शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

वीरगावजवळ बसला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 23:04 IST

वीरगाव : विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर वीरगाव या गावाजवळ नुकत्याच टाकण्यात आलेल्या गतिरोधकाजवळ मंगळवारी झालेल्या तिहेरी अपघातात शिवशाही बससह अल्टो कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरीही मात्र सा. बां. विभागाचा निष्काळजीपणाच या अपघाताला जबाबदार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देतिहेरी अपघात शिवशाही बससह अल्टो कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान

वीरगाव : विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर वीरगाव या गावाजवळ नुकत्याच टाकण्यात आलेल्या गतिरोधकाजवळ मंगळवारी झालेल्या तिहेरी अपघातात शिवशाही बससह अल्टो कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरीही मात्र सा. बां. विभागाचा निष्काळजीपणाच या अपघाताला जबाबदार असल्याचे चित्र दिसून येत आहे.विंचूर-प्रकाशा राज्यमार्गालगत वसलेल्या वीरगाव या गावाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नुकतीच गतिरोधकांची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यमार्गाने जाणाऱ्या वाहनांवर वीरगाव फाट्यानजीक काही अंशी अंकुश राहावा यासाठी वीरगाव येथील नागरिकांच्या आग्रहास्तव हे गतिरोधक संबंधित विभागाकडून गत चार ते पाच दिवसांपूर्वीच उभारण्यात आले आहेत; मात्र गतिरोधक उभारल्यानंतर या भागात पांढरे पट्टे व फलक संबंधित विभागाकडून न लावण्यात आल्याने येथे अनेक वाहनचालकांना अडचणींचाच सामना करावा लागत आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र यास सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभारच जबाबदार असल्याचा आरोप वाहनचालकांसह वीरगाववासीयांनी केला आहे.सुदैवाने जीवितहानी नाहीमंगळवारी दुपारी नाशिककडून नंदुरबारकडे जाणाºया शिवशाही बसचा याच ठिकाणी तिहेरी अपघात झाला असून, यात अल्टो कारचालकासह शिवशाही बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. गतिरोधकाजवळ पुढे चालणाºया ट्रकने अचानक वेग कमी केल्याने शिवशाही बस व पाठीमागून येणारी अल्टो कार एकमेकांवर आदळून हा अपघात झाला.