शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
3
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
5
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
6
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
7
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
8
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
9
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
10
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
11
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
12
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
13
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
14
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
15
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
16
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
17
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
18
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
19
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
20
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!

जिल्ह्याच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:17 IST

अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी विकास व कृषी संशोधनावर अधिक भर देण्यात आल्याने आगामी काळात ...

अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी विकास व कृषी संशोधनावर अधिक भर देण्यात आल्याने आगामी काळात कृषी क्षेत्राला चांगले दिवस येऊ शकतील. युवकांना कृषी क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

- यशवंत गावंडे, प्रगतिशील शेतकरी, गावंदपाडा, ता.पेठ

---------------------------

राज्याच्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रालाही प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बाजार समित्यांच्या बळकटीकरणास प्राधान्य देत बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली. ‘विकेल ते पिकेल’ या धोरणानुसार राज्यात पिकनिहाय मूल्य साखळ्यांच्या विकासासाठी २१०० कोटी रुपयांची तरतूद केली. कृषी संशोधनासाठी कृषी विद्यापीठांना प्रतिवर्ष २०० कोटी याप्रमाणे तीन वर्षांसाठी ६०० कोटींची तरतूद केली. वीजजोडणी व सिंचनालाही प्राधान्य दिले. या नुसत्या घोषणा ठरू नये. प्रत्यक्षात कृती अपेक्षित आहे. कोरोनाने अर्थिक अडचणीत सापडलेल्या, थकलेल्या शेतकर्‍यांचे वीजबिल माफ करण्याची आवश्यकता होती.

- संतू पाटील झांबरे, शेतकरी नेते, येवला

----------------------------------------------

अर्थसंकल्प समाधानकारक व सर्वसमावेशक म्हणावा लागेल. त्यात कृषी, आरोग्य, दळणवळण आणि पर्यटनासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. विशेषत: शेतकऱ्यांसाठी चांगला अर्थसंकल्प म्हणावा लागेल. कृषिपंप जोडणी, शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदाराने कर्ज असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. वाहतूक सुकर करण्यासाठी चांगली तरतूद आहे. सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराचा पर्यटनमधून विकास करण्यासाठी भरीव निधी मिळणार आहे. आरोग्य क्षेत्राला ७५०० हजार कोटीची तरतूद समाधानकारक आहे. कृषी व पशुसंवर्धनासाठी मोठा निधी आहे. विकेल ते पिकेलसाठी २१०० कोटी दिल्याने शेतकऱ्यांचे समाधान झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीसाठीही दोन हजार कोटींची तरतूद झाल्याने शेतकऱ्यांचा हा अर्थसंकल्प सुखावणारा आहे.

- हौशिराम घोटेकर, अध्यक्ष, नाशिक जिल्हा दूध संघ

-------------------------------------------------

सप्तशृंगी गडावरील तीर्थक्षेत्र विकासासाठी व पाणीटंचाईसह इतर विकासकामांसाठी भरीव निधीची तरतूद केली असल्यामुळे गडाच्या विकासाला आता खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे. गडावरीलअंतर्गत रस्ते विकासाला चालना मिळणार असल्यामुळे कळवण तालुक्यासाठी आशादायी अर्थसंकल्प आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची तरतूद केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी रोजगार निर्मिती व कल्याणकारी योजनांबरोबरच पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आले आहे ही विशेष बाब आहे. जिल्ह्यात नवीन अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील तरुणाईला शिक्षण तसेच रोजगार जिल्ह्यातच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आशादायी अर्थसंकल्प आहे

- घनश्याम पवार, नवीबेज

---------------------------------------------------

नाशिक जिल्ह्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योग उभारणार असल्याने शेतकऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्याबरोबरच शेतकरी बांधवांना तीन लाख रुपये कर्जावर शून्य टक्के व्याजदर असल्याने कोरोनाच्या संकटामध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने आधार मिळणार आहे. राज्यसरकार बाजारसमितीच्या बळकटीसाठी दोन हजार कोटींची योजना राबविणार असल्याने शेतकरी बांधवांसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सुगीचे दिवस निश्चित येतील अशी आशा आहे.

संदीप गुळवे, मुख्य प्रशासक, कृउबा, घोटी

---------------------------------------------------------

सर्वसामान्य जनतेच्या हितास प्राधान्य देणारा अर्थसंकल्प सादर झाला. शेतकरी बांधवांना बिनव्याजी कर्जाने आत्महत्यांचे सत्र थांबेल. कृषी क्षेत्राला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. गोरगरीब मुलींच्या शिक्षणासाठी पायपीट थांबून पालकांना मदत होईल. सप्तशृंगी गड उत्तर महाराष्ट्रवासीयांचे आराध्य देवता असून, विकासासाठी निधी देण्याचा निर्णय अभिनंदनीय आहे.

- संजय फतनानी, उद्योजक, मालेगाव

--------------------------------

कोरोनाचे संक्रमण असताना आरोग्याबरोबरच कृषी व ग्रामीण विकासाला नवी दिशा देणारा हा अर्थसंकल्प आहे. कृषी व पायाभूत सुविधा बरोबरच शेतकऱ्याला तीन लाखांपर्यंतचे कर्ज हे शून्य टक्के व्याजदराने देण्यात येणार असल्याने त्याचा मोठा फायदा होणार आहे. बाजार समिती बळकटीकरणासाठीदेखील निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालालादेखील योग्य भाव मिळेल. शिकाऊ उमेदवारांना प्रोत्साहन योजना सुरू करण्यात येणार असल्यामुळे आर्थिक नाडीदेखील मजबूत होईल. कोरोना संकट असतानादेखील कृषी व पायाभूत सुविधांमुळे रोजगार उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. निफाड तालुक्यात चितेगाव फाट्या वर असलेल्या होर्टीकल्चर बोर्डामार्फत व जवळून जात असलेल्या सुरत चेन्नई महामार्गामुळे तेथे ऍग्री कॉरिडॉरचा विचार वरिष्ठ स्तरावरून झाल्यास कृषी उद्योगासाठी तो टर्निंग पॉईंट ठरेल.

- रामभाऊ माळोदे, उद्योजक, पिंपळगाव बसवंत