शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

खान्देशातील रुग्णांचा जिल्ह्यातील रुग्णालयांवर भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:14 IST

नाशिक : नाशिक शहरात असलेल्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण खासगी हॉस्पिटल्स तसेच शासकीय रुग्णालयांतील उपलब्ध सुविधांमुळे जिल्ह्यानजीकच्या जळगाव, धुळे, ...

नाशिक : नाशिक शहरात असलेल्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण खासगी हॉस्पिटल्स तसेच शासकीय रुग्णालयांतील उपलब्ध सुविधांमुळे जिल्ह्यानजीकच्या जळगाव, धुळे, नंदुरबार आणि काही प्रमाणात पालघर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचाही ओढा नाशिक जिल्ह्याकडे आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे ९० टक्के रुग्ण हे गृह विलगीकरणात असूनही जिल्ह्यात बेड्स, व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजन बेड्सचा तुटवडा जाणवू लागला आहे.

नाशिक शहरात वेगवेगळ्या कारणांमुळे दाखल झालेल्या परजिल्ह्यातील रुग्णांची संख्या खूप मोठी आहे. विशेषत्वे धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील रुग्णांची संख्या अधिक आहे. त्याशिवाय नंदुरबार, पालघर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्याशिवाय व्यवसाय, नोकरी, कामधंद्यानिमित्त पुणे, मुंबई यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये गेलेले नागरिकांनी उपचारांसाठी आपापल्या मूळ गावाकडे येणे पसंत केले. कुटुंबीय, नात्यागोत्यातील व्यक्ती नाशिकमध्ये असल्याने आपली देखभाल नाशिकलाच अधिक योग्य प्रकारे होऊ शकेल, असा विचारदेखील त्यामागे असल्याचे दिसून येते. परजिल्ह्यातून आपल्या मूळ गावी येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. यातील बहुतांश नागरिक कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबई, पुणे यांसारख्या शहरांतून येत असल्याने अशा नागरिकांमुळेदेखील नाशिकच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत चालला आहे.

इन्फो

परजिल्ह्याचे सुमारे २५० रुग्ण

जिल्ह्यात सध्या परजिल्ह्यातून आलेले आणि शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २५० हून अधिक आहे. हे बहुतांश रुग्ण अत्यावस्थ असल्याने त्यांच्यासाठी जिल्ह्यातील ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर अधिग्रहीत झाले आहेत. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यात नाशिकच्या प्रमाणात अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज बेड नसल्याने त्यांना नजीकच्या मोठ्या शहरात अर्थात नाशिकला येण्याशिवाय पर्याय नसतो. तसेच पुणे, मुंबईत नोकरीनिमित्त असलेल्या रुग्णांनादेखील त्या तुलनेत कमी खर्चात चांगल्या सोयी असलेले हॉस्पिटल्स नाशिकलाच असल्याने त्यांच्याकडेदेखील नाशिकच्या हॉस्पिटल्सचाच पर्याय उरतो.

इन्फो

परजिल्ह्यातून येणाऱ्यांची चाचणी नाही

जिल्ह्याला जोडल्या गेलेल्या नजीकच्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची कुठेही चाचणी केली जात नाही. तसेच रेल्वेने, बसने येणाऱ्या नागरिकांच्या चाचण्या करण्याचीही कोणतीही व्यवस्था नाही. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची चाचणी करणे बंधनकारक करणे आता पूर्वीपेक्षाही अधिक अत्यावश्यक झाले आहे.

--------------------------

ही डमी आहे.