शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

प्रवासी नसल्याने एसटी बसेसच्या चाकांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:15 IST

नाशिक: कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लोक प्रवास करणे टाळत आहेतच शिवाय जिल्हा निर्बंधामुळे बाजारपेठा आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवरही परिणाम ...

नाशिक: कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लोक प्रवास करणे टाळत आहेतच शिवाय जिल्हा निर्बंधामुळे बाजारपेठा आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवरही परिणाम जाणवू लागल्याने त्याचा परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर झाला आहे. प्रवासी नसल्याने अनेक मार्गांवरील बसफेऱ्या कमी करण्याची वेळदेखील महामंडळावर आली आहे.

मागील वर्षी काेरोना संकटाच्या काळात सुमारे आठ महिने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनचाही प्रसंग निर्माण झाला होता. त्यावेळी राज्य सरकारला विशेष पॅकेज देण्याची वेळ आली होती. यावर्षी बसेस सुरू करण्याला परवानगी देण्यात आल्यानंतर एसटी रुळावर येत असतानाच पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बाजारपेठा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत, शासकीय कार्यालयांची उपस्थिती ५० टक्के करण्यात आली आहे तर खासगी कार्यालये पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली असून प्रवासी संख्या कमी झाली आहे.

--इन्फो--

गेले वर्षही तोट्याचे

मागील वर्षी महामंडळाच्या बसेस जवळपास आठ ते नऊ महिने बसस्थानकातच उभ्या होत्या. जिल्ह्यांतर्गत तसेच परजिल्ह्यातील बसेसदेखील बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे महामंडळाचे उत्पन्न पूर्णपणे थांबले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही प्रश्न निर्माण झाला होता. अत्यावश्यक सेवेसाठीच्या बसेस केवळ सेवाभावी म्हणून सुरू होत्या. मात्र त्यातून काही उत्पन्न मिळत नव्हते. नाशिक विभागाला दरमहा ३२ कोटींचा तोटा सहन करावा लागला.

--इन्फो--

२०५ बसेस पुन्हा बंद

यावर्षी बसेस चालविण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर जिल्ह्यात ८३२ पैकी टप्प्याटप्प्याने ६६७ बसेस सुरू करण्यात आल्या. या माध्यमातून जिल्ह्यातील बससेवाला बुस्ट मिळाला असतानाचा अवघ्या तीन महिन्यात पुन्हा निर्बंधामुळे महामंडळाला बसेस कमी करण्याची वेळ आली आहे. प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे सद्यस्थितीत केवळ २२५ बसेस चालविल्या जात आहेत. त्यातही तालुक्याच्या गावी येणाऱ्या बसेसची प्रवासी संख्या ३० टक्क्याने कमी झाली आहे.

--इन्फो--

उत्पन्न ५० टक्क्याने घटले

जिल्ह्यात यापूर्वी किमान ६०० बसेस सुरू असल्यामुळे महामंडळाचा आर्थिक गाडा सुरळीत सुरू होता. जसजशी प्रवासी संख्या वाढत गेली तसतसे उत्पन्नही वाढत गेल्याने ६० लाखांवरील हजारांवरील उत्पन्न ८० लाखांपर्यंत पोहोचले असताना निर्बंधाचा ब्रेक लागला. आता उत्पन्न २५ ते ३० लाखांच्या जवळपास आले आहे. इतका मोठा फटका बसल्याने जिल्ह्यातील अनेक बसेस बंद होण्याच्या मार्गावर आहेत.