शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

प्रवासी नसल्याने एसटी बसेसच्या चाकांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:15 IST

नाशिक: कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लोक प्रवास करणे टाळत आहेतच शिवाय जिल्हा निर्बंधामुळे बाजारपेठा आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवरही परिणाम ...

नाशिक: कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लोक प्रवास करणे टाळत आहेतच शिवाय जिल्हा निर्बंधामुळे बाजारपेठा आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवरही परिणाम जाणवू लागल्याने त्याचा परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर झाला आहे. प्रवासी नसल्याने अनेक मार्गांवरील बसफेऱ्या कमी करण्याची वेळदेखील महामंडळावर आली आहे.

मागील वर्षी काेरोना संकटाच्या काळात सुमारे आठ महिने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनचाही प्रसंग निर्माण झाला होता. त्यावेळी राज्य सरकारला विशेष पॅकेज देण्याची वेळ आली होती. यावर्षी बसेस सुरू करण्याला परवानगी देण्यात आल्यानंतर एसटी रुळावर येत असतानाच पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बाजारपेठा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत, शासकीय कार्यालयांची उपस्थिती ५० टक्के करण्यात आली आहे तर खासगी कार्यालये पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली असून प्रवासी संख्या कमी झाली आहे.

--इन्फो--

गेले वर्षही तोट्याचे

मागील वर्षी महामंडळाच्या बसेस जवळपास आठ ते नऊ महिने बसस्थानकातच उभ्या होत्या. जिल्ह्यांतर्गत तसेच परजिल्ह्यातील बसेसदेखील बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे महामंडळाचे उत्पन्न पूर्णपणे थांबले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही प्रश्न निर्माण झाला होता. अत्यावश्यक सेवेसाठीच्या बसेस केवळ सेवाभावी म्हणून सुरू होत्या. मात्र त्यातून काही उत्पन्न मिळत नव्हते. नाशिक विभागाला दरमहा ३२ कोटींचा तोटा सहन करावा लागला.

--इन्फो--

२०५ बसेस पुन्हा बंद

यावर्षी बसेस चालविण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर जिल्ह्यात ८३२ पैकी टप्प्याटप्प्याने ६६७ बसेस सुरू करण्यात आल्या. या माध्यमातून जिल्ह्यातील बससेवाला बुस्ट मिळाला असतानाचा अवघ्या तीन महिन्यात पुन्हा निर्बंधामुळे महामंडळाला बसेस कमी करण्याची वेळ आली आहे. प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे सद्यस्थितीत केवळ २२५ बसेस चालविल्या जात आहेत. त्यातही तालुक्याच्या गावी येणाऱ्या बसेसची प्रवासी संख्या ३० टक्क्याने कमी झाली आहे.

--इन्फो--

उत्पन्न ५० टक्क्याने घटले

जिल्ह्यात यापूर्वी किमान ६०० बसेस सुरू असल्यामुळे महामंडळाचा आर्थिक गाडा सुरळीत सुरू होता. जसजशी प्रवासी संख्या वाढत गेली तसतसे उत्पन्नही वाढत गेल्याने ६० लाखांवरील हजारांवरील उत्पन्न ८० लाखांपर्यंत पोहोचले असताना निर्बंधाचा ब्रेक लागला. आता उत्पन्न २५ ते ३० लाखांच्या जवळपास आले आहे. इतका मोठा फटका बसल्याने जिल्ह्यातील अनेक बसेस बंद होण्याच्या मार्गावर आहेत.