शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बीएसएनएल कर्मचारी अनिश्चिततेच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:04 IST

प्रदीर्घ कालावधीपासून तोट्यात चालत असलेल्या भारत संचार नगर निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिफोन लिमिटेड या दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणासह बीएसएनएलला फोर-जी स्पेट्रमसाठीही परवानगी देण्याचा आणि कर्मचाऱ्यांसाठी व्हीआरएस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

नाशिक : प्रदीर्घ कालावधीपासून तोट्यात चालत असलेल्या भारत संचार नगर निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिफोन लिमिटेड या दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणासह बीएसएनएलला फोर-जी स्पेट्रमसाठीही परवानगी देण्याचा आणि कर्मचाऱ्यांसाठी व्हीआरएस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे सहाशे ते साडेसहाशे कर्मचाऱ्यांना व्हीआरएस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आर्थिक संकटामुळे अडचणीत असलेल्या बीएसएनएलला बंद करण्याचा विचार केंद्र सरकार करीत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे हजार ते बाराशे कर्मचाºयांविषयी प्रश्न झाला होता.परंतु बीएसएनएलला वाचविण्यासाठी बुधवारी (दि.२३) पंतप्रधान नरेंद्र्र मोदींच्या अध्यक्षतेखालील कें द्रीय कॅबिनेटच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याने कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे. सरकार दोन्ही कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र सरकार या प्रकारचे कोणतेही पाऊल उचलणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, तोट्यात चालणाºया कंपन्यांना रुळावर आणण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांचे सरकारी बॉन्ड आणले जाणार आहेत.एमटीएनएल आणि बीएसएनएलसाठी ३८ हजार कोटी रुपये उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. याशिवाय कर्मचाºयांच्या स्वेच्छानिवृत्तीसाठी योजनाही आणली जाणार आहे. बीएसएनलच्या पुनरुज्जीवनासाठी कर्मचाºयांना व्हीआरएस, फोर-जी स्पेक्ट्रमला परवानगी देण्यासोबतच बीएसएनएलकडे असलेल्या मालमत्तांपासून आर्थिक उत्पन्न मिळविण्याचा सल्लाही बीएसएनएलला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.जिल्ह्यात सुमारे ९५० कर्मचारीजिल्ह्यात सुमारे बीएसएनएलचे ९५० कर्मचारी व अधिकारी आहे. मात्र सद्यस्थितीत तीनशे ते साडेतीनशे कर्मचाºयांवरही जिल्ह्यातील विविध केंद्रांचे कामकाज सुरळीत चालू शकते, अशी माहिती नाशिक महाव्यवस्थापक नितीन महाजन यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे सहाशे ते साडेसहाशे कर्मचाºयांना व्हीआरएस मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील विविध केंद्रांवरील सुरक्षारक्षक आणि अन्य खर्चांत बीएसएनएलने यापूर्वीच कपात केली असून, यात आता कर्मचारी कपातीची भर पडणार आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएलGovernmentसरकार