शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

हद्दीच्या वादात पूल अंधारात

By admin | Updated: April 24, 2017 01:53 IST

नाशिक : तपोवनापासून थेट टाकळीला जोडणाऱ्या नवीन रिंगरोडवरील पूल हद्दीच्या वादामुळे मागील दोन महिन्यांपासून अंधारात सापडला आहे

 नाशिक : तपोवनापासून थेट टाकळीला जोडणाऱ्या नवीन रिंगरोडवरील पूल हद्दीच्या वादामुळे मागील दोन महिन्यांपासून अंधारात सापडला आहे. दोन्ही बाजूंनी रस्त्याला उतार असून, नवीन रस्ता असल्यामुळे वाहतुकीचा वेगही वाढल्याने रात्रीच्या वेळी अंधारामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहेमहापालिका प्रशासनाकडे वारंवार ‘स्मार्ट’ तक्रार करूनदेखील या पुलावरील पथदीप अद्याप दुरुस्त करण्यात आलेले नाही; मात्र ‘स्मार्ट अ‍ॅप’वर प्राप्त तक्रार तत्काळ ‘क्लोज’ करण्यात येते, असे एका जागरूक नागरिकाने सांगितले आहे. एकूणच ज्याप्रमाणे पथदीप बंद आहे त्याचप्रमाणे स्मार्ट तक्रारदेखील दखल न घेता बंद केली जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पुलावर गेल्या दोन महिन्यांपासून अंधार पसरला आहे; मात्र केवळ महापालिकेच्या पूर्व व पंचवटी विभागाच्या हद्दीमुळे अद्याप या पुलावरील पथदीपांची दुरुस्ती होऊ शकलेली नाही. पूर्व विद्युत विभागाकडून सदर पूल पंचवटीच्या हद्दीत असल्याचे सांगितले जाते तर पंचवटी विद्युत विभागाकडून पुलाचा भाग पूर्वच्या हद्दीत समाविष्ट असल्याचे कळविले जाते. एकूणच नेमका पूल कोणाच्या हद्दीत हा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या या दोन्ही विभागांमध्ये समन्वयाचा ‘पूल’ तयार होणे गरजेचे असून, तातडीने पूर्व किंवा पंचवटी दोन्हीपैकी कोणीही पुढाकार घेऊन बंद पडलेले पथदीप त्वरित सुरू करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.औरंगाबाद महामार्ग ते टाकळीमार्गे पुणे महामार्गाला जोडणारा हा रिंगरोड सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकसित करण्यात आला. या रस्त्यावर वाहतूकही वाढली असून, लहान-मोठ्या अवजड वाहनांसह शेतकऱ्यांची या रस्त्यावरून वर्दळ सुरू असते. या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी मार्गक्रमण करताना रस्त्यावरील मुख्य पुलाचा परिसर अंधारात बुडालेला असतो. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंनी तीव्र उतार असल्यामुळे वाहनांचा वेग अधिक असतो व वाहने जवळ येईपर्यंत नजरेस पडत नाही. महापालिकेने या पुलावरील बंद पडलेले पथदीप त्वरित सुरू करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)