शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

भाजपचा डाव जनता खपवून घेणार नाही -राष्ट्रवादीमुळे राज्य चालविण्यास अडचण

By admin | Updated: October 12, 2014 23:31 IST

पृथ्वीराज चव्हाण : सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ येलूरला सभा

येलूर : महाराष्ट्र तोडण्याचा भाजपचा कुटिल डाव महाराष्ट्रातील जनता खपवून घेणार नाही. काँग्रेस विचारसरणी नेहमीच राज्याला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.येलूर (ता. वाळवा) येथे शिराळा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख अध्यक्षस्थानी होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, सी. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. चव्हाण म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी असणारे मुंबई शहर बदलून ते अहमदाबाद करण्याच्या प्रयत्नात भाजप आहे. देशाच्या सरहद्दीवर घुसखोरी वाढली असताना, पंतप्रधान सभा घेत फिरत आहेत. ते प्रत्येक गोष्टीत राजकारण करीत आहेत. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे हे भाजपचे षड्यंत्र असून राष्ट्रवादीदेखील यामध्ये सहभागी आहे. राष्ट्रवादीला काँग्रेसबरोबरची आघाडी तोडायचीच होती. त्यामुळे त्यांनी प्रत्येक बैठकीत वेगळा मुद्दा आणला. भाजपकडे मुख्यमंत्री पदाचा उमेदवारच नाही, असा आरोपही चव्हाण यांनी केला.सत्यजित देशमुख म्हणाले की, गिरजवडे एम. आय. टँक, रस्ते, पूल, बसस्थानक, प्रशासकीय इमारती आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. विरोधी उमेदवार सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. जनता त्यांना त्यांची जागा दाखविण्यास सज्ज झाली आहे.जक्राईवाडीतील राष्ट्रवादीचे संजय गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बाळासाहेब पाटील, गोविंदराव जाधव, संदीप जाधव, आनंदराव पाटील, उदयसिंग देशमुख, सुरेश कुराडे, के. डी. पाटील, महादेव कदम, गोपालराव जाधव, भानुदास मोरे उपस्थित होते. (वार्ताहर)राष्ट्रवादीमुळे राज्य चालविण्यास अडचणराष्ट्रवादीच्या नेत्यांना बरोबर घेऊन राज्य चालविताना अनेक अडचणी आल्या. राष्ट्रवादी नेत्यांनी फायलींवर सह्या होत नाहीत असा आरोप केला. परंतु माझ्याच कालखंडात सर्वात जास्त ३६ हजार फायली निर्णायक केल्या. अनेक धोरणात्मक निर्णय घेतले, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.