शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मनपा निवारा केंद्रांत सोशल डिन्स्टन्सिंंगची काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 23:11 IST

लॉकडाउन आणि संचारबंदी काळात स्थलांतरित मजूर कामगार आणि निराश्रितांसाठी उभारण्यात आलेल्या महापालिकेच्या २१ निवारा केंद्रांत सध्या ७०१ नागरिक तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतानाच सोशल डिस्टन्सिंंग पाळले जात आहे.

ठळक मुद्देसंसर्ग टाळण्यासाठी उपाय : एकूण ७०१ नागरिकांना आधार; शहरात २१ केंद्रांमध्ये सोय

नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदी काळात स्थलांतरित मजूर कामगार आणि निराश्रितांसाठी उभारण्यात आलेल्या महापालिकेच्या २१ निवारा केंद्रांत सध्या ७०१ नागरिक तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतानाच सोशल डिस्टन्सिंंग पाळले जात आहे. विशेषत: जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या निवारा केंद्रांत एका स्थलांतरित कामगाराला कोरोनाची लागण झाल्याने महापालिका विशेष काळजी घेत आहे.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेल्या महिन्यात २३ मार्चपासून देशभरात लॉकडाउन आणि संचारबंदी लागू आहे. त्यामुळे मजूर आणि कामगारांची अडचण झाली होती. विशेषत: जिल्हा बंदी आणि राज्य बंदी करण्यात आल्यानंतर अशा मजुरांचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर उपाय म्हणून शहरातील ६ विभागांतील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये एकूण १८ निवाराकेंद्र तसेच राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान अंतर्गत तीन केंद्र असे एकूण २१ निवाराकेंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. या केंद्रांमध्ये मोलमजुरी करणारे कामगार, बेघर, प्रवासी अशा व्यक्तींना तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्यात आलेली आहे. याठिकाणी पाणी, वीज, स्वच्छतागृह व आरोग्य विषयकसारख्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. एकूण १४ निवाराकेंद्रांत महाराष्ट्रासह विविध राज्यातील मोलमजुरी करणारे कामगार व बेघर असे एकूण ७०१ व्यक्ती दाखल झालेले आहेत. तसेच दिशा फाउंडेशन व मनोवेध डेव्हलपमेंट फाउंडेशन या संस्थामार्फत निवारा केंद्रातील व्यक्तींची मानसिकता सकारात्मक करणे, सुरक्षिततेची भावना वाढीस लागावी यासाठी योग, प्राणायाम आणि मानसशास्त्रीय मार्गदर्शन आणि समुपदेशन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. तसेच या ठिकाणी सामायिक अंतर सोशल डिस्टन्स्ािंग पाळण्याची काटेकोर दक्षता घेतली जात आहे. पोलीस विभागामार्फत आवश्यकतेनुसार निवारा केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्तही पुरविण्यात आलेला आहे, अशी माहिती उपायुक्त (समाजकल्याण) तथा प्रभारी शिक्षणाधिकारी अर्चना जाधव-तांबे यांनी दिली.महानगरातील या सर्व निवारा केंद्रांमध्ये दक्षता घेतलीजात असल्याने निराश्रित कामगारांकडूनदेखील या उपाययोजनांना चांगला प्रतिसाद दिला जात आहे. त्यामुळेच कोरोनाच्या विरुद्धची लढाई जिंकणे शक्य होणार आहे.निवारा केंद्रातील दाखल व्यक्तींची महानगरपालिका आरोग्य व वैद्यकीय विभागामार्फत नियमितपणे दररोज आरोग्य तपासणी करण्यात येते. निवारा केंद्राच्या परिसरात वेळोवेळी औषध फवारणी व स्वच्छतेबाबत दक्षता घेतली जात आहे. विशेषत: कोणाला संसर्ग होऊ नये, याबाबत काटेकोर काळजी घेतली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य