शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
6
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
7
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
8
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
9
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
10
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
11
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
12
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
13
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
14
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
15
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
16
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
17
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
18
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
19
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
20
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ

चार तालुक्यांमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:12 IST

राज्यात लॉकडाऊन लागू असल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच बसेस चालविल्या ...

राज्यात लॉकडाऊन लागू असल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच बसेस चालविल्या जात आहेत. बुधवारी जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पेठ, कळवण, नांदगाव आणि येवला येथेच बसेस सोडण्यात आल्या. त्याचप्रमाणे पुणे आणि धुळे येथेदेखील याच कारणास्तव बसेस सोडण्यात आल्या आहेत.

राज्यातील कोरोनाची स्थिती काही जिल्ह्यांमध्ये अजूनही नियंत्रणात आली नसल्याने लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तरी प्रवाशांना एस. टी. बसमधून प्रवास करता येणार नाही. गर्दीची ठिकाणे टाळून काेरोनाचा प्रसार रोखण्याचा भाग म्हणून बसेस बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नाचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ १५ टक्के क्षमतेने कर्मचाऱ्यांना कामावर बोलावण्यात आले आहे.

जिल्हा तसेच जिल्ह्याच्या बाहेर गेलेल्या बसेस या केवळ अत्यावश्यक कारणांसाठीच पाठविल्या असल्याचे नाशिक विभागीय एस. टी. वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले. दैनंदिन प्राप्त होणाऱ्या आदेशानुसार संबंधित मार्गावर तसेच जिल्ह्यासाठी बसेस सोडल्या जात आहेत. त्यामुळे उत्पन्नाचा विचार करण्यात आलेला नाही. महामंडळाला दररोज कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे. कर्मचाऱ्यांचा मे महिन्याच्या वेतनाचा प्रश्नदेखील उपस्थित होणार आहे.

--इन्फो--

शहरातील प्रवासी बससेवा चालविण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचे सांगून राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शहर बसेस चालविणे यापूर्वीच कमी केले आहे. महामंडळाला होणारा तोटा पाहता कोरोनाच्या परिस्थितीनंतरही शहर बसेस चालविण्याबाबत नाशिक विभागीय महामंडळाची तयारी नसल्याचे समजते. त्यामुळे शहर बससेची अनिश्चितता पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता आहे.