शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या आऊटगोईंगला लवकरच सुरुवात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:17 IST

महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या कारकिर्दीत अखेरच्या वर्षात आयाराम-गयारामांचे पक्षबदल सुरू होतात. त्यात नवीन नसले तरी सत्तारूढ पक्षाला त्याचा चांगलाच फटका ...

महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या कारकिर्दीत अखेरच्या वर्षात आयाराम-गयारामांचे पक्षबदल सुरू होतात. त्यात नवीन नसले तरी सत्तारूढ पक्षाला त्याचा चांगलाच फटका बसतो. २०१२ मध्ये मनसेचे ४० नगरसेवक निवडून आले होते. शेवटच्या वर्षी म्हणजेच २०१७ मध्ये त्यातील ३० नगरसेवक अशाच प्रकारे माघारी परतल्याने या पक्षाची अवस्था केविलवाणी झाली होती. त्यानंतर केंद्र आणि राज्यातील लाटेमुळे भाजपने २०१७ मध्ये बहुमत मिळवले. या पक्षाचे ६६ नगरसेवक निवडून आले असले तरी या पक्षाचे मूळ कार्यकर्ते अवघे ९ आहेत. बाकी सर्व आयाराम मनसे, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून निवडून आलेले आहेत. त्यामुळे जोपर्यंत भाजपला अनुकूल वातावरण आहे तोपर्यंत असे आयाराम राहणार आणि वर्षाच्या अखेरीस ते मूळ किंवा ज्या पक्षाची चलती त्या पक्षात जाणार हे उघड आहे.

मध्यंतरी भाजपतून माजी आमदार वसंत गिते आणि सुनील बागुल हे त्यांच्या मूळ पक्षात म्हणजे शिवसेनेत प्रविष्ट झाले. त्याचवेळी त्यांचे समर्थक आता बाहेर पडणार हे स्पष्ट झाले होते. मात्र, त्यावेळी अनेकांनी सबुरीचे धोरण स्वीकारले. वसंत गिते यांचे सुपुत्र प्रथमेश गिते यांना यंदाच्या पहिल्यांदाच निवडून आल्यानंतरही भाजपने उपमहापौरपद दिले होते, तर सुनील बागुल यांच्या मातोश्री भिकूबाई बागुल विद्यमान उपमहापौर आहेत. गिते यांचे आठ ते दहा समर्थक भाजपत असल्याचे सांगितले जाते. तसेच बागुल यांचे काही समर्थक तसेच मूळ शिवसेनेतून आलेलेदेखील स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत. शनिवारी (दि.२८) प्रथमेश गिते यांनी संजय राऊत यांची भेट घेतली असली तरी एकाचवेळी भाजपला मोठा दणका देण्याची शिवसेनेची तयारी असल्याचे वृत्त आहे.

इन्फो...

अपक्ष काँग्रेसच्या वाटेवर

अपक्ष नगरसेवक मुशीर सैय्यद हे काँग्रेस पक्षात जाणार असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा होणार आहे. आणखी एक- देान अपक्षदेखील काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे.

इन्फो...

मनसेतही इनकमिंग हेाणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये पुन्हा लक्ष घातल्यानंतर आता मनसेतून गेलेले काही नगरसेवकदेखील परतीच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आयाराम -गयारामांची चर्चा रंगली आहे.