शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाची मुसंडी

By admin | Updated: February 24, 2017 00:07 IST

सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाची मुसंडी

 मालेगाव : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात गटांपैकी पाच गटात भाजपाचे कमळ फुलले आहे, तर शिवसेनेला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. कळवाडी गटात झालेल्या काट्याच्या लढतीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्या पत्नी अंजली कांदे व निमगाव गटातील मधुकर हिरे यांचा धक्कादायक पराभव झाल्याने शिवसेनेच्या नेत्यांवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. तर पंचायत समितीत मतदारांनी सेना व भाजपाला समान कौल दिला आहे. पंचायत समितीच्या सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी व अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांच्या हातात आहेत.गेल्या पंधरा वर्षांपासून मालेगाव पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांना कसरत करावी लागणार आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेकडे चार जिल्हा परिषदेचे गट ताब्यात होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत दाभाडी, रावळगाव, सौंदाणे, कळवाडी या सेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत आता भाजपाने या गटांमध्ये कमळ फुलविले आहे तर झोडगे गटावरील सत्ता अबाधित ठेवण्यास शिवसेनेला यश आले आहे तर वडनेर गटातील भाजपाच्या सत्तेला सुरुंग लागला आहे.पंचायत समितीत मतदारांनी शिवसेनेला सहा व भाजपाला सहा असा समसमान कौल दिला आहे. पंचायत समितीवर सत्ता मिळविण्यासाठी लागणारा मॅजिक आकडा भाजपा व शिवसेनेकडे नसल्यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. पंचायत समितीवर सत्ता मिळविण्यासाठी अपक्ष व राष्ट्रवादीच्या उमेदवाराची रसद लागणार आहे. ही रसद मिळविण्यासाठी भाजपा व शिवसेनेला मोठी कसरत करावी लागणार आहे. आमदार असताना दादा भुसे यांचा तालुक्यात करिष्मा चालत होता; मात्र आता ग्रामविकास राज्यमंत्री पद असताना गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यंदा शिवसेनेला जिल्हा परिषद गटातील एक जागा व पंचायत समितीची एक जागा गमावण्याची नामुष्की ओढावली तर कळवाडी, रावळगाव, निमगाव या गटातील शिवसेनेच्या उमेदवारांचा झालेला पराभव शिवसेना नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे तर भाजपाने जोरदार मुसंडी मारत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात गटांपैकी पाच गटांमध्ये सत्ता खेचून आणली आहे. शिवसेनेला केवळ दोन गटांमध्ये सत्ता टिकविता आली तर पंचायत समितीत जनतेनेच समान कौल दिला आहे. भाजपा व शिवसेनेशिवाय मतदारांना पर्याय नसल्यामुळे समान कौलचा निकाल समोर आला आहे. कट्टर विरोधकाची भूमिका बजावणाऱ्या राजकीय पक्षाला यापुढे तालुक्यात चांगले दिवस येण्याची शक्यताच या निकालातून दिसून येत आहे.