शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज काढून खर्चाचा धाडसी अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:24 IST

नाशिक : गतवर्षात आर्थिक मंदी आणि कोरोनामुळे अर्थव्यस्थेला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला असताना केंद्र सरकारने तब्बल १५ लाख कोटींचे ...

नाशिक : गतवर्षात आर्थिक मंदी आणि कोरोनामुळे अर्थव्यस्थेला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला असताना केंद्र सरकारने तब्बल १५ लाख कोटींचे कर्ज काढून मोठ्या प्रमाणात भांडवली व महसुली खर्च करणारा धाडसी अर्थसंकल्प सादर केल्याचे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा कर न वाढवता ३५ हजार कोटी आरोग्यसेवेवर खर्च करण्याची व परवडणाऱ्या घरांच्या योजनेला मुदतवाढ देण्याची तरतूद करून सर्वसामान्यांना दिलासाही दिल्याचे त्यांनी नमूद केले.

सावानातर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात गुरुवारी (दि.४) ‘अर्थसंकल्प २०२१’ विषयावर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांचे विश्लेषण व्याख्यान आयोजित करण्यात ‌आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सावानाचे कार्याध्यक्ष वसंत खैरनार, अर्थसचीव कुमार मुंगी, बी.जी वाघ, देवदत्त जोशी, प्रा. संगीता बाफना आदी उपस्थित होते. डॉ. विनायक गोविलकर म्हणाले, कोरोनामुळे केंद्र सरकारला मागील आर्थिक वर्षात अपेक्षित असलेल्या २०.२१ लाख कोटी महसुली उत्पनापैकी १५.५५ लाख कोटी म्हणजे जवळपास साडेचार लाख कोटी रुपयांचे उत्पन्न घटले आहे, तर ३०.४० लाख कोटींचा खर्च अपेक्षित असताना ३४.५० लाख कोटी खर्च झाल्याने साडेचार लाख कोटी अतिरिक्त खर्चाचा बोजा केंद्र सरकाच्या तिजोरीवर पडला. त्यामुळे सुमारे ९ लाख कोटींची वित्तीय तूट निर्माण झालेली असतानाच केंद्र सरकारने कोविडमधून बाहेर पडण्यासाठी आत्मनिर्भर योजनेसाठी २७ लाख कोटींचे पॅकज घोषित केले आहे. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आणि नागरिकांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी ३४ लाख ८३ हजार रुपये खर्चाचा अर्थसंकल्प मांडला आहे. यातील ४३ टक्के खर्च कर्जातून केला जाणार असून त्यासाठी जवळपास १५ लाख कोटींचे कर्ज घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक श्रीकांत बेणी यांनी केले, तर सूत्रसंचालन ॲड. भानुदास शौचे यांनी केले.

महागाई वाढणार

उत्पनाचे स्त्रोत कमी असून, खर्च अधिक असलेला वित्तीय तुटीचा हा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्र्यांनी १५ लाख कोटी रुपये कर्ज घेणार असल्याचे स्पष्ट केले; परंतु त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर व्याजाच्या आणि कर्ज परतफेडीच्या रुपाने अतिरिक्त खर्चाचा ताण पडणार आहे. शिवाय पैशाला मागणी वाढून किंमत वाढणार असल्याने बँकांचे व्याजदर व महागाई वाढण्याची शक्यताही डॉ. विनायक गोविलकर यांनी व्यक्त केली आहे.

(फोटो- नीलेश तांबे)