शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलचे तोडले विज कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 19:54 IST

पाटोदा : विज वितरण कंपनीचे सुमारे साडेसात लाख रु पयांचे विज बिल थकविल्याने विज वितरण कंपनीने कारवाई करीत पाटोदा येथील बीएसएनएल कार्यालयाचा विज पुरवठा खंडीत केल्याने गेल्या आठ दिवसांपासून पाटोदा येथील शेकडो दूरध्वनी व सुमारे पाच हजार पेक्षा जास्त मोबाईल बंद असून त्यामुळे नागरिकांना संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्देपाटोदा : पाच हजार मोबाईल धारकांचा संपर्क तुटलासाडेसात लाखाचे वीजिबल थकविल्याने विज पुरवठा तोडला

पाटोदा : विज वितरण कंपनीचे सुमारे साडेसात लाख रु पयांचे विज बिल थकविल्याने विज वितरण कंपनीने कारवाई करीत पाटोदा येथील बीएसएनएल कार्यालयाचा विज पुरवठा खंडीत केल्याने गेल्या आठ दिवसांपासून पाटोदा येथील शेकडो दूरध्वनी व सुमारे पाच हजार पेक्षा जास्त मोबाईल बंद असून त्यामुळे नागरिकांना संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.कनेक्टीव्हिटी नाही, त्यामुळे सर्व बँक व्यवहार तसेच आॅनलाइन सेवा बंद असल्याने नागरिक व जेष्ठ नागरिकांची मोठया प्रमाणात गैरसोय झाली आहे. आठ दिवस होऊनही बीएसएनएल कढून वीजबिल भरण्यासाठी पावले उचलली जात नसल्याने ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.पाटोदा येथे बीएसएनएलचे कार्यालय असून येथील विज वितरण कंपनीकडून या कार्यालयाला विज पुरवठा केला जात आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून बीएसएनएलने सुमारे साडेसात लाखाचे बिल थकविल्याने व वारंवार सूचना देऊनही बिल भरण्यास टाळाटाळ केल्याने विज वितरण कंपनीने कारवाई करीत गेल्या आठ दिवसांपासून खंडीत केला. त्यामुळे या भागातील संपूर्ण दूरध्वनी तसेच मोबाईल सेवा बंद पडली आहे.या भागात बँक आॅफ बडौदा ही एकमेव राष्ट्रीयकृत बँक असून सुमारे चाळीस हजार खातेदार या बँकेला परिसरातील सुमारे विस गावे जोडलेली आहेत. मात्र कनेक्टीव्हिटी उपलब्ध नसल्याने ग्राहकांचे गैरसाय होत आहे. तसेच सर्वच आॅनलाईन सेवा बंद असल्याने शासकीय दाखले काढणेसाठी विद्यार्थी व पालकांची मोठी धावपळ झाली आहे.चौकट : गेल्या चार दिवसांपासून सुमारे पाच सहा किलोमीटर पायपीट करून मी पाटोदा येथे पैसे काढण्यासाठी चकरा मारत आहे. मात्र कनेक्टिव्हिटी नसल्याने निराशा होत आहे. बीएसएनएलने यातून मार्ग काढून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी.- सदाशिव जगतापजेष्ठ नागरिक, ठाणगाव.वरिष्ठांना याबाबत कल्पना दिली असून बिल भरण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. वरिष्ठ अधिकारी लवकरच पाटोदा येथे भेट देऊन बिल भरण्यासाठी तडजोड करतील.- पवारमंडळ उपभियांता, बीएसएनएल, येवला.गेल्या आठ दिवसांपासून विज पुरवठा खंडीत करण्यात आलेला असतांनाही बीएसएनएलकडून बिल भरण्यासाठी प्रयत्न होत नसल्याने नागरिकांची मोठया प्रमाणात गैरसोय झाली आहे. जेष्ठ नागरिकांना आपले शासकीय मानधन घेण्यासाठी चकरा माराव्या लागत आहे. येत्या दोन दिवसात बीएसएनएल येथील सेवा सुरळीत न केल्यास बीएसएनएल सेवेची अंतयात्रा काढणार आहे.- उस्मान शेख, पाटोदा.