शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पाच जीवांसोबत उबवली माणुसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 16:12 IST

सिन्नर तालुक्यातील देवपूर शिवारातील शेतकºयाने पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणारी अंडी वाचवून ती उबवून त्यातून पाच पिल्लांना जन्म देवून त्यांचे केलेले संगोपन चर्चेचा विषय बनली आहे.

बाळासाहेब कुमावत।लोकमत न्यूज नेटवर्कपाथरे: निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे. मग त्यात पशू, पक्षी, प्राणी सर्व येतात. परंतु कधी कधी मानव मात्र अडमुठेपणाची भूमिका घेत असतो तर कधी त्याला निसर्गाशी समायोजन करावे लागते. पशू पक्षांशिवाय मानवी जीवन व्यर्थ आहे म्हणून त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे. सिन्नर तालुक्यातील देवपूर शिवारातील शेतकºयाने पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणारी अंडी वाचवून ती उबवून त्यातून पाच पिल्लांना जन्म देवून त्यांचे केलेले संगोपन चर्चेचा विषय बनली आहे.पशु पक्षांचे पर्यावरणातील स्थान अत्यंत महत्वाचे आहे. प्राणी प्रेमी हे उन्हाळ्याच्या दिवसात अनेक पक्षी, प्राणी यांची अन्न, पाण्याची व्यवस्था करताना दिसतात. वादळी वाºयात होत असलेल्या पावसामुळे सर्व पशु पक्षी हे सुरक्षित जागेचा शोध घेत असतात अशावेळी त्यांनी घातलेली अंडी, पिल्ले यांना मात्र सोबत घेऊन सुरक्षित ठिकाणी त्यांना जाताच येते असे नाही. अशीच घटना गेल्या पावसाळ्यात सिन्नर तालुक्यातील देवपूर जवळील डांबरनाला शिवारात घडली. यावेळी जोरदार पावसामुळे पशु पक्षांची मोठी वाताहत झाली होती. त्यांना आश्रय मिळत नव्हता. या पावसात लांडोराने घातलेली जवळपास पाच अंडी पाण्याबरोबर वाहून जात होती.देवपूर डांबरनाला परिसरातील नाना पिंपळे यांच्या ते निदर्शनास आले. ती अंडी कोणत्या पक्षाची आहे हे मात्र त्यांना ओळखता आले नाही. परंतु यात जास्त वेळ न घालवता त्यांनी पाचही अंडी वाहत्या पाण्यातून सहीसलामत बाहेर काढली. परिसरात राहणाºया मोरांचे अंडी आहेत हे लक्षात आल्यावर पिंपळे यांनी ती पाच अंडी कोंबडी खाली उबवण्याचे ठरवले कारण प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे हा निसर्गाचा नियम आहे. कोंबडीच्या सहाय्याने उबविलेल्या त्या अंड्यांतून काही दिवसांनी पाच मोरांच्या पिलांनी जन्म घेतला. मोरांना जीवनदान मिळाले. आज ही पाचही मोर परिसरातील इतर मोरांबरोबर मुक्तपणे संचार करतात. तर कधी कोंबडयांबरोबर फिरत राहतात. परंतु त्यांना माणसांचा लळा लागलेला असल्यामुळे ते शेतात काम करणाºया शेतकºयांच्या शेजारी बिनधास्त पणे बसतात. आई विना पोरके झालेले ते मोर जीवंत आहेत याचे श्रेय नाना पिंपळे यांना जाते. त्यांना पर्यावरण प्रेमी सोपान गडाख यांनी मोरांच्या पिल्लांची काळजी कशी घ्यावी याचे वेळोवेळी मार्गदर्शन केले. सदर पिल्ले तीन महिन्यांची झाली आहेत. हे दोघे या लहान पिलांचे संगोपन करत आहेत. तसेच कुत्रे, रानटी जनावरे यापासून पिल्लांचे संरक्षणही करत आहे. मोरांची अन्न व पिण्याचा पाण्याची उत्तम व्यवस्थाही त्यांनी केली आहे. हे मोर कितीही बाहेर गेले तरी पिंपळे आणि गडाख यांच्या जवळ ते आश्रयासाठी येतातच कारण आता त्यांना एकमेकांचा लळा लागला आहे. पशू पक्षी उपकार विसरत नाही हेच खरे.