नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा पर्वणीकाळात नऊ दिवस बंद करण्यात येणार आहे. तसेच साधुग्राम व रामकुंड परिसरातील रस्ते पोलीस प्रशासनाने तब्बल ४८ दिवस बंद करण्यात आले आहेत़ सिंहस्थानिमित्त चांगल्या कमाईची आशा असलेले रिक्षाचालक, प्रवासी वाहतूक करणारे काळी पिवळीधारक, तसेच सामानाची ने-आण करणाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याच्या प्रतिक्रिया व्यावसायिकांनी व्यक्त केल्या आहेत़यातील काही व्यावसायिकांनी गत सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत केवळ एकच दिवस पोलिसांनी रस्ते बंद केले होते़ तसेच रामकुंड व साधुग्राम (तपोवन) परिसरात वाहनांना येण्या-जाण्यासाठी निर्बंधही नव्हते़ परिणामी भाविक व नागरिकांच्या सुविधेबरोबरच आमच्या व्यवसायही चांगला होता़ मात्र यावेळी पोलीस प्रशासनाने केलेल्या वाहतुकीच्या चुकीच्या नियोजनामुळे आमच्या व्यवसायावर चांगलाच परिणाम झाला आहे़ रामकुंड व साधुग्राममधील रस्त्यावर रिक्षाचालकांची होत असलेल्या अडवणुकीमुळे भाविकांची गैरसोय तर होतेच, पण त्याबरोबरच व्यवसायावरही परिणाम होतो आहे़ या दोन्ही परिसरात पोलिसांनी तब्बल ४८ दिवस रस्ते बंद करण्याच्या निर्णयावर फेरविचार करून केवळ पर्वणीकाळात दोन दिवसच करावी, अशी आग्रही मागणीदेखील या व्यावसायिकांनी केली आहे़
व्यवसाय ठप्प, उदरनिर्वाहाचा प्रश्न
By admin | Updated: August 8, 2015 23:47 IST