शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

साधुत्वाच्या तेजाने झळाळले कुशावर्त

By admin | Updated: September 25, 2015 23:45 IST

त्र्यंबकेश्वरी अखेरचे शाहीस्नान : दशआखाड्यांची थाटात मिरवणूक

नाशिक : ‘बम बम भोले’, ‘हर हर महादेव’चा गजर ब्रह्मगिरीच्या कातळांनाही भेदून गेला आणि भाद्रपद शुद्ध द्वादशीला श्रद्धा व भक्तीने भारलेल्या त्र्यंबकनगरीत ब्रह्ममुहूर्तावर तीर्थराज कुशावर्त साधुत्वाच्या तेजाने झळाळून निघाला. सिंहस्थ कुंभमेळ्यातील अखेरच्या व तृतीय शाहीपर्वणीला दहाही आखाड्यांतील शैवपंथीय साधू-महंतांनी शाही थाटात मिरवणुकीने येत कुशावर्तात स्नान करत भाविक-भक्तांचा निरोप घेतला. गेल्या महिनाभरापासून अखंडपणे सुरू असलेल्या मंगलमय कुंभपर्वाची समाप्ती होत असतानाच लाखो भाविक कुशावर्तात स्नान करत त्र्यंबकराजाच्या चरणी नतमस्तक झाले. दरम्यान, त्र्यंबकेश्वर गाठण्यासाठी भाविकांना सुमारे २० कि.मी. पायपीट करावी लागल्याने पहिल्या पर्वणीचीच पुनरावृत्ती होत भाविकांच्या उद्रेकाला एसटी महामंडळासह प्रशासनाला सामोरे जावे लागले.नाशिक येथील तीनही पर्वणी आटोपल्यानंतर त्र्यंबकेश्वरमधील तिसऱ्या आणि अखेरच्या पर्वणीला अपेक्षेप्रमाणे भाविकांनी लाखोंच्या संख्येने गर्दी केली. पर्वणीपूर्वीच आदल्या दिवशी भाविकांच्या प्रचंड गर्दीने त्र्यंबकनगरीचा कोपरा-कोपरा व्यापला. गुरुवारी रात्री ९ वाजेपर्यंत कुशावर्तात स्नानासाठी भाविकांची गर्दी लोटली होती. त्यानंतर कुशावर्त साधू-महंतांच्या शाहीस्नानासाठी मोकळा करण्यात आला. रात्री १२.३० वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुशावर्तावर आगमन झाले आणि त्यांच्या हस्ते मानसरोवरातून आणलेले जल कुशावर्तात प्रवाहित करण्यात आले. गुरुवारी उत्तररात्री अडीच वाजेच्या सुमारास शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी  कुशावर्तात स्नान केले. त्यानंतर, खंडेराव मंदिरापासून पारंपरिक मार्गाने दहाही आखाड्यांची शाही थाटात निघालेली मिरवणूक भाविकांचे मुख्य आकर्षण ठरली. प्रामुख्याने, नागा साधूंच्या नृत्य आणि कसरतींनी मिरवणुकीचा थाट आणखीणच वाढविला. भगव्या वस्त्रातील साधू-महंतांसह भाविकांचा सहभाग आणि छत्र-चामरासह बॅँडपथकाच्या साथीने निघालेली शाही मिरवणूक दहा तास चालली. पोलिसांनी ‘होल्ड अ‍ॅण्ड रिलिज’ पद्धतीचा अवलंब करत एकेक आखाड्यांना कुशावर्तापर्यंत नेऊन पोहोचविले. मिरवणुकीत अग्रभागी असलेल्या पंचदशनाम जुना आखाड्याने पहाटे ३.३५ वाजता कुशावर्तात प्रथम स्नान केले. त्यांच्यासोबत अग्नी आणि आवाहन आखाड्याच्या साधू-महंतांनी स्नान केले. त्यापाठोपाठ ठरलेल्या क्रमवारीनुसार पंचायती निरांजनी, आनंद, महानिर्वाणी, अटल, बडा उदासीन व नया उदासीन आणि सरतेशेवटी निर्मल आखाड्याने स्नान केले. यावेळी आखाड्यांचे निशाण तसेच इष्टदेवता यांचे विधिवत पूजन करण्यात आले आणि स्नानानंतर त्र्यंबकराजाचे दर्शन घेत आखाडे आपल्या परतीच्या मार्गाने रवाना झाले. यावेळी शाही मिरवणूक पाहण्यासाठी दुतर्फा भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. सकाळी ९.४५ वाजेपर्यंत आखाड्यांच्या साधू-महंतांचे स्नान चालले. त्यानंतर गर्दीचा अंदाज घेत पोलीस प्रशासनाने दुपारी १२ वाजेनंतर भाविकांना कुशावर्त खुले केले.