शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

बिले न देताच जोडण्या तोडण्याची मोहीम

By admin | Updated: June 15, 2016 23:35 IST

घोटी : वीज वितरणचा अजब कारभार

इगतपुरी : तालुक्यातील वीज ग्राहकांना गेल्या काही महिन्यांपासून अनोख्या समस्येला सामोरे जावे लागत असून, वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे वीजग्राहकांना वेळीच वीजबिले मिळत नसताना बिल भरले नाही, असा ठपका ठेवत वीजजोडणी तोडण्यात येत असल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. वीज वितरण कंपनीने ग्राहकांची वीजबिले वेळेवर देण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.वीज कंपनी ग्राहकांना विजेची बिले वाटप करण्याचे कंत्राट एका खासगी व्यक्तीला देत असते. मात्र यात सातत्याने बदल होत असल्याने नवीन कंत्राटदाराला वीजग्राहकांची घरे शोधता शोधता दोन तीन महिन्यांचा कालावधी लागत असल्याने महिनोंमहिने ग्राहकांना बिले मिळत नसल्याने बिले भरावी कशी, असा प्रश्न ग्राहकांना पडतो. याबाबत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात तक्रार घेऊन गेलेल्या ग्राहकांना अधिकाऱ्याकडून समाधानाची उत्तरे न मिळता, त्यांच्या हातात अवाजवी बिले दिली जात आहेत. ही बिले न भरल्यास तत्काळ त्या ग्राहकांची कनेक्शन तोडण्यात येत आहे. यात ग्राहकांची काही एक चूक नसताना ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने तालुक्यातील वीजग्राहक व्यथित झाला आहे.याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून वीजबिलाच्या वाटपात सुसूत्रता आणण्यासाठी व ग्राहकांना वेळेवर वीजबिले देण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी तालुक्यातील वीजग्राहकांनी केली आहे. (वार्ताहर)