शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

भाजपचा डाव जनता खपवून घेणार नाही -राष्ट्रवादीमुळे राज्य चालविण्यास अडचण

By admin | Updated: October 12, 2014 23:31 IST

पृथ्वीराज चव्हाण : सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ येलूरला सभा

येलूर : महाराष्ट्र तोडण्याचा भाजपचा कुटिल डाव महाराष्ट्रातील जनता खपवून घेणार नाही. काँग्रेस विचारसरणी नेहमीच राज्याला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.येलूर (ता. वाळवा) येथे शिराळा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख अध्यक्षस्थानी होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, सी. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. चव्हाण म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी असणारे मुंबई शहर बदलून ते अहमदाबाद करण्याच्या प्रयत्नात भाजप आहे. देशाच्या सरहद्दीवर घुसखोरी वाढली असताना, पंतप्रधान सभा घेत फिरत आहेत. ते प्रत्येक गोष्टीत राजकारण करीत आहेत. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे हे भाजपचे षड्यंत्र असून राष्ट्रवादीदेखील यामध्ये सहभागी आहे. राष्ट्रवादीला काँग्रेसबरोबरची आघाडी तोडायचीच होती. त्यामुळे त्यांनी प्रत्येक बैठकीत वेगळा मुद्दा आणला. भाजपकडे मुख्यमंत्री पदाचा उमेदवारच नाही, असा आरोपही चव्हाण यांनी केला.सत्यजित देशमुख म्हणाले की, गिरजवडे एम. आय. टँक, रस्ते, पूल, बसस्थानक, प्रशासकीय इमारती आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. विरोधी उमेदवार सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. जनता त्यांना त्यांची जागा दाखविण्यास सज्ज झाली आहे.जक्राईवाडीतील राष्ट्रवादीचे संजय गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बाळासाहेब पाटील, गोविंदराव जाधव, संदीप जाधव, आनंदराव पाटील, उदयसिंग देशमुख, सुरेश कुराडे, के. डी. पाटील, महादेव कदम, गोपालराव जाधव, भानुदास मोरे उपस्थित होते. (वार्ताहर)राष्ट्रवादीमुळे राज्य चालविण्यास अडचणराष्ट्रवादीच्या नेत्यांना बरोबर घेऊन राज्य चालविताना अनेक अडचणी आल्या. राष्ट्रवादी नेत्यांनी फायलींवर सह्या होत नाहीत असा आरोप केला. परंतु माझ्याच कालखंडात सर्वात जास्त ३६ हजार फायली निर्णायक केल्या. अनेक धोरणात्मक निर्णय घेतले, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.