शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

बिबट्याकडून म्हशीचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:31 IST

परिसरातील शेतीमळे व राहुरीगावाच्या आसपास हिंसक बिबट्याने गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घातला असून, बुधवारी पहाटे राहुरी शिवारात जनावरांच्या गोठ्यावर हल्ला चढवून बिबट्याने दुभत्या म्हशीचा फडशा पाडला आहे.

भगूर : परिसरातील शेतीमळे व राहुरीगावाच्या आसपास हिंसक बिबट्याने गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घातला असून, बुधवारी पहाटे राहुरी शिवारात जनावरांच्या गोठ्यावर हल्ला चढवून बिबट्याने दुभत्या म्हशीचा फडशा पाडला आहे. बिबट्याच्या दिवस-रात्र दर्शनाने दारणा काठावरील शेतकरी भयभीत झाले असून, बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.भगूर, राहुरी, दोनवाडे शिवारातून दारणा नदी खळाळून वाहत असल्यामुळे दुतर्फा शेतीमळे वाढले आहेत. त्याचबरोबर या भागात घनदाट जंगल पसरले आहे. त्यामुळे या भागात इगतपुरी, कसारा आदी भागातून बिबटे भक्ष्य शोधण्यासाठी दारणाकाठी येत असतात. शेतमळे व जंगलामुळे त्यांना लपण्यासाठी पुरेशी जागा असून, शेतकऱ्यांची जनावरे त्यांचे भक्ष्य ठरू लागले आहेत. त्यामुळे एकाहून अधिक बिबटे या ठिकाणी वास्तव्यास असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. त्यातूनच बुधवारी पहाटे चार वाजता राहुरी शिवारातील सुकदेव आव्हाड यांच्या गट नं. २०४ मध्ये बिबट्याने गोठ्यात शिरून जनावरांवर हल्ला चढविला यात गणेश सुभाष भुजबळ याची म्हैस जागीच ठार झाली. अन्य जनावरांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने या ठिकाणाहून पळ काढला. चार महिन्यांपूर्वीदेखील बिबट्याने या भागात दोन गायींचे पारडू व एक गोºहा अशाच प्रकारे हल्ला चढवून ठार केले असून, या भागातील शेतकºयांचे श्वानदेखील बिबट्याने फस्त केल्याने नागरिकांना भीती वाटू लागली असल्याची तक्रार गणेश भुजबळ यांनी केली तसेच बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या म्हशीची नुकसानभरपाई मिळावी यासाठी वनरक्षकांना निवेदन दिले. या घटनेनंतर वनाधिकारी मधुकर गोसावी यांनी पाहणी करून पंचनामा केला.त्यामुळे या भागातील नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सुकदेव आव्हाड, अर्जुन कापसे, काळू आवारे, योगेश आव्हाड, सुभाष वाघ, उत्तम पानसरे, राजाभाऊ सोनवणे, नरेश गायकवाड आदी शेतकºयांनी केली आहे.वावर वाढलाभगूरची स्मशानभूमी, आठवडे बाजार, दारणा नदीकिनारी तसेच रामदास सोनवणे यांच्या बंगल्याच्या परिसरात दररोज रात्री बिबट्या फिरत असून, त्याने अनेक श्वानांचा फडशा पाडला आहे.वनविभागाने बिबटे पकडल्यावर ते कसारा घाटातील जंगलात सोडले जातात आणि हेच बिबटे भक्ष्य, पाण्याच्या शोधात इगतपुरीसह देवळाली एअरफोर्स जंगल, दारणा नदीच्या काठावरील मानवी वस्तीच्या शेतमळ्यात वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे त्यांना जेरबंद करूनही ते पुन्हा पुन्हा परतत आहेत.- निखिल भालेराव

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग