शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

संरक्षक कठड्यांअभावी पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:22 IST

इगतपुरी : तालुक्यातील पर्यटकांचा ओघ असलेल्या भावली धरणाजवळील पादचारी पुलाला दोन्ही बाजूंनी संरक्षण कठडे नसल्यामुळे पुलावरील रहदारीला व पादचाऱ्यांना ...

ठळक मुद्देइगतपुरी : भावली धरणाजवळ पर्यटकांची संख्या वाढली

इगतपुरी : तालुक्यातील पर्यटकांचा ओघ असलेल्या भावली धरणाजवळील पादचारी पुलाला दोन्ही बाजूंनी संरक्षण कठडे नसल्यामुळे पुलावरील रहदारीला व पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी संरक्षक भिंत अथवा जाळ्या बसविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.तालुक्यात पर्यटनाचा विकास पहाता भावली धरण व या भागातील धार्मिक स्थळांना भेट देण्याकरिता शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहलीसह पर्यटकांची कायम गर्दी असते. भावली, बोर्ली, जामवाडी, मानवेढे, फांगुळगाव, नांदगाव सदो, पिंपरी संदो, जामुंडे, गवांडे आदींसह बारा वाडी-वस्तीच्या ग्रामस्थांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरचा पूल तयार केला; पण त्याला दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत वा कोणता अधार नसल्याने अनेक लहान-मोठे अपघात झाल्याच्या घटना घटल्या आहेत. शाळकरी मुलांचेदेखील अनेक अपघात झाले आहेत. मानवेढेचे उपसरपंच भाऊराव भागडे यांनी याबाबत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे. मात्र या मागणीकडे सतत दुर्लक्ष होत आहे. पर्यटकांच्या आणि ग्रामस्थांच्या जीविताची सुरक्षा म्हणून या पदाचारी पुलाला संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे, अशी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. सदर पुलाच्या संरक्षक भिंतीचे काम येत्या काही दिवसात सुरू झाले नाही तर या भागातील सर्व ग्रामस्थ जनअंदोलनाचा पवित्रा घेतील, असे मेंगाळ यांनी सांगितले. यावेळी माजी आमदारमेंगाळ, पंचायत समितीचे माजी उपसभापती भगवान आडोळे, मुंबई येथील प्रभू नयन फाउण्डेशनचे आनंद मवाणी, माजी नगरसेवक यशवंत दळवी, पं. स.चे माजी सदस्य नंदलाल भागडे, मानवेढेचे उपसरपंच भाऊराव भागडे, दादा पाटील भागडे, जयराम गव्हाणे आदी उपस्थित होते. पुलाजवळ धनुष्यतीर्थ स्थान असलेल्या महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी अनेक धार्मिक विधी व यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. हजारो भाविक यात्रेला येतात, तर अनेक प्रकारची दुकाने या पुलावरच थाटतात. त्यात दररोज लहान-मोठी वाहने मार्गक्र मण करत असतात. यात मोठी दुर्घटना होणे शक्य असून, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक कठडे किंवा भिंत उभारावी याकरिता महाशिवरात्र यात्रेच्या दिवशी माजी आमदार मेंगाळ व पंचायत समितीचे माजी उपसभापती भगवान आडोळे, सरपंच भाऊराव भागडे, पं.स.चे माजी सदस्य नंदलाल भागडे, माजी सरपंच ज्ञानेश्वर भागडे यांनी प्रत्यक्ष पुलाची पहाणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर चर्चा करीत या विषयाबाबत सविस्तर माहिती दिली.

टॅग्स :Governmentसरकारdam tourismधरण पर्यटन