शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

दोघांचा अपघातात मृत्यू

By admin | Updated: March 10, 2017 01:33 IST

सटाणा/वीरगाव : विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर ताहाराबाद या गावाजवळ डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरने मोटरसायकलला धडक दिल्याने यात वीरगाव येथील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला

 सटाणा/वीरगाव : विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर ताहाराबाद या गावाजवळील हॉटेल साईगार्डन समोर डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरने मोटरसायकलला भीषण धडक दिल्याने यात वीरगाव(ता. बागलाण) येथील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.अंतापुर येथून कंदोरी कार्यक्र म आटोपून परत येत असतांना गुरु वारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वीरगाव परिसरावर यामुळे शोककळा पसरली आहे.वीरगाव येथील हरीभाऊ शिवराम गांगुर्डे (६५) व पवन शिवानंद मोरे (३०) हे सकाळी अंतापुर येथे कंदोरीच्या कार्यक्रमासाठी मोटर सायकलीने गेले होते. कार्यक्र म आटोपुन दुपारी घराकडे परतत असतांना ताहाराबाद या गावाजवळ असलेल्या हॉटेल साई गार्डनसमोर या मोटरसायकलला समोरून येणाऱ्या टँकर(एम.एच.३९ सी २४२२) ने भीषण धडक दिली. यात मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला फेकली गेली तर पवन मोरे व हरी गांगुर्डे हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दु:खापत झाली. परिसरातील नागरिकांनी या दोघांना तात्काळ रु ग्णवाहिकेद्वारे सटाणा येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली. हरी गांगुर्डे हे वीरगाव येथील प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. तर पवन हा अविवाहित आहे. यानंतर संपूर्ण परिवाराची धुरा पवन संभाळत असतांनाच पवनच्या अपघाती जाण्याने परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळल्याचे चित्र दिसून आले आहे.जायखेडा येथील पोलिस ठाण्यात सदर वाहनाविरु द्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जायखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजियसंग ठाकुर करीत असून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनास ताब्यात घेतले आहे. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वीरगाव येथे दोन्हीही मृतांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी व्यापारी वर्गाने आपले दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली होती. (वार्ताहर)