शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाची एण्ट्री

By admin | Updated: February 24, 2017 00:19 IST

मनमाड : भालूर गटावर भाजपाचा झेंडा

मनमाड : नांदगाव तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ठरल्या गेलेल्या भालूर गटात व गटातील दोन गणात भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भालूर गटात यावेळी प्रथमच भाजपाने एण्ट्री करून आपला झेंडा फडकावला आहे.भालूर गटातील उमेदवाराच्या न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे या वेळीही गट चर्चेत आला होता. त्यामुळे या गटातील माघार लांबली होती. या गटातील भाजपाच्या उमेदवार आशाबाई फकिरा जगताप यांनी नामनिर्देशन अर्जासोबत जोडलेल्या हमीपत्रावर स्वाक्षरी नसल्याने छाननी च्या दिवशी जगताप यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला होता. न्यायप्रविष्ट असलेल्या या प्रकरणाच्या निकालानंतर जगताप या पुन्हा निवडणूक रिंगणात दाखल झाल्या होत्या व आज निकालानंतर विजयी झाल्या आहे.या गटातून प्रतिभा दशरथ हिरे (शिवसेना), आशाबाई फकिरा जगताप (भाजपा), श्वेता प्रशांत ठाकरे (राष्ट्रवादी) या तीन उमेदवारांमध्ये लढत झाली होती. यावेळी भाजपाने प्रथमच एण्ट्री केली होती. भालूर गटाचे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार संजय पवार व माजी जि. प. सदस्य राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. या लढतीमध्ये भालूर गटातून भाजपाच्या आशा जगताप २,३९० मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या. भालूर गणातून भाजपाचे श्रावण गोरे १,१७५ तर पानेवाडी गणातून साहेबराव नाईकवाडे ८६४ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहे.(वार्ताहर)