शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

थांबा सोडून रस्त्यावर थांबतात बसेस

By admin | Updated: May 22, 2014 00:20 IST

कोंडी कायम : डोकेदुखी द्वारका सर्कलची (पालिका-पान७)

कोंडी कायम : डोकेदुखी द्वारका सर्कलची (पालिका-पान७)नाशिक : मंुबई-आग्रा महामार्गावरील वाहतुकीची कोंडी सुटावी, या हेतूने उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली असली तरी द्वारका सर्कलवरील वाहतुकीची समस्या अधिकच बिकट झाली आहे. सर्कलला कोंडी होतेच पण त्यातही भर पडते ती शहर बसेसची. ज्याठिकाणी थांबे आहेत तेथे बसेस न थांबता रस्त्यावरच थांबतात. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत अधिकच भर पडते. मंुबई-आग्रा महामार्गावरील द्वारका चौक येथील वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूकडून सहा रस्ते आणि नाशिक - पुणे मार्गाचे चार तर वाकडी बारवकडून येणारा एक अशा दहा-बारा रस्त्यांची वाहतूक एकाच चौकात येत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होते. सर्कल लहान करून वाहने गोलाकार फिरत मार्गस्थ होण्याऐवजी सर्वच वाहने मार्गस्थ होण्याच्या प्रयत्नात कोंडीची समस्या निर्माण होते. त्यात भर पडते ती पुण्याकडे जाणार्‍या आणि येणार्‍या रस्त्यावरील वाहनांची कोंडी. चौक सोडून पुणे मार्गावरील दोन्ही बाजूने काही अंतरावर शहर बस थांबे आहेत. पुण्याकडे जाताना लाकडाच्या वखारीनजीक शहर बसेससाठी थांबा आहे. याच थांब्यालगत अवैधरीत्या प्रवाशांची वाहतूक करणार्‍या काळ्या-पिवळ्या वाहनांची गर्दी असते. त्यामुळे प्रवासी शेडमध्ये उभ्या असलेल्या प्रवाशांना येणार्‍या बसचा अंदाज येत नाही. त्यामुळे ते निवारा शेड सोडून उभे राहतात. येणार्‍या बसेसही निवारा शेडलगत थांबणे अपेक्षित असताना रस्त्यावरच उभ्या राहतात. प्रवासी बसमध्ये चढेपर्यंत बस रस्त्यावरच थांबलेली असते. त्यामुळे बसच्या मागे असलेली वाहने रोखली जातात. लहान वाहने बसला ओलांडून जाऊ शकतात; परंतु चारचाकी व इतर वाहनांना जाणे शक्य होत नाही. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांत एका बसमुळे वाहतूक रोखली जाऊन द्वारका सर्कलपर्यंत वाहने थांबलेली असतात. अर्थातच त्यामुळे द्वारका सर्कलच्या वाहतुकीवर अतिरिक्त ताण निर्माण होऊ कोंडी वाढते. त्याचप्रमाणे नाशिककडे येणार्‍या मार्गावरील कोंडाजी चिवडा दुकानालगत शहर बसचा थांबा असताना त्याही बसेस रस्त्यावरच थांबतात. त्यामुळे जी दुसर्‍या बाजूच्या रस्त्यावर स्थिती निर्माण होते तशीच स्थिती याहीठिकाणी होऊन समस्या वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. शेडलगत थांबण्याची गरजनिर्माण केलेल्या प्रवासी निवारा शेडलगत शहर बसेस थांबल्या तर इतर वाहनांना पुढे मार्गस्थ होण्यासाठी रस्ता मोकळा होतो आणि वाहतुकीची कोंडीही टळू शकते.