शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

सुट्या भागाच्या प्रतीक्षेत बसेस नव्या बसेसची गरज : लाखो भाविकांना केवळ बसचाच आधार

By admin | Updated: April 22, 2015 01:30 IST

सुट्या भागाच्या प्रतीक्षेत बसेस नव्या बसेसची गरज : लाखो भाविकांना केवळ बसचाच आधार

  नाशिक : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या बसेसची होत असलेली अवस्था तसेच प्रवासादरम्यान बसेस बिघडण्याचे प्रमाण वाढल्याने व दुरुस्तीचे साहित्यच नसल्याने शहर बस वाहतुकीतली अनेक बसेस बंद करण्याची नामुष्की महामंडळावर ओढवली आहे. महामंडळाच्या भांडार विभागाच्या खरेदीअभावी बसेस दुरुस्तीसाठी साहित्य उपलब्ध होत नसल्याने हा प्रकार घडत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. मुख्य म्हणजे आगामी काही महिन्यांत येणाऱ्या सिंहस्थात लाखो भाविकांची वाहतूक करण्याची जबाबदारी असलेल्या महामंडळाच्या बसेस अशा असतील, तर सिंहस्थ निर्विघ्न कसा पार पडेल याबद्दलही साशंकता वर्तवली जात आहे. एकीकडे उत्पन्नवाढीसाठी वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या महामंडळात गेल्या काही दिवसांपासून बसेसची अवस्था खराब झाली आहे. गीअर बॉक्स खराब होणे, टायर पंक्चर होणे यांसारख्या किरकोळ बिघाडांमुळेही बसमधील प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे महामंडळ प्रशासनाने याची खबरदारी घेत अनेक बसेसच्या फेऱ्याच बंद केल्या आहेत. जवाहरलाल नेहरू उत्थान योजनेअंतर्गत शहर महामंडळाला नव्याकोऱ्या बसेस मिळाल्या असल्या, तरी त्याचे साहित्य नसल्याने अनेक बसेसला व्हायपरसुद्धा उपलब्ध नाही. परिणामी नवी बस आणि जुन्या गाडीचे साहित्य असा प्रकार दिसून येतो आहे. गाडी खराब (ब्रेकडाउन) झाल्यास दोन दोन तास पर्यायी गाडी मिळत नाही. नेहरू योजनेतून आलेल्या नव्या आधुनिक बसेसची वाताहत झाली असून, या बसेसच्या फुटलेल्या काचांऐवजी गाडीवर पत्रे ठोकले जात असल्याने केवळ शोभनीय वस्तू म्हणूनच या बसेस आणण्याचा गाजावाजा केला गेला का? असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. सिंहस्थासाठी नव्या बसेससह इतर जिल्'ातून बसेस कार्यरत राहणार असल्या तरी किमान नाशिकसाठी हा उत्पन्न मिळवण्याचा चांगला पर्याय आहे. त्यामुळे त्याचा लाभ उठवलाच पाहिजे, असे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचेही मत आहे. परंतु त्यासाठी कोणतेही पाऊले उचलली जात नसल्याचे दिसते. कर्मचारीही गायब? सिंहस्थासाठी मोठ्या प्रमाणावर भरती झाल्यानंतरही बाहेरून आलेले कर्मचारी मोठ्या प्रमाणात काम सोडून गेल्याने जुन्या कर्मचाऱ्यांवर आहे तो कामाचा ताण कायम असल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे कर्मचारी भरताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी होत आहे. स्थानिक कर्मचारी काम सोडून जात नाहीत म्हणून त्यांची भरती करण्याची मागणी होत आहे. सिंहस्थात हा ताण आणखी वाढणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी केली जात आहे.