पावसाच्या लंपडावामुळे भात नागलीची शेती फसवी झाली आहे. रोप तयार करण्यापासून ते काढणीपर्यंत एकरी २५ ते ३० हजारांचा खर्च होतो. गेल्या अनेक वर्षांपासून पाऊस स्वच्छंदी झाल्याने भात नागली पिके हुकमी राहिलेली नाही. आदिवासी भागात वातावरण बदलामुळे फळबाग शेतीला पूरक स्थिती निर्माण झाल्याने हरणगाव येथील प्रयोगशील सुशिक्षित ( बीए व कृषी डिप्लोमा ) तरुण गणेश जाधव याने आपल्या शेतातील बखळ जागेत ७ वर्षांपूर्वी चिकूच्या कालीपती या वाणांच्या २० झाडांची लागवड करून सेंद्रिय खताची मात्रा दिली. ‘आरोग्यासाठी धरू ध्यास सेंद्रिय शेतीचा, टिकवून ठेऊ पोत आपल्या मातीचा’ या उक्तीने आपल्या घरच्या जनावरांचे शेणखत चिक्कूला वापरून शेतीचा पोत वाढविला. आठ महिन्यांमध्ये मला वीस झाडापासून आठ क्विंटल चिक्कूचे उत्पन्न मिळाले. दर आठ दिवसांच्या अंतराने दोन तीन क्रेटस् फळे तोडून कुठल्याही केमिकलचा वापर न करता घरीच पिकविला. चिक्कूत गोडी असून फळाची प्रत चांगली असल्याने कोणत्याही बाजारपेठेत विक्रीस न नेता जागेवरच एका किलोस ४५ ते ५० रुपये भावाने विकून चिक्कूने लखपती बनविले.
चिक्कू हे झाडाला उष्ण व कोरडे दमट हवामान पोषक असून रोगराईला बळी पडत नाही. पुढील काळात चिक्कूच्या
कालीपत्ती,घोलवड, पिलीपती, क्रिकेट बॉल या जातीची लागवड करण्याचा जाधव यांचा मानस आहे. ‘काळी माती माझी आई, मजला देई अफाट पै’ असे म्हणत आदिवासी तरुणाने प्रयोगशील बनून फळ शेतीकडे वळावे. जेणेकरून आपल्या कुटुंबाची विस्कटलेली आर्थिक स्थिती सुधारण्यास हातभार लागेल, असेही जाधव सांगतात.
कोट....
पारंपरिक शेतीने कधी पोट भरू दिले नाही. कर्जाच्या विवंचनेत आईबापाला सुखाची झोप नव्हती. चिक्कूने बापाचे डोक्यावरील कर्ज उतरविले .भाताने रडवले, चिक्कूने हसवले म्हणत आज त्यांच्या चेहऱ्यावर व घरात आनंद फुलविला. तालुक्यातील तरुणांनी उपजीविकेसाठी स्थलांतर न करता आपल्या मातीत राबवून फळ शेतीतून भरघोस उत्पन्न घ्यावे आणि आपल्या कुटुंबाला गरिबीच्या खाईतून वर काढावे.
- गणेश जाधव, युवा शेतकरी, हरणगाव
फोटो- २५हरणगाव जाधव
२५ गणेश जाधव
250921\25nsk_26_25092021_13.jpg~250921\25nsk_27_25092021_13.jpg
फोटो- २५हरणगाव जाधव~२५ गणेश जाधव