शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
2
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
3
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
4
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
5
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
6
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
7
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
8
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
9
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
10
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
11
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
12
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
13
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
15
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
16
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
17
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
18
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
19
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
20
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन

खान्देशातील रुग्णांचा जिल्ह्यातील रुग्णालयांवर भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:14 IST

नाशिक : नाशिक शहरात असलेल्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण खासगी हॉस्पिटल्स तसेच शासकीय रुग्णालयांतील उपलब्ध सुविधांमुळे जिल्ह्यानजीकच्या जळगाव, धुळे, ...

नाशिक : नाशिक शहरात असलेल्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण खासगी हॉस्पिटल्स तसेच शासकीय रुग्णालयांतील उपलब्ध सुविधांमुळे जिल्ह्यानजीकच्या जळगाव, धुळे, नंदुरबार आणि काही प्रमाणात पालघर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचाही ओढा नाशिक जिल्ह्याकडे आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे ९० टक्के रुग्ण हे गृह विलगीकरणात असूनही जिल्ह्यात बेड्स, व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजन बेड्सचा तुटवडा जाणवू लागला आहे.

नाशिक शहरात वेगवेगळ्या कारणांमुळे दाखल झालेल्या परजिल्ह्यातील रुग्णांची संख्या खूप मोठी आहे. विशेषत्वे धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील रुग्णांची संख्या अधिक आहे. त्याशिवाय नंदुरबार, पालघर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्याशिवाय व्यवसाय, नोकरी, कामधंद्यानिमित्त पुणे, मुंबई यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये गेलेले नागरिकांनी उपचारांसाठी आपापल्या मूळ गावाकडे येणे पसंत केले. कुटुंबीय, नात्यागोत्यातील व्यक्ती नाशिकमध्ये असल्याने आपली देखभाल नाशिकलाच अधिक योग्य प्रकारे होऊ शकेल, असा विचारदेखील त्यामागे असल्याचे दिसून येते. परजिल्ह्यातून आपल्या मूळ गावी येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. यातील बहुतांश नागरिक कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबई, पुणे यांसारख्या शहरांतून येत असल्याने अशा नागरिकांमुळेदेखील नाशिकच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत चालला आहे.

इन्फो

परजिल्ह्याचे सुमारे २५० रुग्ण

जिल्ह्यात सध्या परजिल्ह्यातून आलेले आणि शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २५० हून अधिक आहे. हे बहुतांश रुग्ण अत्यावस्थ असल्याने त्यांच्यासाठी जिल्ह्यातील ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर अधिग्रहीत झाले आहेत. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यात नाशिकच्या प्रमाणात अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज बेड नसल्याने त्यांना नजीकच्या मोठ्या शहरात अर्थात नाशिकला येण्याशिवाय पर्याय नसतो. तसेच पुणे, मुंबईत नोकरीनिमित्त असलेल्या रुग्णांनादेखील त्या तुलनेत कमी खर्चात चांगल्या सोयी असलेले हॉस्पिटल्स नाशिकलाच असल्याने त्यांच्याकडेदेखील नाशिकच्या हॉस्पिटल्सचाच पर्याय उरतो.

इन्फो

परजिल्ह्यातून येणाऱ्यांची चाचणी नाही

जिल्ह्याला जोडल्या गेलेल्या नजीकच्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची कुठेही चाचणी केली जात नाही. तसेच रेल्वेने, बसने येणाऱ्या नागरिकांच्या चाचण्या करण्याचीही कोणतीही व्यवस्था नाही. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची चाचणी करणे बंधनकारक करणे आता पूर्वीपेक्षाही अधिक अत्यावश्यक झाले आहे.

--------------------------

ही डमी आहे.