शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

खान्देशातील रुग्णांचा जिल्ह्यातील रुग्णालयांवर भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:14 IST

नाशिक : नाशिक शहरात असलेल्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण खासगी हॉस्पिटल्स तसेच शासकीय रुग्णालयांतील उपलब्ध सुविधांमुळे जिल्ह्यानजीकच्या जळगाव, धुळे, ...

नाशिक : नाशिक शहरात असलेल्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण खासगी हॉस्पिटल्स तसेच शासकीय रुग्णालयांतील उपलब्ध सुविधांमुळे जिल्ह्यानजीकच्या जळगाव, धुळे, नंदुरबार आणि काही प्रमाणात पालघर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचाही ओढा नाशिक जिल्ह्याकडे आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे ९० टक्के रुग्ण हे गृह विलगीकरणात असूनही जिल्ह्यात बेड्स, व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजन बेड्सचा तुटवडा जाणवू लागला आहे.

नाशिक शहरात वेगवेगळ्या कारणांमुळे दाखल झालेल्या परजिल्ह्यातील रुग्णांची संख्या खूप मोठी आहे. विशेषत्वे धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील रुग्णांची संख्या अधिक आहे. त्याशिवाय नंदुरबार, पालघर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्याशिवाय व्यवसाय, नोकरी, कामधंद्यानिमित्त पुणे, मुंबई यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये गेलेले नागरिकांनी उपचारांसाठी आपापल्या मूळ गावाकडे येणे पसंत केले. कुटुंबीय, नात्यागोत्यातील व्यक्ती नाशिकमध्ये असल्याने आपली देखभाल नाशिकलाच अधिक योग्य प्रकारे होऊ शकेल, असा विचारदेखील त्यामागे असल्याचे दिसून येते. परजिल्ह्यातून आपल्या मूळ गावी येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. यातील बहुतांश नागरिक कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबई, पुणे यांसारख्या शहरांतून येत असल्याने अशा नागरिकांमुळेदेखील नाशिकच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत चालला आहे.

इन्फो

परजिल्ह्याचे सुमारे २५० रुग्ण

जिल्ह्यात सध्या परजिल्ह्यातून आलेले आणि शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २५० हून अधिक आहे. हे बहुतांश रुग्ण अत्यावस्थ असल्याने त्यांच्यासाठी जिल्ह्यातील ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर अधिग्रहीत झाले आहेत. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यात नाशिकच्या प्रमाणात अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज बेड नसल्याने त्यांना नजीकच्या मोठ्या शहरात अर्थात नाशिकला येण्याशिवाय पर्याय नसतो. तसेच पुणे, मुंबईत नोकरीनिमित्त असलेल्या रुग्णांनादेखील त्या तुलनेत कमी खर्चात चांगल्या सोयी असलेले हॉस्पिटल्स नाशिकलाच असल्याने त्यांच्याकडेदेखील नाशिकच्या हॉस्पिटल्सचाच पर्याय उरतो.

इन्फो

परजिल्ह्यातून येणाऱ्यांची चाचणी नाही

जिल्ह्याला जोडल्या गेलेल्या नजीकच्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची कुठेही चाचणी केली जात नाही. तसेच रेल्वेने, बसने येणाऱ्या नागरिकांच्या चाचण्या करण्याचीही कोणतीही व्यवस्था नाही. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची चाचणी करणे बंधनकारक करणे आता पूर्वीपेक्षाही अधिक अत्यावश्यक झाले आहे.

--------------------------

ही डमी आहे.