आदिवासी बांधवांसाठी स्वतःच्या हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे.
चैत्र महिना सुरू झाल्यानंतर प्रथम दर्शन होते ते आंबट गोड करवंदांचे. डोंगराच्या कुशीत याच्या काटेरी जाळ्या पसरलेल्या असतात. पांढऱ्या फुलांची गळती झाल्यावर हिरव्या रंगांचे करवंद घडोघड बहरतात. पिकल्यावर त्यांचा रंग काळा होतो. आदिवासी बांधव पहाटे लवकर करवंदे तोडण्यासाठी रानात पायपीट करत असतात. या भागातील करवंदे मुंबई, कल्याण, नाशिक, मालेगाव, धुळेपासून तर जळगावपर्यंत पाठवली जातात. मात्र, हक्काची बाजारपेठ नसल्याने व्यापारी वाट्टेल त्या भावात करवंदे खरेदी करून स्वतःचे उखळ पांढरे करून घेताना दिसून येत आहेत. तर लहान बालके व वृद्ध महिला पळसाच्या पानांचे द्रोण भरून दिवसभर रस्त्याच्या कडेला बसून करवंद विक्री करत असल्याचे दृश्य दिसून येत आहे.
करवंदापासून केले जाते लोणचे
आंब्याचा मोसम सुरू होण्यापूर्वीच करवंदाचा मोसम सुरू होत असल्याने कच्च्या करवंदापासून चांगल्या प्रतीचे लोणचे तयार करता येते. काही वर्षांपूर्वी या भागातील महिला बचत गटांनी करवंदापासून लोणचे तयार करण्याचा गृह उद्योग सुरू केला होता. मात्र, पाहिजे त्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने बाळसे धरण्यापूर्वीच हा उद्योग डबघाईस आला. आदिवासी बेरोजगार तरुण व महिलांना करवंदापासून विविध खाद्यपदार्थ बनवण्याचे तंत्रज्ञान व तयार केलेला माल विक्रीसाठी शासनाने बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास हक्काचा रोजगार मिळू शकतो.
फोटो - २९ करवंदे इगतपुरी
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात कच्च्या व पिकलेल्या करवंदांनी बहरलेल्या जाळ्या.
===Photopath===
290421\29nsk_32_29042021_13.jpg
===Caption===
फोटो - २९ करवंदे इगतपुरी इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात कच्च्या व पिकलेल्या करवंदांनी बहरलेल्या जाळ्या.