शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

भाजप घेत नाही खंडण्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:14 IST

नाशिक : अयोध्येतील राम मंदिरासाठी भाजप नव्हे तर विश्व हिंदू परिषद आणि राम जन्मभूमी न्यास निधी संकलन ...

नाशिक : अयोध्येतील राम मंदिरासाठी भाजप नव्हे तर विश्व हिंदू परिषद आणि राम जन्मभूमी न्यास निधी संकलन करत आहे. भाजप कार्यकर्ते केवळ निधी संकलनात मदत करत आहेत. तसेच हे निधी संकलन स्वैच्छिक असून, भाजप अन्य पक्षांप्रमाणे खंडण्या गोळा करत नाही, असे सांगत माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेला टोला लगावला. तसेच मास्कच्या विचारांबाबत माझे आणि मनसे अध्यक्षांचे मत जुळत असले तरी प्रस्तावित मनपाच्या युतीबाबत अजून प्रस्ताव आलेला नसून, तत्कालिन परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

नाशिक महानगरातील विविध भागात १६ जलकुंभांचे भूमिपूजन केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महाजन बोलत होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी महापालिकेत केलेली १०० प्लसची गर्जनादेखील पोकळच असल्याचे त्यांनी सांगितले. ते नुसतीच गर्जना करतात, करत काहीच नाहीत. यापूर्वीही उत्तर महाराष्ट्रातील चारही महापालिकांमध्ये शिवसेनेने पराभवाची चव चाखली आहे. तरीदेखील त्यांना काहीही गर्जना करायची असेल तर घोडामैदान जवळच असल्याचे सांगून माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेला एकप्रकारे आव्हानच दिले. तसेच येत्या मनपा निवडणुकीनंतरही भाजपलाच सत्ता मिळणार असल्याचा दावाही केला. केंद्राच्या माध्यमातून नाशिकला येणाऱ्या निओ मेट्रोसाठी झालेले सर्वेक्षण प्राथमिक स्वरुपाचे असल्याने त्याच्या आराखड्यात भविष्यात गरजेनुसार २-३ बदलदेखील होऊ शकतात, असेही महाजन यांनी सांगितले. साहित्य संमेलनाबाबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य तो निर्णय संबंधितांनी घ्यावा, अशीच आमची भूमिका आहे. तसेच पेट्रोल, डिझेलवरील राज्य शासनाचा कर कमी व्हावा, अशी आमची मागणी असल्याचेही महाजन यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे नाशिक प्रभारी जयकुमार रावल, महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, बाळासाहेब सानप, उपमहापौर भिकूबाई बागुल, गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी, विजय साने, जगदीश पाटील, सतीश सोनवणे, प्रशांत जाधव, पवन भगूरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

इन्फो

सरकार बदलल्याने निधीबाबत भेदभाव

केंद्रातील सरकार आणि फडणवीस मुख्यमंत्री असताना नाशिक शहरात मोठ्या वेगाने विकासकामे सुरु होती. मात्र, नवीन राज्य शासन आल्यापासून नाशिकला विकासकामांसाठी निधी देण्यात खंड पडला. सरकार बदलले की, निधी मिळण्यात थोडाफार भेदभाव होतच असतो. दीड वर्षांपासून निधीत हात आखडला असला, तरी केंद्र सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून अधिकाधिक वेगाने कामे पूर्णत्वाला नेली जातील, असेही महाजन यांनी सांगितले.

इन्फो

वाजेबाबत सारे काही संशयास्पद

अंबानींच्या घराजवळ स्फोटके तसेच त्यानंतर हिरेन मृत्यू प्रकरणाने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचे पुरते सिद्ध झाले आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी वाजे यांची भूमिका, त्यांचे हिरेन यांच्याशी झालेले संभाषण हे सारे काही अत्यंत संशयास्पद आहे. या प्रकरणात पोलीस यंत्रणा निष्क्रीय झाली असून, या घटनेने संपूर्ण पोलीस दलाचे मनोबल खच्ची झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी ‘एनआयए’कडून चौकशी व्हावी, अशी आमची मागणी असल्याचेही महाजन यांनी सांगितले.