शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

थेट सरपंचपदासाठी उमेदवारांमध्ये चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 01:04 IST

: स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये झालेल्या सत्ता हस्तांतरणानंतर होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत व विशेषत: जनतेतून थेट सरपंच निवडण्यात येणार असल्यामुळे गावोगावी अधिक चुरस निर्माण झाल्याचे दाखल झालेल्या उमेदवारी अर्जातून स्पष्ट होत आहे. सरपंचपदाच्या १७१ जागांसाठी ८०९ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिक : स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये झालेल्या सत्ता हस्तांतरणानंतर होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत व विशेषत: जनतेतून थेट सरपंच निवडण्यात येणार असल्यामुळे गावोगावी अधिक चुरस निर्माण झाल्याचे दाखल झालेल्या उमेदवारी अर्जातून स्पष्ट होत आहे. सरपंचपदाच्या १७१ जागांसाठी ८०९ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मुदत संपणाºया नाशिक जिल्ह्णातील १७१ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू झाली असून, शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वच ठिकाणी इच्छुकांची झुंबड उडाली. राज्य सरकारने सरपंचांची थेट जनतेतून निवड करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच होणाºया ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ग्रामीण भागात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. राज्यात झालेले सत्तांतर व त्यापाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही परिवर्तनाचे वारे वाहिल्यामुळे या निवडणुकीत राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविता येणार नसल्या तरी, प्रामुख्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद अजमाविण्याचा निर्णय घेऊन उमेदवारांचे पॅनल तयार केले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढत होत असल्याने निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्याही कमालीची वाढली आहे.  जिल्ह्णात १७१ ग्रामपंचायतींसाठी ५९३ प्रभागातील १६४७ जागांसाठी येत्या ७ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ३९६७ उमेदवारांनी, तर सरपंचपदासाठी ८०९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या सर्व अर्जांची सोमवारी छाननी करण्यात येणार असून, २७ सप्टेंबर रोजी माघारीची अंतिम मुदत व त्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठीही आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्यामुळे उमेदवारांना त्यांच्या खर्चमर्यादेतच उधळपट्टी करता येणार आहे.