शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

विहिरीने गाठला तळ

By admin | Updated: May 29, 2016 00:29 IST

जोरण : भीषण पाणीटंचाईने नागरिक हैराण

जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथील पाणीपुरवठ्याच्या विहिरीने तळ गाठला असून, ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. परंतु हंडाभर पाण्यासाठी दिवसभर प्रतीक्षा करावी लागत आहे. गत महिन्यापासून पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे पिण्याचे पाणी येत नसल्याच्या अनेकदा तक्र ारी केल्या; मात्र निष्पन्न काहीच झाले नाही. पिण्याचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा व टँकरची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. येथील सरपंच, ग्रामसेवक, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणीप्रश्नी काहीच केले नाही. दिवसेंदिवस पाणीप्रश्न गंभीर होत असून, याकडे मात्र सरपंच व ग्रामसेवक कुठलीही दखल घेत नसून जोरण ग्रामपंचायतीच्या या भोंगळ कारभाराविषयी ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.जोरण ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेण्यात आली होती. त्यादिवशी ग्रामस्थांनी पाणीप्रश्न मांडला. अनेकवेळा तक्र ारही केल्या मात्र ग्रामपंचायतीतला विषय तेथेच राहतो. अजून काही पर्याय शोधला नसून येथील ग्रामस्थांना हंडाभर पाण्याचा गंभीर प्रश्न पडला आहे. भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, एकीकडे पाणीटंचाई घोटभर पाण्यासाठी व दुसरी कडे पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. भीषण पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे व तसेच मोलमजुरी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत व गावाचा पिण्याच्या पाणीप्रश्न मार्गी लागणार की नाही, हा प्रश्न जोरण येथील ग्रामस्थांना सतावत आहे.ग्रामपंचायतीने या प्रश्नी काणाडोळा केला असून, जोरण गावावर भीषण पाणीटंचाईचे सावट आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेत ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी. येथील ज्येष्ठ समाजसेवक बाबूराव महाराज यांनी उपोषणाचा इशार दिला आहे. (वार्ताहर)