शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याकडून म्हशीचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:31 IST

परिसरातील शेतीमळे व राहुरीगावाच्या आसपास हिंसक बिबट्याने गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घातला असून, बुधवारी पहाटे राहुरी शिवारात जनावरांच्या गोठ्यावर हल्ला चढवून बिबट्याने दुभत्या म्हशीचा फडशा पाडला आहे.

भगूर : परिसरातील शेतीमळे व राहुरीगावाच्या आसपास हिंसक बिबट्याने गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घातला असून, बुधवारी पहाटे राहुरी शिवारात जनावरांच्या गोठ्यावर हल्ला चढवून बिबट्याने दुभत्या म्हशीचा फडशा पाडला आहे. बिबट्याच्या दिवस-रात्र दर्शनाने दारणा काठावरील शेतकरी भयभीत झाले असून, बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.भगूर, राहुरी, दोनवाडे शिवारातून दारणा नदी खळाळून वाहत असल्यामुळे दुतर्फा शेतीमळे वाढले आहेत. त्याचबरोबर या भागात घनदाट जंगल पसरले आहे. त्यामुळे या भागात इगतपुरी, कसारा आदी भागातून बिबटे भक्ष्य शोधण्यासाठी दारणाकाठी येत असतात. शेतमळे व जंगलामुळे त्यांना लपण्यासाठी पुरेशी जागा असून, शेतकऱ्यांची जनावरे त्यांचे भक्ष्य ठरू लागले आहेत. त्यामुळे एकाहून अधिक बिबटे या ठिकाणी वास्तव्यास असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. त्यातूनच बुधवारी पहाटे चार वाजता राहुरी शिवारातील सुकदेव आव्हाड यांच्या गट नं. २०४ मध्ये बिबट्याने गोठ्यात शिरून जनावरांवर हल्ला चढविला यात गणेश सुभाष भुजबळ याची म्हैस जागीच ठार झाली. अन्य जनावरांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने या ठिकाणाहून पळ काढला. चार महिन्यांपूर्वीदेखील बिबट्याने या भागात दोन गायींचे पारडू व एक गोºहा अशाच प्रकारे हल्ला चढवून ठार केले असून, या भागातील शेतकºयांचे श्वानदेखील बिबट्याने फस्त केल्याने नागरिकांना भीती वाटू लागली असल्याची तक्रार गणेश भुजबळ यांनी केली तसेच बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या म्हशीची नुकसानभरपाई मिळावी यासाठी वनरक्षकांना निवेदन दिले. या घटनेनंतर वनाधिकारी मधुकर गोसावी यांनी पाहणी करून पंचनामा केला.त्यामुळे या भागातील नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सुकदेव आव्हाड, अर्जुन कापसे, काळू आवारे, योगेश आव्हाड, सुभाष वाघ, उत्तम पानसरे, राजाभाऊ सोनवणे, नरेश गायकवाड आदी शेतकºयांनी केली आहे.वावर वाढलाभगूरची स्मशानभूमी, आठवडे बाजार, दारणा नदीकिनारी तसेच रामदास सोनवणे यांच्या बंगल्याच्या परिसरात दररोज रात्री बिबट्या फिरत असून, त्याने अनेक श्वानांचा फडशा पाडला आहे.वनविभागाने बिबटे पकडल्यावर ते कसारा घाटातील जंगलात सोडले जातात आणि हेच बिबटे भक्ष्य, पाण्याच्या शोधात इगतपुरीसह देवळाली एअरफोर्स जंगल, दारणा नदीच्या काठावरील मानवी वस्तीच्या शेतमळ्यात वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे त्यांना जेरबंद करूनही ते पुन्हा पुन्हा परतत आहेत.- निखिल भालेराव

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग