शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

प्रवासी नसल्याने एसटी बसेसच्या चाकांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:15 IST

नाशिक: कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लोक प्रवास करणे टाळत आहेतच शिवाय जिल्हा निर्बंधामुळे बाजारपेठा आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवरही परिणाम ...

नाशिक: कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लोक प्रवास करणे टाळत आहेतच शिवाय जिल्हा निर्बंधामुळे बाजारपेठा आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवरही परिणाम जाणवू लागल्याने त्याचा परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर झाला आहे. प्रवासी नसल्याने अनेक मार्गांवरील बसफेऱ्या कमी करण्याची वेळदेखील महामंडळावर आली आहे.

मागील वर्षी काेरोना संकटाच्या काळात सुमारे आठ महिने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनचाही प्रसंग निर्माण झाला होता. त्यावेळी राज्य सरकारला विशेष पॅकेज देण्याची वेळ आली होती. यावर्षी बसेस सुरू करण्याला परवानगी देण्यात आल्यानंतर एसटी रुळावर येत असतानाच पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बाजारपेठा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत, शासकीय कार्यालयांची उपस्थिती ५० टक्के करण्यात आली आहे तर खासगी कार्यालये पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली असून प्रवासी संख्या कमी झाली आहे.

--इन्फो--

गेले वर्षही तोट्याचे

मागील वर्षी महामंडळाच्या बसेस जवळपास आठ ते नऊ महिने बसस्थानकातच उभ्या होत्या. जिल्ह्यांतर्गत तसेच परजिल्ह्यातील बसेसदेखील बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे महामंडळाचे उत्पन्न पूर्णपणे थांबले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही प्रश्न निर्माण झाला होता. अत्यावश्यक सेवेसाठीच्या बसेस केवळ सेवाभावी म्हणून सुरू होत्या. मात्र त्यातून काही उत्पन्न मिळत नव्हते. नाशिक विभागाला दरमहा ३२ कोटींचा तोटा सहन करावा लागला.

--इन्फो--

२०५ बसेस पुन्हा बंद

यावर्षी बसेस चालविण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर जिल्ह्यात ८३२ पैकी टप्प्याटप्प्याने ६६७ बसेस सुरू करण्यात आल्या. या माध्यमातून जिल्ह्यातील बससेवाला बुस्ट मिळाला असतानाचा अवघ्या तीन महिन्यात पुन्हा निर्बंधामुळे महामंडळाला बसेस कमी करण्याची वेळ आली आहे. प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे सद्यस्थितीत केवळ २२५ बसेस चालविल्या जात आहेत. त्यातही तालुक्याच्या गावी येणाऱ्या बसेसची प्रवासी संख्या ३० टक्क्याने कमी झाली आहे.

--इन्फो--

उत्पन्न ५० टक्क्याने घटले

जिल्ह्यात यापूर्वी किमान ६०० बसेस सुरू असल्यामुळे महामंडळाचा आर्थिक गाडा सुरळीत सुरू होता. जसजशी प्रवासी संख्या वाढत गेली तसतसे उत्पन्नही वाढत गेल्याने ६० लाखांवरील हजारांवरील उत्पन्न ८० लाखांपर्यंत पोहोचले असताना निर्बंधाचा ब्रेक लागला. आता उत्पन्न २५ ते ३० लाखांच्या जवळपास आले आहे. इतका मोठा फटका बसल्याने जिल्ह्यातील अनेक बसेस बंद होण्याच्या मार्गावर आहेत.