शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

भाजपच्या आऊटगोईंगला लवकरच सुरुवात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:17 IST

महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या कारकिर्दीत अखेरच्या वर्षात आयाराम-गयारामांचे पक्षबदल सुरू होतात. त्यात नवीन नसले तरी सत्तारूढ पक्षाला त्याचा चांगलाच फटका ...

महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या कारकिर्दीत अखेरच्या वर्षात आयाराम-गयारामांचे पक्षबदल सुरू होतात. त्यात नवीन नसले तरी सत्तारूढ पक्षाला त्याचा चांगलाच फटका बसतो. २०१२ मध्ये मनसेचे ४० नगरसेवक निवडून आले होते. शेवटच्या वर्षी म्हणजेच २०१७ मध्ये त्यातील ३० नगरसेवक अशाच प्रकारे माघारी परतल्याने या पक्षाची अवस्था केविलवाणी झाली होती. त्यानंतर केंद्र आणि राज्यातील लाटेमुळे भाजपने २०१७ मध्ये बहुमत मिळवले. या पक्षाचे ६६ नगरसेवक निवडून आले असले तरी या पक्षाचे मूळ कार्यकर्ते अवघे ९ आहेत. बाकी सर्व आयाराम मनसे, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून निवडून आलेले आहेत. त्यामुळे जोपर्यंत भाजपला अनुकूल वातावरण आहे तोपर्यंत असे आयाराम राहणार आणि वर्षाच्या अखेरीस ते मूळ किंवा ज्या पक्षाची चलती त्या पक्षात जाणार हे उघड आहे.

मध्यंतरी भाजपतून माजी आमदार वसंत गिते आणि सुनील बागुल हे त्यांच्या मूळ पक्षात म्हणजे शिवसेनेत प्रविष्ट झाले. त्याचवेळी त्यांचे समर्थक आता बाहेर पडणार हे स्पष्ट झाले होते. मात्र, त्यावेळी अनेकांनी सबुरीचे धोरण स्वीकारले. वसंत गिते यांचे सुपुत्र प्रथमेश गिते यांना यंदाच्या पहिल्यांदाच निवडून आल्यानंतरही भाजपने उपमहापौरपद दिले होते, तर सुनील बागुल यांच्या मातोश्री भिकूबाई बागुल विद्यमान उपमहापौर आहेत. गिते यांचे आठ ते दहा समर्थक भाजपत असल्याचे सांगितले जाते. तसेच बागुल यांचे काही समर्थक तसेच मूळ शिवसेनेतून आलेलेदेखील स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत. शनिवारी (दि.२८) प्रथमेश गिते यांनी संजय राऊत यांची भेट घेतली असली तरी एकाचवेळी भाजपला मोठा दणका देण्याची शिवसेनेची तयारी असल्याचे वृत्त आहे.

इन्फो...

अपक्ष काँग्रेसच्या वाटेवर

अपक्ष नगरसेवक मुशीर सैय्यद हे काँग्रेस पक्षात जाणार असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा होणार आहे. आणखी एक- देान अपक्षदेखील काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे.

इन्फो...

मनसेतही इनकमिंग हेाणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये पुन्हा लक्ष घातल्यानंतर आता मनसेतून गेलेले काही नगरसेवकदेखील परतीच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आयाराम -गयारामांची चर्चा रंगली आहे.