शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

बीएसएनएल कर्मचारी अनिश्चिततेच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:04 IST

प्रदीर्घ कालावधीपासून तोट्यात चालत असलेल्या भारत संचार नगर निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिफोन लिमिटेड या दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणासह बीएसएनएलला फोर-जी स्पेट्रमसाठीही परवानगी देण्याचा आणि कर्मचाऱ्यांसाठी व्हीआरएस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

नाशिक : प्रदीर्घ कालावधीपासून तोट्यात चालत असलेल्या भारत संचार नगर निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिफोन लिमिटेड या दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणासह बीएसएनएलला फोर-जी स्पेट्रमसाठीही परवानगी देण्याचा आणि कर्मचाऱ्यांसाठी व्हीआरएस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे सहाशे ते साडेसहाशे कर्मचाऱ्यांना व्हीआरएस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आर्थिक संकटामुळे अडचणीत असलेल्या बीएसएनएलला बंद करण्याचा विचार केंद्र सरकार करीत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे हजार ते बाराशे कर्मचाºयांविषयी प्रश्न झाला होता.परंतु बीएसएनएलला वाचविण्यासाठी बुधवारी (दि.२३) पंतप्रधान नरेंद्र्र मोदींच्या अध्यक्षतेखालील कें द्रीय कॅबिनेटच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याने कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे. सरकार दोन्ही कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र सरकार या प्रकारचे कोणतेही पाऊल उचलणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, तोट्यात चालणाºया कंपन्यांना रुळावर आणण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांचे सरकारी बॉन्ड आणले जाणार आहेत.एमटीएनएल आणि बीएसएनएलसाठी ३८ हजार कोटी रुपये उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. याशिवाय कर्मचाºयांच्या स्वेच्छानिवृत्तीसाठी योजनाही आणली जाणार आहे. बीएसएनलच्या पुनरुज्जीवनासाठी कर्मचाºयांना व्हीआरएस, फोर-जी स्पेक्ट्रमला परवानगी देण्यासोबतच बीएसएनएलकडे असलेल्या मालमत्तांपासून आर्थिक उत्पन्न मिळविण्याचा सल्लाही बीएसएनएलला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.जिल्ह्यात सुमारे ९५० कर्मचारीजिल्ह्यात सुमारे बीएसएनएलचे ९५० कर्मचारी व अधिकारी आहे. मात्र सद्यस्थितीत तीनशे ते साडेतीनशे कर्मचाºयांवरही जिल्ह्यातील विविध केंद्रांचे कामकाज सुरळीत चालू शकते, अशी माहिती नाशिक महाव्यवस्थापक नितीन महाजन यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे सहाशे ते साडेसहाशे कर्मचाºयांना व्हीआरएस मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील विविध केंद्रांवरील सुरक्षारक्षक आणि अन्य खर्चांत बीएसएनएलने यापूर्वीच कपात केली असून, यात आता कर्मचारी कपातीची भर पडणार आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएलGovernmentसरकार