शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

कर्जमाफीच्या पूर्वसंध्येपर्यंत आकडेमोड सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:47 IST

कर्जदार शेतकºयांना दिवाळीपूर्वी कर्जमाफी देण्याच्या राज्य सरकारच्या घोेषणेची पूर्तता करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना जिल्ह्यातील नेमक्या किती शेतकºयांना त्याचा लाभ मिळणार याच्या आकडेवारीचा शासकीय घोळ पूर्वसंध्येपर्यंत कायम असून, बुधवारी दुपारी जिल्ह्यातील शेतकºयांच्या ३० जोडप्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्त झाल्याबद्दल संरक्षण राज्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

नाशिक : कर्जदार शेतकºयांना दिवाळीपूर्वी कर्जमाफी देण्याच्या राज्य सरकारच्या घोेषणेची पूर्तता करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना जिल्ह्यातील नेमक्या किती शेतकºयांना त्याचा लाभ मिळणार याच्या आकडेवारीचा शासकीय घोळ पूर्वसंध्येपर्यंत कायम असून, बुधवारी दुपारी जिल्ह्यातील शेतकºयांच्या ३० जोडप्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्त झाल्याबद्दल संरक्षण राज्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.  राज्य सरकारने जुलै महिन्यात जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी स्वाभिमान योजनेंतर्गत शेतकºयांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्जसरसकट माफ करण्याचे तर दीड लाखापुढील कर्जदार शेतकºयाने कर्जाची परतफेड केल्यास त्याचे दीड लाख रुपयांचे कर्ज माफ होणार आहे.  शासनाने यासाठी शेतकºयांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेतल्यामुळे त्याला विलंब झाला. दुसरीकडे विरोधी पक्षांनी सरकारची कर्जमाफी फसवी असल्याची टीका सुरू केल्यामुळे शासनाने दिवाळीपूर्वी कर्जमाफी करण्याची घोषणा केली व त्याचा मुख्य समारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार असून, प्रत्येक जिल्ह्णात प्रातिनिधिक स्वरूपात शेतकºयांना कर्जमुक्त झाल्याबद्दल लोकप्रतिनिधींच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.नाशिक जिल्ह्णातील १,७४,५२५ शेतकºयांनी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडून दीड लाखापर्यंत कर्ज घेतले असल्याने तसेच अन्य राष्टÑीयीकृत बॅँकेचे कर्जदार मिळून एकूण १,८५,००० शेतकºयांनी शासनाच्या कर्जाची माहिती आॅनलाइन अपलोड केलेली असून, या सर्व अर्जांची छाननी केल्यानंतर शासनाच्या निकषात बसणाºया शेतकºयांना कर्जमाफी मिळणार असल्याचे शासनाने यापूर्वी जाहीर केले असले तरी, मंगळवारी सायंकाळपर्यंत शासनाने छाननी केलेली पात्र ठरलेल्या शेतकºयांची यादी जिल्हा बॅँक, सहकार खाते व जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली नव्हती. शासनाकडून फक्त जिल्हा बॅँकेचे दीड लाख रुपये कर्जदार असलेले फक्त ९० हजार व राष्टÑीयीकृत बॅँकेचे १६ हजार शेतकरीच पात्र असल्याचे सांगण्यात आले. परंतु त्याची यादी मात्र देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्णातील नेमके किती शेतकºयांना शासनाच्या कर्जमाफीचा लाभ होईल, याबाबत संभ्रम कायम आहे.संरक्षण राज्यमंत्री नाशकातशासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या जिल्ह्णातील ३० शेतकरी जोडप्यांचा बुधवारी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सत्कार करण्यात येणार आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्णातील दोन याप्रमाणे ३० शेतकरी दाम्पत्यांना साडी-चोळी तसेच कर्जमाफ झाल्याचे प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार आहे. ज्या शेतकºयांचा सत्कार करण्यात येणार आहे ते कर्जमाफीस पात्र ठरले आहेत.