शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला अतिक्रमणांवर बुलडोझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 18:45 IST

त्र्यंबकेश्वर शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर टपरीधारकांनी केलले अतिक्रमण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जमीनदोस्त केल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. दरम्यान, अतिक्रमणांमुळे विस्थापित झालेल्या टपरीधारकांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी शुक्रवारी नगरसेवकांनी पालिकेसमोर घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देटपरीधारकांच्या पुनर्वसनाची मागणी : नगरसेवकांचे पालिकेसमोर धरणे, घोषणाबाजी!

त्र्यंबकेश्वर : शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर टपरीधारकांनी केलले अतिक्रमण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जमीनदोस्त केल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. दरम्यान, अतिक्रमणांमुळे विस्थापित झालेल्या टपरीधारकांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी शुक्रवारी नगरसेवकांनी पालिकेसमोर घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केले.गुरुवारपासून त्र्यंबकेश्वर शहरात अतिक्र मण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेत व्यावसायिकांचे अतिक्र मण पालिकेच्या अतिक्र मणविरोधी पथकाने जमीनदोस्त केले. या टपरीधारकांचे पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी नगरसेवकांनी धरणे आंदोलन करून घरचाच आहेर दिला. शहरविकास आराखडा दर दहा वर्षांनी नगरपालिकेच्या सभागृहात विशेष सर्वसाधारण बैठकीत तयार केला जातो. दहा वर्षांत शहरात कोणकोणती विकासकामे करायची याबाबत आराखडा मंजूर करून ठेवला जातो. त्याला डेव्हलपमेंट प्लॅन (डीपी) म्हणतात. हाच डीपी प्लॅन तयार करून मंत्रालयात पाठवला आहे. विशेष म्हणजे हा आराखडा मागील कौन्सिलच्या काळात पाठविलेला आहे. त्यानंतर विद्यमान कौन्सिलला दीड वर्षाचा कालावधी झाला आहे.त्र्यंबक नगर परिषदेने सन २०१८ मध्ये तयार केलेला विकास आराखडा मंत्रालयातून अद्याप मंजूर होऊन आलेला नाही. त्यामुळे अनेक विकासकामे ठप्प आहेत. यामुळे बेरोजगारांना नोकरी नाही, हातावर पोट भरावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर माजी प्र. नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक स्वप्निल शेलार यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष कैलास चोथे, नगरसेवक दीपक गिते, शांताराम बागुल, कुणाल उगले, विष्णू दोबाडे, सागर उजे, काळू भांगरे, संपत बदादे, नितीन रामायणे, मीराबाई लहांगे आदींनी डीपी प्लॅन मंजूर करावा यासाठी नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, शेलार, मुख्याधिकारी डॉ. चेतना केरु रे आदींचा मुंबई येथे जाण्यासाठी शिष्टमंडळात समावेश करावा, प्रामुख्याने त्र्यंबक नगर परिषदेच्या डीपीसह अन्य प्रश्न मार्गी लावावेत, या मागणीसाठी धरणे धरले. यावेळी अनेक विस्थापित व्यावसायिक उपस्थित होते.नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर व मुख्याधिकारी डॉ. चेतना केरु रे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. लवकरच आपण मुंबईला जाऊन डीपीबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शहरविकास आराखडा (डीपी) तयार असल्यास अगर कोणाची स्वाक्षरी होणे बाकी असल्यास स्वाक्षरी घेउन येउ. असे ठोक आश्वासन दिल्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. (२१ टीबीके १ ते ५)

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरEnchroachmentअतिक्रमण