शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

पोटच्या गोळ्यानेच केला जन्मदात्यांसह भावाचा खून!

By admin | Updated: June 8, 2017 00:25 IST

तिहेरी खून प्रकरण : भांडणास त्रासून केली हत्या

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लहानपणापासूनच धाकट्या भावाच्या चुका आई-वडील पोटात घालतात मात्र, आपणास शिव्यांचेच धनी व्हावे लागते, सापत्नपणाची वागणूक तर नेहमीचीच़ त्यातच धाकट्या भावाच्या अनैतिक संबंधांमुळे घरात सुरू असलेल्या वादामुळे थोरला मुलगा सोमनाथ जगन्नाथ शेळके यानेच जन्मदाते आई-वडील व भावाचा खून केल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी बुधवारी दिली़ ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेस या खुनाचा उलगडा करण्यास यश आले आहे़दिंडोरी तालुक्यातील कोकणगाव खुर्द येथे ३० मे रोजी जगन्नाथ शेळके, शोभा जगन्नाथ शेळके आणि हर्षद जगन्नाथ शेळके या तिघांचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती़ मृतदेहांवरील दागिने तसेच घरातील वस्तूही जागेवरच आढळून आल्याने खुनाचे नेमके कारण काय याबाबत पोलीस यंत्रणाही चक्रावली होती़ सोमनाथ शेळके याच्या फिर्यादीवरून वणी पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी तीन पथके तयार केली होती़ कुटुंबातील तिघांच्या मृत्यूनंतरही चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नसलेला फिर्यादी सोमनाथवर पोलिसांनी पाळत ठेवली असता त्याचे वागणे संशयास्पद आढळून आले़ यानंतर पोलिसी खाक्या न दाखविता भावनिक साद घातल्यानंतर त्याने आई, वडील व भाऊ या तिघांचा ट्रॅक्टरच्या टॉपलिंगने खून केल्याची कबुली दिली.घरातील थोरला मुलगा असून, तसेच शेतीची सर्व कामे करूनही शिव्याच खाव्या लागत असे़ मात्र लहान भाऊ हर्षद हा काहीही कामधंदा करीत नसूनही आई-वडील त्याच्या चुकांकडे काणाडोळा करीत असल्याचा राग सोमनाथच्या मनात होता़ मे महिन्याच्या अखेरीस धाकटा भाऊ हर्षदचे अनैतिक संबंध उघडकीस आले व त्यावरून घरात वाद सुरू झाले़ यानंतर आई-वडील, तुही धाकट्यासारखाच आहेस, दारू पितो, तुझेही अनैतिक संबंध असतील, असे सारखे टोचून बोलत असत़ याच कारणावरून ३० मे रोजी सकाळी सोमनाथला वडिलांनी शिवीगाळ केली होती़ त्यामुळे रागाच्या भरात सोमनाथने या तिघांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला.स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे, अरुण पगारे, रामहरी मुंढे, हवालदार रवींद्र वानखेडे, कैलास देशमुख, अमोल घुगे आदिंनी यशस्वीरीत्या या खुनाचा उलगडा केला़सोमनाथचा स्वभाव रागीट२०१३ मध्ये शेतातील आंब्याच्या झाडाच्या फांद्या छाटण्यावरून वडील सोमनाथला रागावले होते़ तेव्हा त्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता़ त्यास छोट्या-छोट्या कारणांवरून राग येत असल्याचे पोलिसांनी सांगितले़पोलीस यंत्रणाही चक्रावलीएकाच कुटुंबातील तिघांच्या खुनामागे चोरी वा स्थावर मालमत्ता असे कोणतेही कारण समोर येत नसल्याने पोलीस यंत्रणाही चक्रावली होती़ त्यामुळे त्यांनी मयत हर्षदचे अनैतिक संबंध असलेल्या मुलीच्या कुटुंबीयांकडेही चौकशी केली, मात्र हाती काही लागले नाही़ त्यात फिर्यादी सोमनाथकडे खून करण्यासारखे ठोस कारण नसल्याने पोलिसांना त्याबाबत प्रथम शंका आली नाही़ मात्र, त्याच्यावर पाळत ठेवल्यानंतर त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे त्याची चौकशी केली व अखेर सत्य बाहेर आले़