शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

चार तालुक्यांमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:12 IST

राज्यात लॉकडाऊन लागू असल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच बसेस चालविल्या ...

राज्यात लॉकडाऊन लागू असल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच बसेस चालविल्या जात आहेत. बुधवारी जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पेठ, कळवण, नांदगाव आणि येवला येथेच बसेस सोडण्यात आल्या. त्याचप्रमाणे पुणे आणि धुळे येथेदेखील याच कारणास्तव बसेस सोडण्यात आल्या आहेत.

राज्यातील कोरोनाची स्थिती काही जिल्ह्यांमध्ये अजूनही नियंत्रणात आली नसल्याने लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तरी प्रवाशांना एस. टी. बसमधून प्रवास करता येणार नाही. गर्दीची ठिकाणे टाळून काेरोनाचा प्रसार रोखण्याचा भाग म्हणून बसेस बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नाचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ १५ टक्के क्षमतेने कर्मचाऱ्यांना कामावर बोलावण्यात आले आहे.

जिल्हा तसेच जिल्ह्याच्या बाहेर गेलेल्या बसेस या केवळ अत्यावश्यक कारणांसाठीच पाठविल्या असल्याचे नाशिक विभागीय एस. टी. वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले. दैनंदिन प्राप्त होणाऱ्या आदेशानुसार संबंधित मार्गावर तसेच जिल्ह्यासाठी बसेस सोडल्या जात आहेत. त्यामुळे उत्पन्नाचा विचार करण्यात आलेला नाही. महामंडळाला दररोज कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे. कर्मचाऱ्यांचा मे महिन्याच्या वेतनाचा प्रश्नदेखील उपस्थित होणार आहे.

--इन्फो--

शहरातील प्रवासी बससेवा चालविण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचे सांगून राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शहर बसेस चालविणे यापूर्वीच कमी केले आहे. महामंडळाला होणारा तोटा पाहता कोरोनाच्या परिस्थितीनंतरही शहर बसेस चालविण्याबाबत नाशिक विभागीय महामंडळाची तयारी नसल्याचे समजते. त्यामुळे शहर बससेची अनिश्चितता पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता आहे.