शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सौंदाणे रस्त्यावर  पुलावरील डांबर उखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:16 IST

सौंदाणे रस्त्यावरील पिंपळगावाजवळ असलेल्या बिलओहळ नाल्यावरील पुलाचे काम पूर्ण होऊन वर्ष झाले. मात्र पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात न आल्याने सातत्याने अपघात होत आहेत. यात अनेकजण जखमी झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित डांबरीकरण करावे, अशी मागणी चालकांकडून केली जात आहे.

देवळा : सौंदाणे रस्त्यावरील पिंपळगावाजवळ असलेल्या बिलओहळ नाल्यावरील पुलाचे काम पूर्ण होऊन वर्ष झाले. मात्र पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात न आल्याने सातत्याने अपघात होत आहेत. यात अनेकजण जखमी झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित डांबरीकरण करावे, अशी मागणी चालकांकडून केली जात आहे.  तालुक्यातील लोकप्रतिनिधी रोज याच रस्त्याने मार्गक्रमण करतात. मात्र त्यांनीही या गैरसोयीची दखल घेतली नसल्याबद्दल नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सौंदाणे, देवळा, कळवण, सुरगाणा, वघई या रस्त्यांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. गेल्या नोव्हेंबर महिन्यात या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती.  पिंपळगाव ( वा ) जवळील बिलओहळ नाल्यावरील पुलाचे काम वर्षभरापूर्वी पूर्ण झाल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले होते. त्यावेळी पुलावरील रस्त्यावर खडी टाकण्यात येऊन तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला होता. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण केले नाही. त्यामुळे चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.  सौंदाणे रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ असल्यामुळे पुलावरील रस्त्याची खडी उखडून गेली आहे. यामुळे पुलावरून वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे. खडी उघडी पडल्याने दगड उडून वाहनांच्या काचा फुटणे, टायर फुटले, पंक्चर होणे, अपघात होणे या घटना नित्याच्या झाल्या आहेत. अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. पुलालगतच्या परिसरात राहणाºया शेतकºयांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. तीन महिन्यांपूर्वीच रस्त्याच्या कडेने खडी टाकण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी वाहन चालक, रहिवाशांकडून केली जात आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा