शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

उमेदवार असून अडचण नसून खोळंबा

By admin | Updated: February 3, 2017 01:03 IST

सारेच संभ्रमित : राजकीय पक्षांची सावध भूमिका

 नाशिक : यंदा कधी नव्हे ते उमेदवारी निश्चितीवरून राजकीय पक्षांनी कमालीची गोपनीयता बाळगली आहे. युती-आघाडीतील मतभेद पक्षांतरामुळे उमेदवारी मिळविण्यासाठी असलेली रस्सीखेच यामुळे राजकीय पक्षांपुढेच पेच निर्माण झाला आहे. हा पेच केवळ बड्या राजकीय पक्षांपुढेच आहे असे नाही तर लहान-मोठ्या पक्षांनाही आहे. मोठ्या राजकीय पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी तर लहान-मोठ्या पक्षांना चांगल्या उमेदवारांची प्रतीक्षा, असे विचित्र चित्र यंदा निर्माण झाले आहे. महापालिका निवडणुकीत सध्या पक्षांना नव्हे तर उमेदवारांनाच महत्त्व प्राप्त झाले आहे. उमेदवारांचे इतके पीक आले आहे की एकावर एक वरचढ उमेदवार असल्याने आणि लढण्यासाठी त्यांना कोणताही पक्ष वर्ज्य नसल्याने बलाढ्य उमेदवारांसाठी राजकीय पक्षांनी गोपनीयता बाळगली आहे. त्यांचे नाव जाहीर करून निष्ठावान कार्यकर्त्यांना दुखावण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर न करता त्यांना थेट एबी अर्ज देण्याची व्यवस्था केल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी नॉट रिचेबल झाले आहेत. पक्षीय कार्यालयातही कुणी फिरकत नसल्याने उमेदवारांची फरफट झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एका दिवसाचा अवधी शिल्लक असल्याने शुक्रवार, दि. ३ रोजी पक्षीय उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यामध्ये खरी चुरस असणार आहे. पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज मिळाल्यानंतर होणारे शक्तिप्रदर्शन तसेच नाराजांकडून नाराजी उघडपणे दाखविली जाण्याची शक्यता असल्याने वातावरणही काहीसे तणावाचेच राहणार असल्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. भारतीय जनता पार्टीकडे सर्वाधिक इच्छुक उमेदवार आहेत. भाजपामध्ये इनकमिंग जोरात झाल्याने आलेल्या प्रत्येकालाच शब्द देण्यात आल्यामुळे या पक्षापुढेही उमेदवारी वाटपाबाबतचा पेच आहे. अशीच काहीशी परिस्थिती शिवसेनेची आहे. त्यांच्याकडेही इनकमिंग जोरात सुरू झाल्याने त्यांनाही निष्ठावान आणि पक्ष प्रवेश केलेल्यांना सांभाळून उमेदवारी वाटप करावी लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेने आता पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरच उमेदवारांची नावे जाहीर करण्याबाबतची भूमिका घेतली आहे. (प्रतिनिधी)