शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

मनपा निवारा केंद्रांत सोशल डिन्स्टन्सिंंगची काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 23:11 IST

लॉकडाउन आणि संचारबंदी काळात स्थलांतरित मजूर कामगार आणि निराश्रितांसाठी उभारण्यात आलेल्या महापालिकेच्या २१ निवारा केंद्रांत सध्या ७०१ नागरिक तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतानाच सोशल डिस्टन्सिंंग पाळले जात आहे.

ठळक मुद्देसंसर्ग टाळण्यासाठी उपाय : एकूण ७०१ नागरिकांना आधार; शहरात २१ केंद्रांमध्ये सोय

नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदी काळात स्थलांतरित मजूर कामगार आणि निराश्रितांसाठी उभारण्यात आलेल्या महापालिकेच्या २१ निवारा केंद्रांत सध्या ७०१ नागरिक तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतानाच सोशल डिस्टन्सिंंग पाळले जात आहे. विशेषत: जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या निवारा केंद्रांत एका स्थलांतरित कामगाराला कोरोनाची लागण झाल्याने महापालिका विशेष काळजी घेत आहे.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेल्या महिन्यात २३ मार्चपासून देशभरात लॉकडाउन आणि संचारबंदी लागू आहे. त्यामुळे मजूर आणि कामगारांची अडचण झाली होती. विशेषत: जिल्हा बंदी आणि राज्य बंदी करण्यात आल्यानंतर अशा मजुरांचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर उपाय म्हणून शहरातील ६ विभागांतील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये एकूण १८ निवाराकेंद्र तसेच राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान अंतर्गत तीन केंद्र असे एकूण २१ निवाराकेंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. या केंद्रांमध्ये मोलमजुरी करणारे कामगार, बेघर, प्रवासी अशा व्यक्तींना तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्यात आलेली आहे. याठिकाणी पाणी, वीज, स्वच्छतागृह व आरोग्य विषयकसारख्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. एकूण १४ निवाराकेंद्रांत महाराष्ट्रासह विविध राज्यातील मोलमजुरी करणारे कामगार व बेघर असे एकूण ७०१ व्यक्ती दाखल झालेले आहेत. तसेच दिशा फाउंडेशन व मनोवेध डेव्हलपमेंट फाउंडेशन या संस्थामार्फत निवारा केंद्रातील व्यक्तींची मानसिकता सकारात्मक करणे, सुरक्षिततेची भावना वाढीस लागावी यासाठी योग, प्राणायाम आणि मानसशास्त्रीय मार्गदर्शन आणि समुपदेशन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. तसेच या ठिकाणी सामायिक अंतर सोशल डिस्टन्स्ािंग पाळण्याची काटेकोर दक्षता घेतली जात आहे. पोलीस विभागामार्फत आवश्यकतेनुसार निवारा केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्तही पुरविण्यात आलेला आहे, अशी माहिती उपायुक्त (समाजकल्याण) तथा प्रभारी शिक्षणाधिकारी अर्चना जाधव-तांबे यांनी दिली.महानगरातील या सर्व निवारा केंद्रांमध्ये दक्षता घेतलीजात असल्याने निराश्रित कामगारांकडूनदेखील या उपाययोजनांना चांगला प्रतिसाद दिला जात आहे. त्यामुळेच कोरोनाच्या विरुद्धची लढाई जिंकणे शक्य होणार आहे.निवारा केंद्रातील दाखल व्यक्तींची महानगरपालिका आरोग्य व वैद्यकीय विभागामार्फत नियमितपणे दररोज आरोग्य तपासणी करण्यात येते. निवारा केंद्राच्या परिसरात वेळोवेळी औषध फवारणी व स्वच्छतेबाबत दक्षता घेतली जात आहे. विशेषत: कोणाला संसर्ग होऊ नये, याबाबत काटेकोर काळजी घेतली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य