शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

करपामुळे कोबीचे पिकही धोक्यात

By admin | Updated: September 8, 2015 22:39 IST

शेतकऱ्यांचे नुकसान : महागडी किटकनाशकेही प्रभावी ठरेनात

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस परिसरात मिरचीचे पिक रोगांमुळे वाया जात असल्याने शेतकऱ्यांनी कोबी, टोमॅटो या पिकांतून सरासरी उत्पादन घेणे सुरू केले होते. मात्र यंदाच्या वातावरणाचा फटका या पिकांनाही बसला आहे. पहिल्या, दुसऱ्या दोन्ही टप्यातील कोबीचे पिक करपा ,खोड अळी अशा विविध रोगांना बळी पडल्याने शेतकऱ्यांचे अधिक नुकसान झाले आहे. मात्र महागडी औषधे फवारणी करून शेतकरी ते पिक वाचविण्याची धडपड करत आहेत. पिळकोस परिसरात मिरचीचे पीक खरीप हंगामातील प्रमुख पिक म्हणून पाहिले जायचे. मात्र मिर्चीचे पीकही रोगांना बळी पडू लागल्यामुळे मिर्चीच्या तुलनेत खर्चिक असलेल्या कोबी,टोमॅटो या पिकातून शेतकऱ्यांनी चांगले उतपन्न घेतले होते. परंतु दोन वर्षापासून कोबीच्या पिकातून खर्चही निघत नाही. एकतर बियाण्यात फसवणूक होत आहे अन्यथा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग हताश झाला आहे. एकीकडे पावसाअभावी पिके करपून चालली असून अशातही ज्यांनी शेती केली आहे, ते शेतकरी हे कोबी वाचवण्याची धडपड करत आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही पहिल्या टप्यातील लागवड केलेले कोबीचे पिक रिंग करप्याने उद्वस्त झाले आहे. त्यामुळे पिकांवर महागडी कीटकनाशके फवारली जात आहेत.

 

 

वटारमध्ये पिके धोक्यातवटार : बागलाण तालुक्यातील पश्‍चिम पट्टयातील वटार,डोंगरे, विंचुरे,कंधाने परिसरात सुरूवातीला रिमझिम पाऊस आणि विहीरांच्या थोड्याफार पाण्यावर जगवलेली खरीप पिके पावसाने चांगलीच ओढ दिल्याने आता मात्र वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिळकोस:पावसाअभावी शेतमजूरांनाही कामे नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. काही शेतकर्‍यांनी कोबी आणि टमाटा पिकाची लागवड केली होती. मात्र पिकावर करपा,पाकोळी अशा रोगांचा प्रादुर्भाव असल्याने शेतकर्‍यांचे अधिकच नुकसान झाले आहे.मका,बाजरी ही पिके अत्यंत केविलवाण्या स्थितीत आहेत. पिकांची वाढ खुंटली असून पुढील चार-पाच दिवसात पुरेसा पाऊस न झाल्यास ती पिके वाया जातील. गेल्या आठ दिवसात तर तापमानात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. नदी-नाले कोरडे पडले आहेत. पाण्याअभावी मका, बाजरी ही खरीप पिके सोडली आहे. कोबी पिकाला प्रचंड खर्च झालेला आहे मात्र हे पिकही रोगाला बळी पडत आहे. यंदा कोबी पिकावर फवारणी करूनही फवारणीचा उपयोग होत नाही आहे. उलट फवारणीसाठी केलेला खर्च व्यर्थ ठरतो आहे. यंदा पाऊसच न पडल्याने विहिरी कोरड्या आहेत. पैसा मिळणारे ह्या हंगामातील शेवटचे पिक होते मात्र रोगाच्या प्रादुर्भावाने तेही निम्याहून अधिक खराब झाले असून खर्चही वसूल होईल की नाही अशी परिस्थिती आहे.   - रवींद्र वाघ, शेतकरी, .