शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

त्र्यंबकेश्वरला अतिक्रमणांवर बुलडोझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 18:45 IST

त्र्यंबकेश्वर शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर टपरीधारकांनी केलले अतिक्रमण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जमीनदोस्त केल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. दरम्यान, अतिक्रमणांमुळे विस्थापित झालेल्या टपरीधारकांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी शुक्रवारी नगरसेवकांनी पालिकेसमोर घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देटपरीधारकांच्या पुनर्वसनाची मागणी : नगरसेवकांचे पालिकेसमोर धरणे, घोषणाबाजी!

त्र्यंबकेश्वर : शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर टपरीधारकांनी केलले अतिक्रमण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जमीनदोस्त केल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. दरम्यान, अतिक्रमणांमुळे विस्थापित झालेल्या टपरीधारकांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी शुक्रवारी नगरसेवकांनी पालिकेसमोर घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केले.गुरुवारपासून त्र्यंबकेश्वर शहरात अतिक्र मण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेत व्यावसायिकांचे अतिक्र मण पालिकेच्या अतिक्र मणविरोधी पथकाने जमीनदोस्त केले. या टपरीधारकांचे पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी नगरसेवकांनी धरणे आंदोलन करून घरचाच आहेर दिला. शहरविकास आराखडा दर दहा वर्षांनी नगरपालिकेच्या सभागृहात विशेष सर्वसाधारण बैठकीत तयार केला जातो. दहा वर्षांत शहरात कोणकोणती विकासकामे करायची याबाबत आराखडा मंजूर करून ठेवला जातो. त्याला डेव्हलपमेंट प्लॅन (डीपी) म्हणतात. हाच डीपी प्लॅन तयार करून मंत्रालयात पाठवला आहे. विशेष म्हणजे हा आराखडा मागील कौन्सिलच्या काळात पाठविलेला आहे. त्यानंतर विद्यमान कौन्सिलला दीड वर्षाचा कालावधी झाला आहे.त्र्यंबक नगर परिषदेने सन २०१८ मध्ये तयार केलेला विकास आराखडा मंत्रालयातून अद्याप मंजूर होऊन आलेला नाही. त्यामुळे अनेक विकासकामे ठप्प आहेत. यामुळे बेरोजगारांना नोकरी नाही, हातावर पोट भरावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर माजी प्र. नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक स्वप्निल शेलार यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष कैलास चोथे, नगरसेवक दीपक गिते, शांताराम बागुल, कुणाल उगले, विष्णू दोबाडे, सागर उजे, काळू भांगरे, संपत बदादे, नितीन रामायणे, मीराबाई लहांगे आदींनी डीपी प्लॅन मंजूर करावा यासाठी नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, शेलार, मुख्याधिकारी डॉ. चेतना केरु रे आदींचा मुंबई येथे जाण्यासाठी शिष्टमंडळात समावेश करावा, प्रामुख्याने त्र्यंबक नगर परिषदेच्या डीपीसह अन्य प्रश्न मार्गी लावावेत, या मागणीसाठी धरणे धरले. यावेळी अनेक विस्थापित व्यावसायिक उपस्थित होते.नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर व मुख्याधिकारी डॉ. चेतना केरु रे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. लवकरच आपण मुंबईला जाऊन डीपीबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शहरविकास आराखडा (डीपी) तयार असल्यास अगर कोणाची स्वाक्षरी होणे बाकी असल्यास स्वाक्षरी घेउन येउ. असे ठोक आश्वासन दिल्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. (२१ टीबीके १ ते ५)

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरEnchroachmentअतिक्रमण