शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
2
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
3
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
4
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
5
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
6
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
7
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
8
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
9
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
10
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
11
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
12
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
13
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
14
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
15
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
16
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
17
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
18
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
19
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

थांबे रद्द केल्याने प्रवाशांचे हाल

By admin | Updated: August 28, 2016 22:40 IST

निफाड ते नाशिक गैरसोय : एशियाडसह परिवर्तन बसेस रद्द

 निफाड : परिवहन महामंडळाने राज्यातील एशियाड बस विनावाहक करण्याच्या व या बसचे थांबे कमी करण्याच्या निर्णयाचा फटका निफाड व परिसरातील गावांतील प्रवाशांना बसत असून, याबाबत प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. नाशिक व औरंगाबाद आगाराच्या बसेस निफाड, येवला, वैजापूरमार्गे ये-जा करीत असतात. यात एशियाड व लाल बसेसचा समावेश आहे. परंतु परिवहन महामंडळाने अचानक एशियाड बसेस या विनावाहक करण्याचा निर्णय घेतल्याने औरंगाबादहून निघालेली औरंगाबाद- नाशिक एशियाड बस वैजापूर थांबा टाळून येवला येथे थांबा घेऊन नंतर निफाड थांबा टाळून एकदम नाशिकला जाते, तर नाशिकहून औरंगाबादला जाणारी एशियाड बस निफाड व येवला थांबा टाळून वैजापूर थांबा घेऊन एकदम औरंगाबादला जाते. यामुळे निफाड बसस्थानकात येणाऱ्या बसेसची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे निफाड व परिसरातील गावांतील प्रवाशांना नाशिक व औरंगाबादकडे ये-जा करण्यासाठी इतर बसेसची प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेष म्हणजे, निफाड येथून नाशिक व औरंगाबादकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. एशियाड बससाठी निफाड रद्द करणे म्हणजे महामंडळाचा हा आत्मघातकी निर्णय होय. एशियाड बसेस तर बंद झाल्याच पण त्याबरोबरच निफाडमार्गे सायंकाळी व रात्री ये-जा करणाऱ्या ३ ते ४ परिवर्तन बसेसही परिवहन महामंडळाने बंद केल्या आहेत. निफाड बसस्थानकात संध्याकाळी ७ वाजता येणारी पैठण-नाशिक, रात्री ८ वाजता येणारी सिल्लोड-नाशिक, रात्री ८.३० वाजता येणारी औरंगाबाद-नाशिक या परिवर्तन बसेस बंदच करून टाकल्याने परिवहन महामंडळाने निफाडकरांच्या जखमेवर मीठच चोळले आहे. त्यामुळे सायंकाळी ७.४० नंतर निफाडकरांना नाशिकला जायला आता बसच उपलब्ध नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे. सायंकाळी ७.४० वाजता लासलगाव-नाशिक ही बस नाशिकला जाण्यासाठी आहे. परंतु त्यानंतर रात्री ९.३० वा. असणारी बोरिवली-नाशिक ही बस जरी असली तरी ही बस रात्री निफाड बसस्थानकात येतच नाही. आता असे वाटायला लागले की निफाडकर दुर्गम डोंगराळ भागात राहतात की काय? नाशिकला जाण्यासाठी औरंगाबाद आगाराच्या किंवा लासलगाव आगाराच्या निफाड मार्गे बसेस रात्री ८ व ९ वाजता निफाडला येतील अशा पद्धतीने सोडाव्यात त्यामुळे रात्री नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होईल, अशी मागणी निफाडकरांनी केली आहे. थोडक्यात, एशियाड बसेसचा थांबा निफाडला रद्द झाल्याने व काही परिवर्तन बसेस रद्द केल्याने त्याची भर काढण्यासाठी नाशिक वा औरंगाबाद आगाराने निफाड, येवला, वैजापूरमार्गे नाशिक व औरंगाबादला ये-जा करण्यासाठी निदान ५ ते ६ नवीन परिवर्तन बसेस सुरू कराव्या, अशी मागणी निफाडकरांनी केली आहे.