शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

भाजपच्या मताधिक्याने राष्टÑवादीत धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:55 IST

लोकसभा निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे यांच्या रूपाने भाजपला ७२ हजारांचे मताधिक्य मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीवर नक्कीच परिणामकारक ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे यांच्या रूपाने भाजपला ७२ हजारांचे मताधिक्य मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीवर नक्कीच परिणामकारक ठरणार आहे. हे मताधिक्य भाजप-सेना युतीला बळ देणारे, तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या छातीत कळ निघणारे आहे. राष्ट्रवादीच्या आमदार दीपिका व त्यांचे पती संजय या दाम्पत्याने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. मात्र जनतेने कॉँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना नाकारले. हा निकाल मात्र चव्हाण यांच्यासाठी धोक्याचा इशारा असून, त्यांचे कट्टर विरोध माजी आमदार दिलीप बोरसे यांच्यासाठी मात्र सुखद धक्का देणारा आहे.बागलाणमध्ये गेल्या निवडणुकीत डॉ. भामरे यांना २९ हजारांचे मताधिक्य होते. मात्र गेल्या निवडणुकीत डॉ. भामरे यांना मिळालेले मताधिक्य विधानसभा निवडणुकीत परिणामकारक ठरले नाही. गेल्या निवडणुकीत बागलाणचे प्रतिनिधित्व भाजपचे उमाजी बोरसे यांनी केले होते. मात्र अंतर्गत गटबाजीचा फायदा घेत संजय चव्हाण यांच्या पत्नी दीपिका यांना आमदारकीची लॉटरी लागली आणि मोदी लाटेतही भाजपला पराभव पत्करावा लागला होता. या निवडणुकीत आमदार दीपिका चव्हाण व संजय चव्हाण यांनी कॉँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. त्यातच माजी आमदार दिलीप बोरसे यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा घेतल्याने चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत डॉ. भामरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. सटाणा शहरासाठी केळझर पाणीपुरवठा योजना युतीच्या काळात मंजूर झाली. जलवाहिन्या खरेदी, अंतर्गत जलवाहिन्या टाकणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे आदी कामे करण्यात आली. त्याचा फायदा युतीला आगामी विधानसभा निवडणुकीत तर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांची कसोटी लागणार आहे.तालुक्याच्या राजकीय समीकरणांकडे लक्षबागलाणमध्ये भाजपचे काँग्रेसीकरण झाल्याचे बघायला मिळत आहे. वास्तविक भाजपचे संघटनहे दुबळे आहे. मात्र मोदी करिष्म्यामुळे ते झाकले जात आहे. असे असताना गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचेउमेदवार दिलीप बोरसे यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला, तोच फॉर्म्युलाया लोकसभा निवडणुकीत डॉ.भामरे यांच्या बाबतीत विरोधकांनीराबवल्याचे बघायला मिळाले. ऐन निवडणुकीत बहुतांश पदाधिकाऱ्यांनी बंडाचे निशाण फडकविण्याचा प्रयत्न केला. काही पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या प्रचार कार्यालयात राहून काँग्रेसच्या उमेदवाराचे नियोजन केल्याचे सांगितले जाते. काहींनी यंत्रणा खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला. अशा दगाबाजांच्याबाबत पक्ष काय निर्णय घेतात, यावरही राजकीय समीकरणे अवलंबून आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालdhule-pcधुळे