शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘ए. सी. भाऱत सरकार’च्या सदस्यांचा लसीकरणाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:11 IST

नाशिक : ‘आम्हीच आमचे सरकार’ असे म्हणून भारत सरकारच्या कायदेकानूनला विरोध दर्शविणाऱ्या ए. सी. भारत सरकारला मानणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील ...

नाशिक : ‘आम्हीच आमचे सरकार’ असे म्हणून भारत सरकारच्या कायदेकानूनला विरोध दर्शविणाऱ्या ए. सी. भारत सरकारला मानणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील बोरीचा पाडा, डोंगरपाडा, कुकडणे या आदिवासीबहुल पाड्या-वाड्या-वस्त्यांमध्येही कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यास विरोध दर्शविला जात असून, गावोगावी लसीकरणासाठी जाणाऱ्या वैद्यकीय पथकाला या आदिवासी नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे.

‘ॲन्टिख्रिस्त’ म्हणवून घेणाऱ्या भारत सरकारच्या सदस्यांच्यामते पृथ्वीतलावर सर्वात आधी आदिम जमात जन्माला आली. त्यामुळे या पृथ्वीचे व पर्यायाने या भूमीचे मालक तेच असल्याने नंतर अस्तित्वात आलेल्या कोणत्याही सरकारचे कायदे कानून मानण्यास ते तयार नाहीत. त्यामुळे आजवर मतदार ओळखपत्र (शेषन कार्ड), रेशनकार्ड, स्वस्त धान्य, मतदान प्रक्रियेवर या जनतेचा विश्वास राहिलेला नाही. परिणामी सध्याच्या आधुनिक युगातही भौतिक सुखांपासून वंचित राहून या आदिवासींनी आपल्या परंपरागत रूढी-परंपरा कायम ठेवत वैद्यक शास्त्राला दूर सारत जंगलातील जडी-बुटी व कंदमुळांच्या माध्यमातूनच आरोग्याचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले आहे. सुरगाणा तालुक्यातील बोरीचा गावठा, दौडीपाडा, गुंडाळविहीर, म्हैसखडक, बाफळण, कोठुळा, उंबराचा पाडा या भागात स्वत:ला ए.सी. भारत सरकारचे अनुयायी म्हणवून घेणाऱ्या नागरिकांनी देशपातळीवरील कोरोना लसीकरणात सहभागी होण्यास नकार दिला आहे.

आदिवासी असलेल्या सुरगाणा तालुक्यात कोरोना लसीकरणाचे प्रमाण कमी असून, आरोग्य विभागासाठी ही बाब चिंतेची आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी आरोग्य विभागाने प्रत्येक गावातील शासकीय कर्मचारी, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविकांना लस देऊन ती सुरक्षित असल्याचा निर्वाळा देण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून गावातील आदिवासींमध्ये जागृती होईल, यासाठी प्रयत्न चालविले आहेत. मात्र आरोग्य खात्याचे पथक या गावांमध्ये गेल्यास ‘अजिबात गावात पाय ठेवायचा नाही’ अशा धमक्या त्यांना मिळू लागल्या आहेत. ‘कोरोनाची लस घेतल्यास मृत्यू होतो’ असा गैरसमज मोठ्या प्रमाणात पसरल्याने लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याचे डॉ. मधुकर पवार यांचे म्हणणे आहे. मात्र ए. सी. सरकारला मानणाऱ्या विशिष्ट वर्गातील दुसरी पिढी आता हळूहळू पुरोगामी होत असल्याचेही आरोग्य खात्याचे म्हणणे असले तरी, ए. सी. भारत सरकारचे प्राबल्य असलेल्या पाडे, वाड्यांवर अद्याप तरी एकही लसीकरण झाले नसल्याचे समोर आले आहे.

चौकट

====

काय आहे ए. सी. भारत सरकार?

‘ए. सी. भारत सरकार’चे मुख्यालय महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवरील धरमपूरनजीकच्या मोरदहाड येथे आहे. ए. सी. म्हणजे ‘अ‍ॅन्टिख्रिस्त’ (ख्रिश्चनविरोधक) असे ते स्वत:ला म्हणवून घेतात. ए. सी. कुंवर केसरसिंह माताश्री जमनाबाई पिताश्री टेटिया कावनजीभाई हे त्यांचे प्रमुख होते. काही वर्षांपूर्वीच ते निवर्तले. आता त्यांच्याजागी मुलगा राजेंद्रसिंह हा सारी सूत्रे सांभाळतो. भारत सरकारचे सदस्य सुरगाणा तालुक्यातील दौडीपाडा, गुंडाळविहीर, म्हैसखडक, बाफळण, कोठुळा, उंबराचा पाडा या गावांमध्येही वास्तव्यास आहेत. याशिवाय राजस्थान, मध्य प्रदेश, दमण-दीव व गोवा येथेही ए. सी. भारत सरकारने हात-पाय रोवले आहेत.