शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांच्या बालेकिल्ल्यात भाजपची निकराची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:16 IST

येवला : विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांच्या राजकीय प्रवेशाने मतदारसंघाचे राजकीय गणितच बदलले आहे. भुजबळ हाच पक्ष म्हणत राष्ट्रवादीने ...

येवला : विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांच्या राजकीय प्रवेशाने मतदारसंघाचे राजकीय गणितच बदलले आहे. भुजबळ हाच पक्ष म्हणत राष्ट्रवादीने सेना-भाजपचा बालेकिल्ला आपल्या ताब्यात घेतला. विजयाची हॅट्ट्रिक साधत भुजबळ यांनी गेल्या तीन पंचवार्षिकपासून मतदारसंघावर आपला प्रभाव कायम राखला आहे. मात्र, भुजबळ यांच्याविना झालेल्या गत नगरपालिका निवडणुकीत पालिकेची सत्ता राष्ट्रवादीला टिकवता आली नाही. आता, होऊ घातलेल्या निवडणुकीत पालिकेवर कब्जा करण्यासाठी राष्ट्रवादीला भाजपसह अजून कोणाशी सामना करावा लागेल हे येणारा काळच ठरवणार आहे.

सन २०१४मध्ये भुजबळ यांनी सेनेच्या संभाजी पवार यांचा ४६ हजार ४४२ मतांनी पराभव केला होता. त्यानंतर भुजबळ तुरुंगात असताना २०१६ मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीची सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नेते ॲड. माणिकराव शिंदे यांच्या हाती होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी त्यांच्या पत्नी उषाताई शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर सेना-भाजप युती असताना नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या बंडू क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली होती. याबरोबरच काँग्रेसचे एजाज शेख, भारिप बहुजन महासंघाचे दीपक लाठे आणि दोघे अपक्ष असे एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत संभाजी पवार, किशोर दराडे, नरेंद्र दराडे, माजी आमदार कल्याणराव पाटील, श्रीकांत गायकवाड, आनंद शिंदे यांचे नेतृत्वाखाली सेना-भाजप युतीने ५७० मताधिक्क्याने नगराध्यक्षपद भाजपकडे खेचून आणले होते. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने झालेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीने १०, भाजपाने ४, शिवसेनेने ५ तर अपक्षांनी ५ जागांवर बाजी मारली होती.

नगराध्यक्ष क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचा गेली चार वर्षे सर्वांच्या सहकार्याने सुरळीत कारभार चालू होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून उपनगराध्यक्ष सूरज पटणी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नगरसेवक विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आले आणि नगराध्यक्षविरुद्ध इतर असे राजकारण गतिमान झाले आहे.

नगरपालिकेत भाजपचा नगराध्यक्ष असतानाही मतदारसंघातील पालिका म्हणून पालकमंत्री असणाऱ्या भुजबळ यांनी आपल्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातूनच पालिकेची शहरातील विकासकामे झाली आहेत, काही होत आहेत तर काही होणार आहेत.

सध्या विकासकामांच्या उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण अशा कार्यक्रमांचा पालकमंत्री भुजबळ यांनी शहरात सपाटा लावला असून, उपनगराध्यक्षांसह सर्वपक्षीय नगरसेवक भुजबळ यांच्या संपर्कात आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने सेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे नगरपालिका निवडणुका लढवतात का, की स्वतंत्रपणे यावर पुढील राजकीय गणित ठरणार आहे. सेनेचे संभाजी पवार आणि दराडे बंधू या आमदारद्वयींची भूमिकाही शहराच्या राजकारणात महत्त्वाची ठरणार आहे, तर राष्ट्रवादीपासून बाजूला गेलेले ॲड. शिंदे यांची भूमिकाही परिणामकारक ठरणारी आहे. भाजप, काँग्रेसने तर आत्तापासूनच स्वबळाची भाषा सुरू केली असून, राष्ट्रवादीनेही नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले नियोजन सुरू केले आहे.

इन्फो

रखडलेले प्रश्न ऐरणीवर

पालकमंत्री भुजबळ यांनी प्रशासकीय मध्यवर्ती संकुल, तालुका क्रीडा संकुल, नाट्यगृह, पैठणी पर्यटन केंद्र, ट्रफिक पार्क, बोटिंग क्लब, अहल्यादेवी घाट, महामार्गाचा विस्तार, व्यापारी संकुल, मुक्तीभूमी स्मारक आदींच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहराच बदलवला आहे. याबरोबरच तात्या टोपे स्मारक, शिवसृष्टीचेही काम होऊ घातले आहे तर शहरातील व्यापारी संकुल, भूमिगत गटार योजना, मूलभूत सुविधांचा अभाव, खंडित व अपुरा पाणीपुरवठा, बंद पथदीप, नववसाहतींतील गटार, रस्ते आदी रखडलेले प्रश्न येत्या निवडणुकीत ऐरणीवर राहणार आहेत.

कोट....

पालकमंत्री भुजबळ यांच्या सहकार्याने उपलब्ध झालेल्या निधीतून तसेच नगरपालिकेस प्राप्त झालेल्या वेगवेगळ्या अनुदानातून शहराचा प्रामाणिकपणे विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. यात प्रामुख्याने रस्ते, गटारी, व्यायामशाळा, तात्या टोपे स्मारक, गार्डन, बाजारतळ काँक्रिटीकरण, बाजार ओटे व शेड, स्मशानभूमी विकास ही महत्त्वाची कामे आहेत.

- बंडू क्षीरसागर, नगराध्यक्ष

कोट...

शहराचा जो काही विकास शक्य झाला तो पालकमंत्री भुजबळ यांच्यामुळेच झाला आहे. पालिका सत्ताधाऱ्यांकडे विकासाची दृष्टी वा नियोजन नसल्याने शहरातील व्यापारी गाळे, रस्ते, नववसाहतींतील गटार व रस्ते हे प्रश्न आजही कायम आहेत. भूमिगत गटार, नियमित, शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा आदी प्रश्न रखडलेलेच आहे.

- प्रवीण बनकर, गटनेते, राकाँ