शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

थांबे रद्द केल्याने प्रवाशांचे हाल

By admin | Updated: August 28, 2016 22:40 IST

निफाड ते नाशिक गैरसोय : एशियाडसह परिवर्तन बसेस रद्द

 निफाड : परिवहन महामंडळाने राज्यातील एशियाड बस विनावाहक करण्याच्या व या बसचे थांबे कमी करण्याच्या निर्णयाचा फटका निफाड व परिसरातील गावांतील प्रवाशांना बसत असून, याबाबत प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. नाशिक व औरंगाबाद आगाराच्या बसेस निफाड, येवला, वैजापूरमार्गे ये-जा करीत असतात. यात एशियाड व लाल बसेसचा समावेश आहे. परंतु परिवहन महामंडळाने अचानक एशियाड बसेस या विनावाहक करण्याचा निर्णय घेतल्याने औरंगाबादहून निघालेली औरंगाबाद- नाशिक एशियाड बस वैजापूर थांबा टाळून येवला येथे थांबा घेऊन नंतर निफाड थांबा टाळून एकदम नाशिकला जाते, तर नाशिकहून औरंगाबादला जाणारी एशियाड बस निफाड व येवला थांबा टाळून वैजापूर थांबा घेऊन एकदम औरंगाबादला जाते. यामुळे निफाड बसस्थानकात येणाऱ्या बसेसची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे निफाड व परिसरातील गावांतील प्रवाशांना नाशिक व औरंगाबादकडे ये-जा करण्यासाठी इतर बसेसची प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेष म्हणजे, निफाड येथून नाशिक व औरंगाबादकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. एशियाड बससाठी निफाड रद्द करणे म्हणजे महामंडळाचा हा आत्मघातकी निर्णय होय. एशियाड बसेस तर बंद झाल्याच पण त्याबरोबरच निफाडमार्गे सायंकाळी व रात्री ये-जा करणाऱ्या ३ ते ४ परिवर्तन बसेसही परिवहन महामंडळाने बंद केल्या आहेत. निफाड बसस्थानकात संध्याकाळी ७ वाजता येणारी पैठण-नाशिक, रात्री ८ वाजता येणारी सिल्लोड-नाशिक, रात्री ८.३० वाजता येणारी औरंगाबाद-नाशिक या परिवर्तन बसेस बंदच करून टाकल्याने परिवहन महामंडळाने निफाडकरांच्या जखमेवर मीठच चोळले आहे. त्यामुळे सायंकाळी ७.४० नंतर निफाडकरांना नाशिकला जायला आता बसच उपलब्ध नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे. सायंकाळी ७.४० वाजता लासलगाव-नाशिक ही बस नाशिकला जाण्यासाठी आहे. परंतु त्यानंतर रात्री ९.३० वा. असणारी बोरिवली-नाशिक ही बस जरी असली तरी ही बस रात्री निफाड बसस्थानकात येतच नाही. आता असे वाटायला लागले की निफाडकर दुर्गम डोंगराळ भागात राहतात की काय? नाशिकला जाण्यासाठी औरंगाबाद आगाराच्या किंवा लासलगाव आगाराच्या निफाड मार्गे बसेस रात्री ८ व ९ वाजता निफाडला येतील अशा पद्धतीने सोडाव्यात त्यामुळे रात्री नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होईल, अशी मागणी निफाडकरांनी केली आहे. थोडक्यात, एशियाड बसेसचा थांबा निफाडला रद्द झाल्याने व काही परिवर्तन बसेस रद्द केल्याने त्याची भर काढण्यासाठी नाशिक वा औरंगाबाद आगाराने निफाड, येवला, वैजापूरमार्गे नाशिक व औरंगाबादला ये-जा करण्यासाठी निदान ५ ते ६ नवीन परिवर्तन बसेस सुरू कराव्या, अशी मागणी निफाडकरांनी केली आहे.