जात आहे. याविषयी अनेकांना तक्रारी केल्या नंतरही मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने या दुरुस्तीकडे काणाडोळा केला असल्याचे वाया जाणाऱ्या पाण्यावरून दिसून येते. या भागात अहोरात्र सुरू असलेल्या पाणी गळतीने रोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असून, ते परिसरात साचत आहे. त्यामुळे तेथे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ही पाणी गळती थांबविण्याऐवजी मनपाने सरळ दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. या पाणी गळतीला दीड ते दोन वर्ष झाले आहेत. या काळात किती पाणी वाया गेले? हा संशोधनाचा विषय आहे. (प्रतिनिधी)