शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

वातावरणातील बदलामुळे कोबी पिकाला धोका

By admin | Updated: August 25, 2015 00:19 IST

पाणीटंचाई : पाकुळी, अळीचा प्रादुर्भाव

कळवण : शेतकऱ्यांकडील गावठी कांदा संपत आल्याने भाव वाढले आहेत. कांद्याला पर्याय म्हणून कोबी व मुळा या पिकांची लागवड वाढली आहे. तालुक्यात कमी कालावधीत येणाऱ्या कोबीची लागवड वाढली आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे पिकावरील पाकुळी व आळीच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा अनाठाई खर्च वाढला आहे. उन्हाळी कांदा संपत आलेला आहे. पावसाने दडी मारल्याने नवीन लाल कांद्याची लागवड बहुतांशी भागात झाली नसल्याने नवीन कांदा बाजारात येण्यासाठी अजून अवधी लागणार आहे. देशी कांद्याबरोबर परदेशी कांदाही भाव खाण्याची चिन्हे अजून काहीकाळ दिसत आहेत. बाजारातील कांद्याची कमतरता लक्षात घेऊन व मागणी बघून कमी कालावधीतील व कमी पाण्याचे पीक म्हणून कोबीकडे पाहत आहे. कळवण तालुक्यात ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी कोबीची लागवड करण्यात आली आहे. पावसाने दडी मारल्याने व वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर पाकुळी, आळी, मावा, तुडतुडी, करपा, घाण्या या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे वारंवार वेगवेगळ्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. औषधांचा अनाठाई खर्च शेतकऱ्यांच्या माथी पडत आहे. हवामानातील सततच्या बदलांमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. नगदी पीक नुकसानीचे ठरत आहे. आधीच पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम वाया गेला . थोडेफार पैसे मिळण्याच्या आशेने केलेले कोबी लागवड तोट्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. बाजारभाव घसरल्यावरही १०० टक्के नुकसान होणार आहे. पिकाची वाढ अंतिम टप्प्यात असल्याने व विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.(वार्ताहर)