शहरं
Join us  
Trending Stories
1
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
2
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
3
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
4
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
5
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
6
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
7
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
8
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
9
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
10
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
11
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

नाशिक शहरावर भाजपचाच वरचष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 01:39 IST

विधानसभा निवडणुकीत महायुतीतील जागावाटपानंतर राज्यभरात शिवसेना-भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आणि नाशिक शहरातील तीनही जागा भाजपलाच सोडण्यात आल्याने शिवसैनिक आक्रमक झाले होते.

नाशिक : विधानसभा निवडणुकीत महायुतीतील जागावाटपानंतर राज्यभरात शिवसेना-भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आणि नाशिक शहरातील तीनही जागा भाजपलाच सोडण्यात आल्याने शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यातूनच पश्चिममध्ये शिवसेनेने बंडखोरी करत प्रतिष्ठा पणाला लावली. परंतु, भाजपने करिश्मा राखला. इतिहास पाहिल्यास नाशिक शहर २००४चा अपवाद वगळता १९८५ पासून भाजपचाच बालेकिल्ला राहत आलेला आहे.देवळाली मतदारसंघात शिवसेना आपले वर्चस्व दाखवत असताना शहरात मात्र सेनेला अद्याप यशाचे धनी होता आलेले नाही. नाशिकचे लोकसभेत नेतृत्व करणाऱ्या सेनेला विधानसभेत मात्र प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही. यंदाही बंडखोराच्या माध्यमातून ती संधी हुकली आहे.सेनेचे ग्रामीण भागात वर्चस्वशहरी भागात भाजपने वर्चस्व सिद्ध केलेले असताना शिवसेनेने ग्रामीण भागात आपला करिश्मा दाखविल्याचे दिसून येते. जिल्ह्यात शिवसेनेने १९९० पासून विधानसभा निवडणुकांत सहभागी होण्यास सुरुवात केली. १९९० मध्ये देवळालीत बबन घोलप यांच्या माध्यमातून शिवसेनेने पहिल्यांदा यश संपादन केले. त्याचवेळी शिवसेनेने सिन्नर, निफाड, येवला, नांदगाव, दाभाडी, दिंडोरी आणि सुरगाणा या ठिंकाणीही उमेदवार दिले होते; परंतु सारे पराभूत झाले.त्यानंतर १९९५ मध्ये शिवसेनेला ग्रामीण भागात पहिल्यांदा चांगले यश प्राप्त झाले. त्यावेळी देवळालीसह निफाड, येवला आणि नांदगाव या जागा सेनेने जिंकल्या. १९९९ मध्ये तीन, २००४ मध्ये चार, २००९ मध्ये चार आणि २०१४ मध्ये चार जागा शिवसेनेने जिंकल्या.आताही जिल्ह्यातील नगरपालिका, ग्रामपालिकांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे; परंतु, नाशिक महापालिकेत मात्र एकहाती सत्ता शिवसेनेला आजवर मिळविता आलेली नाही. भाजपने मात्र, गेल्या निवडणुकीत ६६ जागा जिंकत एकहाती सत्ता संपादन करत आपले वर्चस्व सिद्ध केले.इतिहास पाहता नाशिक शहरी भागात भाजपनेच आपला वरचष्मा राखल्याचे दिसून येते. यंदा नाशिकमधील एकही जागा न मिळाल्याने शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत नाशिक पश्चिममध्ये बंडखोरी केली. सेना नगरसेवक विलास शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी करत भाजपला टक्कर देण्याची भाषा केली; परंतु शहरातील आख्खी शिवसेना उभी राहूनही भाजपला ती विजयापासून रोखू शकली नाही.१९६२ ते १९८० पर्यत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये नाशिक मतदारसंघाने वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांवर आपल्या मतांनी पसंतीची मोहोर उमटवलेली आहे. त्यात अपक्ष उमेदवारालाही नाशिककरांनी आजमावून पाहिलेले आहे. १९६२ आणि १९६७ मध्ये झालेल्या निवडणुकीत कॉँग्रेसच्या वसंत नारायणराव नाईक यांनी नाशिकचे नेतृत्व केले होते. त्यानंतर १९७२ मध्ये झालेल्या निवडणुकीत कॉँग्रेसचेच विलास लोणारी हे विजयी झाले होते. १९७८ मध्ये जनता पक्षाच्या लाटेत वसंतराव उपाध्ये निवडून आले तर १९८० मध्ये अपक्ष उमेदवारी करणाºया शांतारामबापू वावरे यांना नाशिककरांनी पसंती दर्शविली होती.१९८५ नंतर मात्र भाजपने नाशिक मतदारसंघावर आपली पकड निर्माण करण्यास सुरूवात केली. १९८५ च्या निवडणुकीत डॉ. दौलतराव आहेर यांनी उमेदवारी करत भाजपला पहिल्यांदा यश मिळवून दिले. त्यानंतर १९९० मध्ये भाजपचेच गणपतराव काठे यांनी विधानसभेत पाऊल ठेवले. १९९५ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा डॉ. दौलतराव आहेर यांना उमेदवारी देत भाजपकडेच जागा कायम ठेवली. १९९९ मध्येही डॉ. दौलतराव आहेर पुन्हा एकदा निवडून गेले. २००४ मध्ये मात्र प्रस्थापिताविरोधात मतदानाचा फटका भाजपचे उमेदवार डॉ. दौलतराव आहेर यांना बसला आणि कॉँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्या रुपाने पहिली महिला आमदार निवडून आली.२००९ मध्ये नाशिक मतदारसंघाचे तीन मतदारसंघ निर्माण झाले. यावेळी मनसेच्या लाटेत सेना-भाजप भुईसपाट झाले. नाशिक पूर्व, पश्चिम आणि मध्य या मतदारसंघातून मनसेचे उमेदवार विजयी झाले. युती करून लढलेल्या शिवसेनेने नाशिक मध्यची तर भाजपने नाशिक पूर्व आणि पश्चिमची जागा लढविली होती. त्यावेळी पूर्वमधून भाजपचा उमेदवार दुसºया तर पश्चिममधून पाचव्या क्रमांकावर राहिला होता तसेच मध्य मतदारसंघात सेनेचा उमेदवार तिसºया क्रमांकावर राहिला होता. २०१४ च्या निवडणुकीत युती दुभंगल्यानंतर सेना-भाजप एकमेकांविरुद्ध लढले. त्यात तिनही जागा भाजपने जिंकल्या. पूर्वमध्ये सेनेचा उमेदवार दुसºया, मध्य मतदारसंघात चौथ्या तर पश्चिममध्ये दुसºया क्रमांकावर राहिला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकResult Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूकBJPभाजपा