शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

जिल्हा बॅँकेला भाजपचाच घरचा ‘अहेर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:30 IST

नाशिक : नाशिक जिल्हा सहकारी बॅँकेने सुरू केलेल्या शेतकऱ्यांकडील सक्तीच्या कर्जवसुलीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकारण तापले असतानाच, भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनीदेखील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन जिल्हा बॅँकेने शेतकºयांची कर्जवसुली थांबवावी, असे साकडे घातले असून, बॅँकेकडून राज्य सरकारच्या आदेशाचा भंग केला जात असल्याचा ठपका ठेवत, शेतकºयांच्या सातबारा उताºयावर बॅँकेचे परस्पर नावे लावण्याची कृतीदेखील कायदेशीर गुन्हा असल्याचे सांगून बॅँकेवर सक्त कारवाई करण्याची मागणीच फरांदे यांनी केली आहे.

ठळक मुद्देसक्तीची वसुली थांबवा : फरांदे यांचे प्रशासनाला साकडे

नाशिक : नाशिक जिल्हा सहकारी बॅँकेने सुरू केलेल्या शेतकऱ्यांकडील सक्तीच्या कर्जवसुलीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकारण तापले असतानाच, भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनीदेखील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन जिल्हा बॅँकेने शेतकºयांची कर्जवसुली थांबवावी, असे साकडे घातले असून, बॅँकेकडून राज्य सरकारच्या आदेशाचा भंग केला जात असल्याचा ठपका ठेवत, शेतकºयांच्या सातबारा उताºयावर बॅँकेचे परस्पर नावे लावण्याची कृतीदेखील कायदेशीर गुन्हा असल्याचे सांगून बॅँकेवर सक्त कारवाई करण्याची मागणीच फरांदे यांनी केली आहे.सोमवारी दुपारी आमदार फरांदे यांनी शिष्टमंडळासमवेत जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, सध्या नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचे सावट असून, टंचाईची स्थिती अत्यंत गंभीर आहे. अशा परिस्थितीत जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडून शेतकºयांचे कर्ज वसुलीसाठी प्रयत्नांना वेग आलेला आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेला असून, जिल्हा बॅँकेकडून वसुली करताना शासन नियमांचे उल्लंघन करून वसुली करण्यात येत आहे.या विविध कार्यकारी सोसायटीकडून शेतकरी कर्ज घेत असतात व सदर सोसायटी जिल्हा बॅँकेकडून कर्ज घेत असते. त्यासाठी सोसायट्यांना नफा दिला जात असतो. जिल्हा बॅँक व महसूल विभागाच्या काही अधिकाºयांनी शेतकºयांच्या सातबारा उताºयावरील विविध सोसायट्यांचे नाव कमी करून जिल्हा बॅँकेचे नाव लावलेले आहे. यासाठी संबंधित शेतकºयांना कोणतीही सूचना देण्यात आलेली नव्हती. अशाप्रकारे सातबारा उताºयावर परस्पर बदल करणे हा दखलपात्र गुन्हा असून, याबाबत बॅँकेवर सक्त कारवाई करणे गरजेचे असल्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे. आमदार फरांदे यांनी या पत्रासोबत शासनाचा निर्णयच पुराव्यासोबत जोडला असून, शासनाने सहकारी कर्जाचे पुनर्गठण करणे व शेतीशी निगडित कर्जवसुलीस स्थगिती असल्याचे नमूद असतानाही दुष्काळी मंडलातील गावांच्या शेतकºयांकडून कर्जवसुली केली जात आहे. थकीत कर्ज असणाºया शेतकºयांना रिझर्व्ह बॅँकेच्या नियमाप्रमाणे मोठ्या प्रमाणात एकरकमी कर्जवसुली सुरू असून, त्यात शेतकºयांना मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. परंतु जिल्हा बॅँकेकडून रिझर्व्ह बॅँकेच्या नियमाप्रमाणे एकरकमी कर्जवसुली योजना न राबविता कर्जवसुली केली जात आहे. त्यामुळे जिल्हा बॅँकेकडून बेकायदेशीरपणे सुरू असलेली कारवाई तत्काळ थांबवावी, अशी विनंतीही फरांदे यांनी जिल्हाधिकाºयांना केली आहे.