शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

हद्दीच्या वादात पूल अंधारात

By admin | Updated: April 24, 2017 01:53 IST

नाशिक : तपोवनापासून थेट टाकळीला जोडणाऱ्या नवीन रिंगरोडवरील पूल हद्दीच्या वादामुळे मागील दोन महिन्यांपासून अंधारात सापडला आहे

 नाशिक : तपोवनापासून थेट टाकळीला जोडणाऱ्या नवीन रिंगरोडवरील पूल हद्दीच्या वादामुळे मागील दोन महिन्यांपासून अंधारात सापडला आहे. दोन्ही बाजूंनी रस्त्याला उतार असून, नवीन रस्ता असल्यामुळे वाहतुकीचा वेगही वाढल्याने रात्रीच्या वेळी अंधारामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहेमहापालिका प्रशासनाकडे वारंवार ‘स्मार्ट’ तक्रार करूनदेखील या पुलावरील पथदीप अद्याप दुरुस्त करण्यात आलेले नाही; मात्र ‘स्मार्ट अ‍ॅप’वर प्राप्त तक्रार तत्काळ ‘क्लोज’ करण्यात येते, असे एका जागरूक नागरिकाने सांगितले आहे. एकूणच ज्याप्रमाणे पथदीप बंद आहे त्याचप्रमाणे स्मार्ट तक्रारदेखील दखल न घेता बंद केली जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पुलावर गेल्या दोन महिन्यांपासून अंधार पसरला आहे; मात्र केवळ महापालिकेच्या पूर्व व पंचवटी विभागाच्या हद्दीमुळे अद्याप या पुलावरील पथदीपांची दुरुस्ती होऊ शकलेली नाही. पूर्व विद्युत विभागाकडून सदर पूल पंचवटीच्या हद्दीत असल्याचे सांगितले जाते तर पंचवटी विद्युत विभागाकडून पुलाचा भाग पूर्वच्या हद्दीत समाविष्ट असल्याचे कळविले जाते. एकूणच नेमका पूल कोणाच्या हद्दीत हा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या या दोन्ही विभागांमध्ये समन्वयाचा ‘पूल’ तयार होणे गरजेचे असून, तातडीने पूर्व किंवा पंचवटी दोन्हीपैकी कोणीही पुढाकार घेऊन बंद पडलेले पथदीप त्वरित सुरू करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.औरंगाबाद महामार्ग ते टाकळीमार्गे पुणे महामार्गाला जोडणारा हा रिंगरोड सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकसित करण्यात आला. या रस्त्यावर वाहतूकही वाढली असून, लहान-मोठ्या अवजड वाहनांसह शेतकऱ्यांची या रस्त्यावरून वर्दळ सुरू असते. या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी मार्गक्रमण करताना रस्त्यावरील मुख्य पुलाचा परिसर अंधारात बुडालेला असतो. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंनी तीव्र उतार असल्यामुळे वाहनांचा वेग अधिक असतो व वाहने जवळ येईपर्यंत नजरेस पडत नाही. महापालिकेने या पुलावरील बंद पडलेले पथदीप त्वरित सुरू करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)