शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

पोटच्या गोळ्यानेच केला जन्मदात्यांसह भावाचा खून!

By admin | Updated: June 8, 2017 00:25 IST

तिहेरी खून प्रकरण : भांडणास त्रासून केली हत्या

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लहानपणापासूनच धाकट्या भावाच्या चुका आई-वडील पोटात घालतात मात्र, आपणास शिव्यांचेच धनी व्हावे लागते, सापत्नपणाची वागणूक तर नेहमीचीच़ त्यातच धाकट्या भावाच्या अनैतिक संबंधांमुळे घरात सुरू असलेल्या वादामुळे थोरला मुलगा सोमनाथ जगन्नाथ शेळके यानेच जन्मदाते आई-वडील व भावाचा खून केल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी बुधवारी दिली़ ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेस या खुनाचा उलगडा करण्यास यश आले आहे़दिंडोरी तालुक्यातील कोकणगाव खुर्द येथे ३० मे रोजी जगन्नाथ शेळके, शोभा जगन्नाथ शेळके आणि हर्षद जगन्नाथ शेळके या तिघांचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती़ मृतदेहांवरील दागिने तसेच घरातील वस्तूही जागेवरच आढळून आल्याने खुनाचे नेमके कारण काय याबाबत पोलीस यंत्रणाही चक्रावली होती़ सोमनाथ शेळके याच्या फिर्यादीवरून वणी पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी तीन पथके तयार केली होती़ कुटुंबातील तिघांच्या मृत्यूनंतरही चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नसलेला फिर्यादी सोमनाथवर पोलिसांनी पाळत ठेवली असता त्याचे वागणे संशयास्पद आढळून आले़ यानंतर पोलिसी खाक्या न दाखविता भावनिक साद घातल्यानंतर त्याने आई, वडील व भाऊ या तिघांचा ट्रॅक्टरच्या टॉपलिंगने खून केल्याची कबुली दिली.घरातील थोरला मुलगा असून, तसेच शेतीची सर्व कामे करूनही शिव्याच खाव्या लागत असे़ मात्र लहान भाऊ हर्षद हा काहीही कामधंदा करीत नसूनही आई-वडील त्याच्या चुकांकडे काणाडोळा करीत असल्याचा राग सोमनाथच्या मनात होता़ मे महिन्याच्या अखेरीस धाकटा भाऊ हर्षदचे अनैतिक संबंध उघडकीस आले व त्यावरून घरात वाद सुरू झाले़ यानंतर आई-वडील, तुही धाकट्यासारखाच आहेस, दारू पितो, तुझेही अनैतिक संबंध असतील, असे सारखे टोचून बोलत असत़ याच कारणावरून ३० मे रोजी सकाळी सोमनाथला वडिलांनी शिवीगाळ केली होती़ त्यामुळे रागाच्या भरात सोमनाथने या तिघांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला.स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे, अरुण पगारे, रामहरी मुंढे, हवालदार रवींद्र वानखेडे, कैलास देशमुख, अमोल घुगे आदिंनी यशस्वीरीत्या या खुनाचा उलगडा केला़सोमनाथचा स्वभाव रागीट२०१३ मध्ये शेतातील आंब्याच्या झाडाच्या फांद्या छाटण्यावरून वडील सोमनाथला रागावले होते़ तेव्हा त्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता़ त्यास छोट्या-छोट्या कारणांवरून राग येत असल्याचे पोलिसांनी सांगितले़पोलीस यंत्रणाही चक्रावलीएकाच कुटुंबातील तिघांच्या खुनामागे चोरी वा स्थावर मालमत्ता असे कोणतेही कारण समोर येत नसल्याने पोलीस यंत्रणाही चक्रावली होती़ त्यामुळे त्यांनी मयत हर्षदचे अनैतिक संबंध असलेल्या मुलीच्या कुटुंबीयांकडेही चौकशी केली, मात्र हाती काही लागले नाही़ त्यात फिर्यादी सोमनाथकडे खून करण्यासारखे ठोस कारण नसल्याने पोलिसांना त्याबाबत प्रथम शंका आली नाही़ मात्र, त्याच्यावर पाळत ठेवल्यानंतर त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे त्याची चौकशी केली व अखेर सत्य बाहेर आले़